बांगलादेशच्या मागणीला आयसीसीचा नकार

टी-२० विश्वचषकासाठी भारतात यावेच लागेल!


दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारतात होणारे बांगलादेशचे सामने सुरक्षा कारणास्तव दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची बांगलादेश क्रिकेट बोर्डाची विनंती स्पष्टपणे फेटाळून लावली आहे. या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील क्रिकेट संबंधात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या सामन्यांदरम्यान आपल्या खेळाडूंच्या आणि अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यांनी हे सामने युएई किंवा श्रीलंकेसारख्या तटस्थ ठिकाणी हलवण्याची आयसीसीकडे मागणी केली होती.


मात्र, आयसीसीने बांगलादेशची ही विनंती अमान्य केली असून, पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच सामने भारतात होतील, असे स्पष्ट केले आहे. हा निर्णय अशा वेळी आला आहे, जेव्हा काही दिवसांपूर्वीच बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानने सुरक्षा किंवा इतर काही कारणांमुळे इंडियन प्रीमियर लीगमधून अचानक माघार घेतली होती. या पार्श्वभूमीवर आयसीसीच्या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील तणाव अधिकच वाढला आहे. यामुळे बांगलादेशचे सामने नियोजित वेळापत्रकानुसार कोलकाता येथील ईडन गार्डन्स आणि मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर होणार आहेत.


मात्र या सर्व परिस्थितीमुळे टी-२० विश्वचषकाच्या आयोजनात अनिश्चितता निर्माण झाली आहे. विश्वचषक सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना (स्पर्धा १४ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे), आयसीसीच्या या भूमिकेमुळे बांगलादेशचा संघ भारतात खेळण्यास तयार होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


हे आहे कारण : या वादाची मुळे आयपीएलशी जोडलेली आहेत. आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स संघाने बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान यांना बीसीसीआयच्या सूचनेनुसार संघातून मुक्त केले होते. बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या कथित अत्याचारांच्या निषेधार्थ भारतात मोठ्या प्रमाणावर जनक्षोभ निर्माण झाला होता. यामुळे रहमानला आयपीएलमध्ये खेळवण्यास विरोध झाला आणि अखेर त्याला रिलीज करण्यात आले.


आयसीसीची भूमिका : रहमानच्या प्रकरणानंतर बांगलादेश सरकारनेही आक्रमक भूमिका घेत भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या बहिष्काराची धमकी दिली. बीसीबीने आयसीसीला पत्र लिहून भारतात सामने न खेळण्याची भूमिका मांडत ते श्रीलंकेत हलवण्याची मागणी केली. खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे करत बांगलादेशने आयपीएलचे आपल्या देशातील प्रसारणही थांबवले होते. मात्र आयसीसीने सर्व बाबींचा विचार करून ठाम भूमिका घेत बांगलादेशला भारतातच येऊन सामने खेळावे लागतील, असे स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे बांगलादेशवर दबाव वाढला असून, विश्वचषकात सहभाग कायम ठेवण्यासाठी भारतात येण्याशिवाय पर्याय नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Comments
Add Comment

Pakistan in WTC : षटकारांच्या संथ गतीचा फटका, ICC च्या कारवाईमुळे पाकिस्तान WTC मध्ये आठव्या स्थानी

मुंबई  : आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट संघावर कडक कारवाई करत मोठा दंड ठोठावला आहे. याचा संघाला वर्ल्ड टेस्ट

RR : राजस्थान रॉयल्सला पहिल्या पराभवाचा बदला घेण्याची संधी

आयपीएल रणसंग्राम - सुशील परब इंडियन प्रीमियर लीग २०२६ मध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील

IPL 2026 : प्लेऑफसाठी विजय महत्त्वाचा!

आयपीएल रणसंग्राम - सुशील परब आययपीएल २०२६ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि पंजाब किंग्स यांच्यातील ६१ वा सामना

KKR : कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ!

कोलकाता : आयपीएल २०२६ स्पर्धेतील ६० व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने बाजी मारली. या सामन्यात गुजरात

IPL 2026 : ऐतिहासिक आयपीएल २०२६, सर्व १० संघांनी एकत्र येऊन केला अनोखा विक्रम

आयपीएल २०२६ आता अखेरच्या टप्प्यात आहे. २०२६ च्या प्लेऑफची सुरुवात २६ मे पासून होणार आहे, तर हंगामातला अखेरचा

Sunil Narine : जीटीविरुद्ध सुनील नरेन ऐतिहासिक रेकॉर्डच्या उंबरठ्यावर ; २०० सामने खेळणारा पहिला विदेशी!

IPL 2026 : आयपीएलमध्ये आज एक मोठा इतिहास घडणार आहे. आयपीएलमध्ये आज १६ मे रोजी कोतकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात