बांगलादेशच्या मागणीला आयसीसीचा नकार

टी-२० विश्वचषकासाठी भारतात यावेच लागेल!


दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारतात होणारे बांगलादेशचे सामने सुरक्षा कारणास्तव दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची बांगलादेश क्रिकेट बोर्डाची विनंती स्पष्टपणे फेटाळून लावली आहे. या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील क्रिकेट संबंधात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या सामन्यांदरम्यान आपल्या खेळाडूंच्या आणि अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यांनी हे सामने युएई किंवा श्रीलंकेसारख्या तटस्थ ठिकाणी हलवण्याची आयसीसीकडे मागणी केली होती.


मात्र, आयसीसीने बांगलादेशची ही विनंती अमान्य केली असून, पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच सामने भारतात होतील, असे स्पष्ट केले आहे. हा निर्णय अशा वेळी आला आहे, जेव्हा काही दिवसांपूर्वीच बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानने सुरक्षा किंवा इतर काही कारणांमुळे इंडियन प्रीमियर लीगमधून अचानक माघार घेतली होती. या पार्श्वभूमीवर आयसीसीच्या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील तणाव अधिकच वाढला आहे. यामुळे बांगलादेशचे सामने नियोजित वेळापत्रकानुसार कोलकाता येथील ईडन गार्डन्स आणि मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर होणार आहेत.


मात्र या सर्व परिस्थितीमुळे टी-२० विश्वचषकाच्या आयोजनात अनिश्चितता निर्माण झाली आहे. विश्वचषक सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना (स्पर्धा १४ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे), आयसीसीच्या या भूमिकेमुळे बांगलादेशचा संघ भारतात खेळण्यास तयार होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


हे आहे कारण : या वादाची मुळे आयपीएलशी जोडलेली आहेत. आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स संघाने बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान यांना बीसीसीआयच्या सूचनेनुसार संघातून मुक्त केले होते. बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या कथित अत्याचारांच्या निषेधार्थ भारतात मोठ्या प्रमाणावर जनक्षोभ निर्माण झाला होता. यामुळे रहमानला आयपीएलमध्ये खेळवण्यास विरोध झाला आणि अखेर त्याला रिलीज करण्यात आले.


आयसीसीची भूमिका : रहमानच्या प्रकरणानंतर बांगलादेश सरकारनेही आक्रमक भूमिका घेत भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या बहिष्काराची धमकी दिली. बीसीबीने आयसीसीला पत्र लिहून भारतात सामने न खेळण्याची भूमिका मांडत ते श्रीलंकेत हलवण्याची मागणी केली. खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे करत बांगलादेशने आयपीएलचे आपल्या देशातील प्रसारणही थांबवले होते. मात्र आयसीसीने सर्व बाबींचा विचार करून ठाम भूमिका घेत बांगलादेशला भारतातच येऊन सामने खेळावे लागतील, असे स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे बांगलादेशवर दबाव वाढला असून, विश्वचषकात सहभाग कायम ठेवण्यासाठी भारतात येण्याशिवाय पर्याय नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Comments
Add Comment

Indian Team Schedule : जुलै महिन्यात भारतीय संघ किती सामने खेळणार ? जाणून घ्या संपू्र्ण वेळपत्रक; इंग्लंडमध्ये किती सामने होणार ?

मुंबई : भारतीय संघ पुढच्या महिन्यात (जुलै) इंग्लंच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात दोन दिग्गज पुनरागमन करणार

Vaibhav Sooryvanshi : आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत वैभव सूर्यवंशी रचणार इतिहास ! रोहित- हार्दिकचा विक्रम मोडणार ?

Mumbai: भारत आणि आयर्लंड यांच्यात आज (२६ जून) पासून दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेची सुरुवात होणार आहे. या मालिकेचा

FIFA WORLDCUP 2026 : ऑस्ट्रेलियाची बाद फेरीत धडक; पॅराग्वेच्याही आगेकूचची शक्यता

सँटा क्लारा, कॅलिफोर्निया : ऑस्ट्रेलिया आणि पॅराग्वे यांच्यातील सामना गोलशून्य (०-०) बरोबरीत सुटल्यामुळे 'सॉकरूस'

FIFA WORLDCUP 2026 : जपान आणि स्वीडनची बाद फेरीत धडक; सामना १-१ ने अनिर्णित

अर्लिंग्टन, टेक्सास : जपान आणि स्वीडन यांच्यातील अटीतटीचा सामना १-१ असा बरोबरीत सुटला असला तरी, या निकालासह

FIFA WORLDCUP 2026 : डच संघाचा दणदणीत विजय; ट्युनिशियाला नमवून विश्वचषकाच्या बाद फेरीत अव्वल स्थान

कॅन्सस सिटी, मिसूरी: पावसाळी हवामान आणि विजांच्या कडकडाटाच्या व्यत्ययानंतरही नेदरलँड्सने ट्युनिशियावर ३-१ असा

FIFA WORLDCUP 2026 : इक्वेडोरची ऐतिहासिक कामगिरी; जर्मनीवर मात करत विश्वचषकाच्या बाद फेरीत धडक

ईस्ट रदरफोर्ड, एनजे : गोंझालो प्लाटाच्या निर्णायक गोलच्या जोरावर इक्वेडोरने बलाढ्य जर्मनीवर २-१ ने विजय मिळवत