बांगलादेशच्या मागणीला आयसीसीचा नकार

टी-२० विश्वचषकासाठी भारतात यावेच लागेल!


दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारतात होणारे बांगलादेशचे सामने सुरक्षा कारणास्तव दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची बांगलादेश क्रिकेट बोर्डाची विनंती स्पष्टपणे फेटाळून लावली आहे. या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील क्रिकेट संबंधात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या सामन्यांदरम्यान आपल्या खेळाडूंच्या आणि अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यांनी हे सामने युएई किंवा श्रीलंकेसारख्या तटस्थ ठिकाणी हलवण्याची आयसीसीकडे मागणी केली होती.


मात्र, आयसीसीने बांगलादेशची ही विनंती अमान्य केली असून, पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच सामने भारतात होतील, असे स्पष्ट केले आहे. हा निर्णय अशा वेळी आला आहे, जेव्हा काही दिवसांपूर्वीच बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानने सुरक्षा किंवा इतर काही कारणांमुळे इंडियन प्रीमियर लीगमधून अचानक माघार घेतली होती. या पार्श्वभूमीवर आयसीसीच्या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील तणाव अधिकच वाढला आहे. यामुळे बांगलादेशचे सामने नियोजित वेळापत्रकानुसार कोलकाता येथील ईडन गार्डन्स आणि मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर होणार आहेत.


मात्र या सर्व परिस्थितीमुळे टी-२० विश्वचषकाच्या आयोजनात अनिश्चितता निर्माण झाली आहे. विश्वचषक सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना (स्पर्धा १४ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे), आयसीसीच्या या भूमिकेमुळे बांगलादेशचा संघ भारतात खेळण्यास तयार होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


हे आहे कारण : या वादाची मुळे आयपीएलशी जोडलेली आहेत. आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स संघाने बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान यांना बीसीसीआयच्या सूचनेनुसार संघातून मुक्त केले होते. बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या कथित अत्याचारांच्या निषेधार्थ भारतात मोठ्या प्रमाणावर जनक्षोभ निर्माण झाला होता. यामुळे रहमानला आयपीएलमध्ये खेळवण्यास विरोध झाला आणि अखेर त्याला रिलीज करण्यात आले.


आयसीसीची भूमिका : रहमानच्या प्रकरणानंतर बांगलादेश सरकारनेही आक्रमक भूमिका घेत भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या बहिष्काराची धमकी दिली. बीसीबीने आयसीसीला पत्र लिहून भारतात सामने न खेळण्याची भूमिका मांडत ते श्रीलंकेत हलवण्याची मागणी केली. खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे करत बांगलादेशने आयपीएलचे आपल्या देशातील प्रसारणही थांबवले होते. मात्र आयसीसीने सर्व बाबींचा विचार करून ठाम भूमिका घेत बांगलादेशला भारतातच येऊन सामने खेळावे लागतील, असे स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे बांगलादेशवर दबाव वाढला असून, विश्वचषकात सहभाग कायम ठेवण्यासाठी भारतात येण्याशिवाय पर्याय नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Comments
Add Comment

FIFA WORLDCUP 2026 : कॅनडातील वणव्यांचा धूर आणि स्पेनच्या सराव सत्रावर परिणाम

कॅनडातील वणव्यांमुळे निर्माण झालेला विषारी धूर सध्या उत्तर अमेरिकेच्या अनेक भागांत पसरला आहे. या गंभीर हवामान

Football fever in Kolhapur : क्रिकेटच्या देशात फुटबॉलचा थरार; अर्जेंटिनाच्या विजयाने कोल्हापूर झाले 'फुटबॉलमय'!

Kolhapur : भारत हा तसा क्रिकेटवेडा देश, पण कोल्हापूरची गोष्टच न्यारी आहे! 'सॉकर सिटी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या

FIFA WORLDCUP 2026 : अर्जेंटिनाच्या टीकाकारांना मेस्सीचे चोख उत्तर: 'आम्हाला काहीही आयते मिळालेले नाही'

लिओनेल मेस्सीने अर्जेंटिनाच्या विश्वचषक प्रवासावर टीका करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. "आम्हाला काहीही फुकट

Major Cricket League : एका सामन्यात ३ शतकं, ५१ सिक्स अन् ५३७ रन; क्रिकेटच्या इतिहासात लिहिला गेला नवा अध्याय

मुंबई : टी-२० क्रिकेटच्या इतिहासात असा सामना पाहायला मिळाला, ज्याने या फॉरमॅटमधील (Format) जवळपास सगळे मोठे विक्रम (Records)

ICC : वर्ल्ड कपमध्ये आयसीसीचा ‘मास्टर प्लॅन’? भारत-पाक सामन्यांसाठी मोठा बदल

मुंबई : क्रिकेट विश्वातील सर्वात चर्चेचा विषय ठरलेला भारत-पाकिस्तान सामना पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे.

Rohit Sharma Retirement News : रोहित शर्माच्या निवृत्तीची चर्चा; इंग्लंडविरुद्धचा सामना ठरणार शेवटचा?

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज (Batsman) रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या वनडे (ODI)