धक्कादायक! चंद्रपुरात पतीकडून पत्नीची जिवंत जाळून हत्या; दरवाजाला कडी लावून फरार

चंद्रपूर : महाराष्ट्रात स्त्रियांवरील अत्याचार आणि हुंडाबळीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच, चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या २७ वर्षीय विवाहितेचा होरपळून मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.


चंद्रपूर शहरातील महाकाली वॉर्ड अंतर्गत येणाऱ्या गौतम नगर परिसरात राहणाऱ्या दीक्षा शुभम भडके या तरुण विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी तिच्या पतीवर पत्नीला जिवंत जाळल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, मृत्यूपूर्व जबाबातही पतीचेच नाव घेतल्याची माहिती समोर आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ५ जानेवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास शुभम भडके हा घरी आला. घराच्या दरवाजाला बाहेरून कडी लावली त्यानंतर त्याने पत्नी दीक्षाला पेटवून दिले आणि घटनास्थळावरून फरार झाल्याचा आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी केला आहे.


आरडाओरड ऐकून शेजाऱ्यांनी दरवाजा उघडला असता दीक्षा गंभीर अवस्थेत, पूर्णतः भाजलेली आढळून आली. तिला तातडीने चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच ७ जानेवारी रोजी तिचा मृत्यू झाला.


या घटनेनंतर मृतकाच्या नातेवाईकांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. चंद्रपूर शहर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केला असून, आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. घटनेमागील नेमके कारण काय, पतीने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचा शोध पोलीस तपासातून घेतला जात आहे.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार