बुलढाण्यात लाडकी बहीण योजेनचा लाभ घेणाऱ्या महिलांना झटका; सरकारची कडक कारवाई

बुलढाणा : राज्यातील गोरगरीब महिलांना आर्थिक पाठबळ मिळाव यासाठी सरकारने लाडकी बहीण योजना लागू केली. या योजनेचा असंख्य बहिणींनी लाभही घेतला आणि सरकारला अनेक शुभाशीर्वादही दिले.


या योजनेचा लाभ फक्त आर्थिक दृष्ट्या कमकुवत महिलांनी घ्यावा असे सरकारचे धोरण होते, परंतु काही ठिकाणी प्रचंड पैसे असलेल्या, अगदी आर्थिक स्थिती उत्तम असलेल्या महिलांनीही पैसे फुकट पैसे मिळत आहेत. म्हणून या योजनेचा लाभ घेतला आणि यामुळे राजुत सर्वत्र खळबळ माजली.


ही बाब सरकारच्या लक्षात येताच अर्ज मागे घेण्यासाठी अनेक आवाहने ही करण्यात आली मात्र कोणीही अर्ज मागे घेतला नाही. शेवटी सरकाराने कठोर कारवाई करत संबंधित महिलांकडून रक्कम वसुली करत कायदेशीर कारवाई हि केली आहे.


बुलढाणा जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शासनाकडून महिला व बालकल्याण विभागाला विविध विभागांत कार्यरत असलेल्या १९६ कर्मचाऱ्यांची यादी प्राप्त झाली होती. या सर्व कर्मचाऱ्यांच्या पात्रतेची सखोल चौकशी करण्यात आली.


चौकशीत १९० कर्मचारी अर्धवेळ स्वरूपात कार्यरत असून त्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे हे कर्मचारी योजनेसाठी पात्र ठरले. मात्र उर्वरित ६ शासकीय कर्मचारी अपात्र असतानाही त्यांनी योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आले.


या सहा कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी १६ हजार ५०० रुपये याप्रमाणे एकूण ९९ हजार रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली आहे. तसेच संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगात्मक कारवाई करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. लवकरच या प्रकरणात पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.


शासनाची फसवणूक करून ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणे संबंधित कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रमोद येंडोले यांनी या संपूर्ण कारवाईची अधिकृत माहिती दिली आहे.

Comments
Add Comment

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी