पुणेकरांचा बोपदेव घाट वाहतुकीसाठी ७ दिवस बंद; वाहतुकीत होणार 'हे' बदल

पुणे : पुण्यातील वाहतुकीत सध्या मोठा बदल करण्यात आला आहे. याच कारण म्हणजे पुण्यातील पुणे - सासवड ला जोडणारा बोपदेव घाट पुढील काही दिवसांसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवासासाठी पुणेकरांची प्रचंड धांदल उडणार आहे. बोपदेव हा घाट फक्त सासवड - कोंढवा या ठिकाणच्या प्रवाश्यांसाठीच नाही तर पुरंदरसह अनेक तालुक्यांसाठी महत्वाचा दुवा आहे. बोपदेव घाट हा आजपासून ते पुढील ७ दिवसांपर्यत बंद करण्यात आला आहे. त्यामुळे घाटातून नेहमी प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांसाठी ही बातमी महत्वाची आहे.


बोपदेव घाट बंद करण्याचं कारण म्हणजे बोपदेव घाटात सुरु असलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचं आणि विस्तारीकरणाच्या कामामुळे हा मार्ग आजपासून बुधवार पर्यंत म्हणजेच १४ जानेवारी पर्यंत बंद करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने हे काम हाती घेतले असून कामाचा दर्जा आणि सुरक्षितता राखण्यासाठी घाट बंद ठेवण्यात येणार आहे.



पर्यायी मार्ग


घाट बंद ठेवण्यात येणार असलयाने प्रवाश्यांनी दिवे घाट, नारायणपूर मार्गे चिव्हेवाडी घाटाचा वापर करावा असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून केले आहे.


बोपदेव घाटामध्ये दुरुस्तीचे काम सुरु राहणार असलयाने या कालावधीत एकेरी वाहतूकही सुरु राहणार नसल्याने वाहनचालकांनी या घाटाच्या दिशेने जाऊच नये. त्याऐवजी नेमून दिलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करावा. दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यासाठी आणि हे काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Comments
Add Comment

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी