घरभाडे थकवल्यास विकासकांवर कठोर कारवाई

झोपु प्राधिकरणाकडून विक्री घटकातील घरे होणार जप्त


मुंबई : मुंबईमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणारे अनेक विकासक घरभाडे देत नसल्याने झोपडीधारकांच्या आर्थिक अडचणीत वाढत आहेत. थकीत घरभाड्याचा विषय थेट उच्च न्यायलायत गेला आहे. न्यायालयाने याप्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला दिले होते. या आदेशानुसार अखेर झोपु प्राधिकरणाने घरभाडे थकविणाऱ्या विकासकाच्या प्रकल्पातील विक्री घटकातील थकीत घर भाड्याच्या रक्कमेइतकी घरे जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. थकीत घरभाडे काही ठरावीक कालावधीत विकासकाने अदा न केल्यास जप्त घरांचा लिलाव करून थकीत घरभाडे वसूल केले जाणार आहे. यासंबंधीचे स्वतंत्र धोरण तयार करण्यास झोपु प्राधिकरणाने सुरुवात केली आहे. हे धोरण लागू झाल्यास घरभाडे थकविणाऱ्या विकासकांना आता अंकुश बसणार आहे.


थकीत घर भाड्याची रक्कम कित्येक कोटींच्या घरात असून थकीत घरभाड्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी मागील काही वर्षांपासून झोपु प्राधिकरणाकडून काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत.


आता तीन वर्षांचे घरभाडे दिल्यानंतरच प्रकल्पास मान्यता दिली जात आहे. तर थकीत घरभाडे वसुलीसाठी अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त केले आहे. मात्र यानंतरही थकीत घरभाड्याचा प्रश्न निकाली निघाला नसून हा प्रश्न उच्च न्यायालयात गेला आहे. या प्रकरणाची न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. थकीत घरभाडे अदा न करणाऱ्या विकासकांविरोधात कठोर कारवाई करा, त्यांची विक्री घटकातील घरे जप्त करा, असे आदेश काही दिवसांपूर्वी न्यायालयाने प्राधिकरणास दिले होते. या आदेशानुसार थकीत घरभाड्याच्या रक्कमेच्या किमतीची घरे जप्त करून त्यांची विक्री रोखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. थकीत घरभाड्याची रक्कम जमा करण्यास विकासक नकारच देत असेल तर जप्त घरांची विक्री, लिलाव करून त्यातून येणारी रक्कम संबंधित झोपडीधारकांना देण्यात येणार आहे. यासाठी धोरण तयार करण्यात येत आहे. हे धोरण लागू झाल्यास नक्कीच विकासकांना चाप बसेल आणि थकीत घरभाड्याचा प्रश्न निकाली निघेल, असा दावाही यानिमित्ताने करण्यात येत आहे.


विकासकाने घरभाडे थकविल्याच्या तक्रारी संगणकीय पद्धतीने झोपु प्राधिकरणाकडे करता येतात. मात्र या तक्रारीचे निराकरण होण्यास बराच कालावधी लागत आहे. अनेक विकासक थकीत रक्कम अदा करण्यास तयार होत नाहीत. त्यामुळेच आता विकासकांविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे. यासह झोपडीधारकांचा घर भाड्याच्या तक्रारीचे निवारण जलद गतीने व्हावे यासाठी प्राधिकरणाने विशेष कक्षाची स्थापन केली आहे. या कक्षात एका निवृत्त सह उपनिंबधकासह उपजिल्हाधिकारी, अभियंता आणि अन्य एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. या कक्षाकडे एखादी तक्रार आल्यानंतर पुढील कार्यवाही करून तक्रार १५ दिवसांत निकाली काढणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर तक्रार निवारणास विलंब झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे

Comments
Add Comment

Supriya Sule : पुणे-मुंबई प्रवासादरम्यान सुप्रिया सुळे यांच्या गाडीला अपघात; सीट बेल्टमुळे मोठा अनर्थ टळला

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या गाडीचा पुणे-मुंबई महामार्गावर

BMC News : नगरसेवकांना गृहीत धरून काम करू नका; महापौरांनी अधिकाऱ्यांचे टोचले कान

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मागील पावणे चार वर्षे नगरसेवक नव्हते म्हणून महापालिका प्रशासनातील अधिकारी जर आता

BMC News : महापालिकेचा अर्थसंकल्प मंजूर, आता नगरसेवकांना विकास निधी वापरण्याचे खाते झाले खुले !

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मांडलेले सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचे अर्थसंकल्पीय अंदाज

BMC News : मुंबईतील घटनांवर पाहण्याची महापालिकेची दृष्टी झाली अंधूक

- आपत्कालिन नियंत्रण कक्षातील व्हिडीओ वॉलची गुणवत्ता खालावली मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील सर्व ठिकाणांवर

Megablock : ठाणे ते वाशी पाच तास रेल्वे सेवा बंद राहणार, तर मध्य रेल्वेवरही रविवारी मेगाब्लॉक

मुंबई : 'नीट' परीक्षेमुळे गेल्या रविवारी रेल्वेने मेगाब्लॉक रद्द केला होता. मात्र, या रविवारी (१० मे) रेल्वेच्या

Power Block in Kasara Ghat : कसारा घाटात विशेष वाहतूक आणि पॉवरब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात कसारा – इगतपुरी – खर्डी विभागामध्ये ओव्हरहेड इक्विपमेंट (ओएचइ) संदर्भातील