राज्यातील सर्व महापालिकांवर महायुतीचाच महापौर!

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा विश्वास


ठाणे : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत असून, या सर्व महापालिकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचाच महापौर विराजमान होईल, असा ठाम विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. अंबरनाथ नगर परिषदेत निवडून आलेल्या काँग्रेसच्या १२ नगरसेवकांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. त्यानंतर आज नवी मुंबई येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत या सर्व नगरसेवकांचा भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश झाला.


यावेळी माध्यमांशी संवाद साधताना रवींद्र चव्हाण म्हणाले, “या सर्व नगरसेवकांशी आम्ही सविस्तर चर्चा केली. निवडणूक लढवताना प्रत्येक उमेदवार जिंकण्याच्या उद्देशानेच मैदानात उतरतो आणि आपल्या प्रभागातील नागरिकांना उत्तम नागरी सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्नशील असतो. विकासात्मक कामांना गती मिळावी, हीच त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळेच हे नगरसेवक भाजपमध्ये सहभागी झाले आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

कुटुंबियांना वाचवण्यासाठी १३ वर्षीय मुलाची समुद्राशी झुंज; उसळत्या लाटा आणि त्यात....

पर्थ : अवघ्या तेरा वर्षांच्या मुलाने समुद्र आणि सोसाट्याच्या वाऱ्याशी झुंजत सलग चार तास पोहून आई, भाऊ आणि बहीण या

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने

सी-टीईटी देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कामातून सूट

मुंबई : ‘केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा’ (सी-टीईटी) देणाऱ्या शिक्षकांना जिल्हा परिषद व पंचायत समिती

शाहरुख खानच्या ‘किंग’च्या आंतरराष्ट्रीय वितरणासाठी रेड चिलीज एंटरटेनमेंट, मार्फ्लिक्स पिक्चर्स आणि यशराज फिल्म्स यांची ऐतिहासिक भागीदारी

मुंबई : रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि मार्फ्लिक्स पिक्चर्स यांनी शाहरुख खान अभिनीत बहुप्रतिक्षित चित्रपट

'मिर्झापूर: द फिल्म'च्या अखेरच्या शूटिंगनंतर अली फजल भावूक, शेअर केला खास संदेश

मुंबई: बहुप्रतीक्षित 'मिर्झापूर: द फिल्म'चे अखेरचे शूटिंग शेड्यूल पूर्ण झाले असून, भारतातील सर्वात लोकप्रिय

सलमान खानचा 'तेरे नाम' २२ वर्षांनी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित?

Tere Nam Re-release Date : सलमान खानचा 'तेरे नाम' हा चित्रपट परत येत आहे आणि सलमान खानचे चाहते या चित्रपटाचा अनुभव घेण्यासाठी