बांगलादेशच्या मागणीला आयसीसीचा नकार

टी-२० विश्वचषकासाठी भारतात यावेच लागेल!


दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारतात होणारे बांगलादेशचे सामने सुरक्षा कारणास्तव दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची बांगलादेश क्रिकेट बोर्डाची विनंती स्पष्टपणे फेटाळून लावली आहे. या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील क्रिकेट संबंधात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या सामन्यांदरम्यान आपल्या खेळाडूंच्या आणि अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यांनी हे सामने युएई किंवा श्रीलंकेसारख्या तटस्थ ठिकाणी हलवण्याची आयसीसीकडे मागणी केली होती.


मात्र, आयसीसीने बांगलादेशची ही विनंती अमान्य केली असून, पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच सामने भारतात होतील, असे स्पष्ट केले आहे. हा निर्णय अशा वेळी आला आहे, जेव्हा काही दिवसांपूर्वीच बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानने सुरक्षा किंवा इतर काही कारणांमुळे इंडियन प्रीमियर लीगमधून अचानक माघार घेतली होती. या पार्श्वभूमीवर आयसीसीच्या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील तणाव अधिकच वाढला आहे. यामुळे बांगलादेशचे सामने नियोजित वेळापत्रकानुसार कोलकाता येथील ईडन गार्डन्स आणि मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर होणार आहेत.


मात्र या सर्व परिस्थितीमुळे टी-२० विश्वचषकाच्या आयोजनात अनिश्चितता निर्माण झाली आहे. विश्वचषक सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना (स्पर्धा १४ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे), आयसीसीच्या या भूमिकेमुळे बांगलादेशचा संघ भारतात खेळण्यास तयार होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


हे आहे कारण : या वादाची मुळे आयपीएलशी जोडलेली आहेत. आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स संघाने बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान यांना बीसीसीआयच्या सूचनेनुसार संघातून मुक्त केले होते. बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या कथित अत्याचारांच्या निषेधार्थ भारतात मोठ्या प्रमाणावर जनक्षोभ निर्माण झाला होता. यामुळे रहमानला आयपीएलमध्ये खेळवण्यास विरोध झाला आणि अखेर त्याला रिलीज करण्यात आले.


आयसीसीची भूमिका : रहमानच्या प्रकरणानंतर बांगलादेश सरकारनेही आक्रमक भूमिका घेत भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या बहिष्काराची धमकी दिली. बीसीबीने आयसीसीला पत्र लिहून भारतात सामने न खेळण्याची भूमिका मांडत ते श्रीलंकेत हलवण्याची मागणी केली. खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे करत बांगलादेशने आयपीएलचे आपल्या देशातील प्रसारणही थांबवले होते. मात्र आयसीसीने सर्व बाबींचा विचार करून ठाम भूमिका घेत बांगलादेशला भारतातच येऊन सामने खेळावे लागतील, असे स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे बांगलादेशवर दबाव वाढला असून, विश्वचषकात सहभाग कायम ठेवण्यासाठी भारतात येण्याशिवाय पर्याय नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Comments
Add Comment

Lungi Ngidi : लुंगी एनगिडीला रुग्णालयातून डिस्चार्ज, चाहत्यांचे मानले आभार

नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आपली पहिली

Badminton New Rules : बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनचा ऐतिहासिक निर्णय! खेळाच्या अनेक नियमांमध्ये बदल

मुंबई : बॅडमिंटनचे सामने आता २१x३ पद्धतीऐवजी १५x३ गुणपद्धतीनुसार खेळले जातील. सामने आता तीन २१x२१ गेम्सऐवजी तीन

RR vs SRH : वैभव सूर्यवंशीचा महाविक्रम, गिलचा विक्रम मोडला

जयपूर : सवाई मानसिंह स्टेडियमवर झालेल्या सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स या सामन्यात नाणेफेक

IPL 2026 : सनरायझर्स हैदराबादचा विजयी चौकार, गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप

जयपूर : इशान मलिंगाच्या नेतृत्वाखालील भेदक गोलंदाजी आणि अभिषेक शर्मा व इशान किशन यांच्यातील शतकी भागीदारीच्या

Lungi Ngidi Injured : दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, लुंगी एनगिडी गंभीर जखमी

मुंबई : दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात गंभीर जखमी झाला. झेल

Punjab Kings : पंजाबचा दिल्ली विरुद्धच्या सामन्यात ऐतिहासिक विजय, सर्वात मोठ्या धावसंख्येचा केला यशस्वी पाठलाग

नवी दिल्ली : पंजाब किंग्सने शनिवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ६ गडी राखून विजय मिळवत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात