बोटावरची शाई दाखवा अन् सवलतींचा लाभ घ्या

मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी पालिकेची मोहीम


विरार : वसई-विरार महापालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी महापालिकेने मतदारांमध्ये जनजागृती मोहीम सुरू केली आहे. तसेच मतदार करणाऱ्या मतदारांना विविध प्रकारच्या सवलती देण्यात येणार आहेत. मतदान केल्यानंतर मतदारांना हॉटेल्स बिलांमध्ये व रिक्षा, बस भाड्यांमध्ये सवलत देण्यात येणार आहे.


वसई-विरार महापालिकेची ११५ जागासाठी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी ११ लाख २६ हजार ४०० इतके मतदार आहेत. या मतदारांनी मतदानाच्या दिवशी घरा बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावावा यासाठी पालिकेची जनजागृती मोहीम सुरू आहे.


याच पार्श्वभूमीवर नुकताच महापालिकेत महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका क्षेत्रातील हॉटेल्स असोसिएशन, रिक्षा युनियन, परिवहन सेवा पदाधिकारी यांच्यात बैठक पार पडली. निवडणूक हा लोकशाहीचा एक उत्सव आहे, मतदानाच्या दिवशी सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून या उत्सवात मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवावा या उद्देशाने मतदानाच्या दिवशी मतदान करणाऱ्या मतदारांना हॉटेल्सच्या बिलांमध्ये, रिक्षा व बस प्रवासभाड्यामध्ये सवलत देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार मतदान करणाऱ्या मतदारांना सदर मतदानाच्या दिवशी हॉटेलच्या बिलामधून १५ टक्के सवलत, रिक्षा भाड्यामध्ये ५० टक्के सवलत, परिवहन विभागाच्या बस मध्येही विशेष सवलत दिली जाणार आहे.मतदानाच्या दिवशी नागरिकांनी घराबाहेर पडून उस्फुर्तपणे मतदान करावे यासाठी रिक्षा, हॉटेल चालक, केशकर्तनालय यांच्या सहकार्याने विशेष सवलती देण्यात आल्या आहेत असे महापालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment

ई-गव्हर्नन्स मूल्यमापनात वसई–विरार पालिकेचा ‘नववा क्रमांक’ कायम

पालघर :  राज्यातील महानगरपालिकांच्या ई-गव्हर्नन्स कामकाजाच्या मूल्यमापनात वसई–विरार महानगरपालिकाने यंदाही

Virar: दारूच्या नशेत सापासोबत मस्ती बेतली जीवावर; विरारमध्ये तरुणाचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू

विरार: दारूच्या नशेत विषारी जातीच्या सापाला पकडणे आणि अति उत्साहाच्या भरात सापसोबतच मस्ती करणे विरार येथील एका

वसई-दिवा मार्गावर मेगाब्लॉक, शनिवारी आणि रविवारी प्रवाशांचे हाल

वसई : दिवा-वसई रोड मार्गावरील खारबाव (Kharbav) स्थानकात नवीन अप आणि डाऊन मालवाहू मार्गिकांच्या कामासाठी शनिवार आणि

धक्राकादायक! १५ वर्षाच्या भाच्याकडून आत्याचा खून

वसई : वसई परिसरामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रागाच्या भरात एका १५ वर्षीय मुलाने आपल्या आत्याचा खून

सत्तेचे गणित बिघडले; बेरजेचे गणित जमले

गणेश पाटील, विरार : वसई-विरारमध्ये एकापेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्याची राजकीय शक्ती नसलेल्या भाजपने यावेळी

पाण्याच्या टाकीत मानवी हाडांचा सापळा

वसईच्या माणिकपूर गावातील घटना वसई : वसईच्या माणिकपूर येथील एका चाळीच्या रिकाम्या पाण्याच्या टाकीत पुरुषाच्या