खारघर-कामोठ्यात कमी दाबाने पाणीपुरवठा

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीत गळती आढळून आल्याने गुरुवारी पाणीपुरवठा व्यवस्थेत मोठा व्यत्यय निर्माण झाला आहे.


मोरबे धरणातून भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्राकडे येणाऱ्या २०५० मिमी व्यासाच्या जलवाहिनीत ही गळती आढळल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव तातडीने पाणीपुरवठा बंद करण्यात आला. या बिघाडाचा परिणाम नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रासह सिडकोच्या खारघर व कामोठे परिसरावर होणार असून, आज सायंकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने व कमी प्रमाणात होईल, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.


महानगरपालिकेच्या अधिकृत माहितीनुसार, भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्राजवळ जलवाहिनीत तांत्रिक बिघाड लक्षात येताच दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. या दुरुस्तीसाठी सकाळी ११.३० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत जलशुद्धीकरण केंद्रातील यंत्रणा पूर्णतः बंद ठेवण्यात आली आहे.


उद्या सकाळपासून पाणीपुरवठा नियमित वेळापत्रकानुसार सुरळीत करण्यात येईल, असा अंदाज महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे. अनपेक्षित तांत्रिक कारणांमुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीत नागरिकांनी पाणी जपून वापरावे व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त शहर अभियंत्यांनी केले आहे.

Comments
Add Comment

ठाण्यातील भव्य त्रिमंदिर भाविकांसाठी खुले; तीन दिवसांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनास सुरुवात

ठाणे : ठाणे शहरात उभारण्यात आलेले भव्य त्रिमंदिर अखेर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. तीन दिवस चाललेल्या

Rashmika Mandanna Latest News: रश्मीका मदांना व विजय देवरकोंडाच फेब्रुवारीमध्ये लग्न सोहळा; रश्मीकाची धक्कादायक प्रतिक्रिया...

गोल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिक मदाना व अभिनेता विजय देवरकोंडा या दोघांच्या लग्नाबद्दल

पाणीपट्टी वाढीवर शिक्कामोर्तब

मुंबई  : मुंबई महानगरपालिका निवडणूक पार पडल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून रखडलेला पाणीपट्टी वाढीचा निर्णय आता

अखेर भाजपचा गटनेता ठरला, गणेश खणकर यांची नियुक्ती

मुंबई: मुंबई महापालिकेत भाजपाच्या गटनेते पदी गणेश खणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खणकर हे प्रभाग ३ मधून

फडणवीसांनी अडचणीच्या काळात मोहिते पाटलांना छत दिलं, ताकद दिली अन् तेच..., जयकुमार गोरेंची मोहिते पाटलांवर जोरदार टीका

सोलापूर: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय वातावरण

गृह खरेदीदारांच्या अपेक्षाभंगामुळे रिअल इस्टेटवर परिणाम

मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्प २०२६ मध्ये रिअल इस्टेट क्षेत्रासाठी