बुलढाण्यात लाडकी बहीण योजेनचा लाभ घेणाऱ्या महिलांना झटका; सरकारची कडक कारवाई

बुलढाणा : राज्यातील गोरगरीब महिलांना आर्थिक पाठबळ मिळाव यासाठी सरकारने लाडकी बहीण योजना लागू केली. या योजनेचा असंख्य बहिणींनी लाभही घेतला आणि सरकारला अनेक शुभाशीर्वादही दिले.


या योजनेचा लाभ फक्त आर्थिक दृष्ट्या कमकुवत महिलांनी घ्यावा असे सरकारचे धोरण होते, परंतु काही ठिकाणी प्रचंड पैसे असलेल्या, अगदी आर्थिक स्थिती उत्तम असलेल्या महिलांनीही पैसे फुकट पैसे मिळत आहेत. म्हणून या योजनेचा लाभ घेतला आणि यामुळे राजुत सर्वत्र खळबळ माजली.


ही बाब सरकारच्या लक्षात येताच अर्ज मागे घेण्यासाठी अनेक आवाहने ही करण्यात आली मात्र कोणीही अर्ज मागे घेतला नाही. शेवटी सरकाराने कठोर कारवाई करत संबंधित महिलांकडून रक्कम वसुली करत कायदेशीर कारवाई हि केली आहे.


बुलढाणा जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शासनाकडून महिला व बालकल्याण विभागाला विविध विभागांत कार्यरत असलेल्या १९६ कर्मचाऱ्यांची यादी प्राप्त झाली होती. या सर्व कर्मचाऱ्यांच्या पात्रतेची सखोल चौकशी करण्यात आली.


चौकशीत १९० कर्मचारी अर्धवेळ स्वरूपात कार्यरत असून त्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे हे कर्मचारी योजनेसाठी पात्र ठरले. मात्र उर्वरित ६ शासकीय कर्मचारी अपात्र असतानाही त्यांनी योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आले.


या सहा कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी १६ हजार ५०० रुपये याप्रमाणे एकूण ९९ हजार रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली आहे. तसेच संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगात्मक कारवाई करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. लवकरच या प्रकरणात पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.


शासनाची फसवणूक करून ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणे संबंधित कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रमोद येंडोले यांनी या संपूर्ण कारवाईची अधिकृत माहिती दिली आहे.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार