तृणमूलच्या आयटी विभागावर ईडीची रेड

नवी दिल्ली  : पश्चिम बंगालच्या राजकारणात गुरुवारी पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे. गुरुवारी सकाळी अंमलबजावणी संचालनालयाने निवडणूक रणनीतीकार संस्था आयपीएसीचे प्रमुख प्रतीक जैन यांच्या कोलकात्यातील निवासस्थानासह देशभरातील १५ ठिकाणांवर छापेमारी केली. या कारवाईची बातमी समजताच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी संताप व्यक्त करत थेट छापेमारी सुरू असलेल्या ठिकाणी पोहोचल्या आणि आयटी ऑफिसमधील अनेक फाईल घेऊन आपल्या गाडीत ठेवल्या आहेत.


छापेमारी सुरू असलेल्या ठिकाणी पोहोचल्यानंतर माध्यमांशी बोलताना ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर लोकशाही चिरडल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या, ‘केंद्र सरकार तपास यंत्रणांचा वापर करून विरोधकांना डरावण्याचा प्रयत्न करत आहे. हा लोकशाहीचा गळा आवळण्याचा प्रकार आहे. केंद्रीय गृहमंत्रालय आणि तपास यंत्रणा देशाप्रति आपली जबाबदारी विसरल्या आहेत. मला अशा प्रकारच्या कारवाईची पूर्वसूचना मिळाली होती. त्यामुळे पक्षाशी संबंधित सर्व महत्त्वाचे डेटा आणि हार्ड डिस्क आधीच सुरक्षित करण्यात आल्या आहेत. आमच्या आयटी ऑफिसवर यापूर्वीही हल्ले झाले आहेत, पण आम्ही या राजकीय षडयंत्राला घाबरणार नाही’, असे ममता यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने ही कारवाई फर्जी सरकारी नोकरी नियुक्ती पत्रांच्या घोटाळ्याशी तसेच कोळसा घोटाळा प्रकरणासंबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात केली आहे. सहा राज्यांमध्ये एकाच वेळी १५ ठिकाणी ही छापेमारी सुरू आहे. एका संघटित टोळीने हा मोठा घोटाळा केल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.

Comments
Add Comment

India Post GDS Recruitment 2026 : ना परीक्षा, ना मुलाखत! भारतीय डाक विभागात मेगा भरती; केवळ १० वी पासवर केंद्र सरकारमध्ये व्हा भरती

नवी दिल्ली : नवीन वर्षात केंद्र सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी भारतीय डाक विभागाने (India Post) आनंदाची

रात्री उशिरा महिलेने केली ऑर्डर, Blinkit Delivery Boy ला जे आढळले, ते पाहून थरकाप उडेल

तामिळनाडू : तामिळनाडूमधील घटनेवरुन समजते की माणुसकी अजून जिवंत आहे...Blinkit च्या एका डिलिव्हरी बॅायला रात्री एक

भारताची अमेरिकेला निर्यात थांबणार?

अमेरिकेकडून रशियावर ५०० टक्के आयात कर ब्राझिल आणि चीनलाही इशारा पुतिन निष्पाप लोकांची हत्या करत असल्याचा

देशातील पहिल्या ‘डिजिटल जनगणने’ला एक एप्रिलपासून सुरुवात

नवी दिल्ली : भारत सरकार २०२७ मध्ये जनगणना करणार आहे. या जनगणनेचा पहिला टप्पा, म्हणजेच घरांची यादी बनवण्याचे काम, १

तामिळनाडूतील निवडणुकीसाठी भाजपची ५६ जागा आणि ३ मंत्रिपदांची मागणी

चेन्नई  : भाजपने मागील वर्षी तामिळनाडूत जयललिता यांचा पक्ष एआयडिएमके यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक

पोलीस भरतीच्या वयोमर्यादेत ३ वर्षांची सवलत

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश पोलीस दलात भरती होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या लाखो तरुणांसाठी योगी सरकारने नववर्षाची