पुणेकरांचा बोपदेव घाट वाहतुकीसाठी ७ दिवस बंद; वाहतुकीत होणार 'हे' बदल

पुणे : पुण्यातील वाहतुकीत सध्या मोठा बदल करण्यात आला आहे. याच कारण म्हणजे पुण्यातील पुणे - सासवड ला जोडणारा बोपदेव घाट पुढील काही दिवसांसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवासासाठी पुणेकरांची प्रचंड धांदल उडणार आहे. बोपदेव हा घाट फक्त सासवड - कोंढवा या ठिकाणच्या प्रवाश्यांसाठीच नाही तर पुरंदरसह अनेक तालुक्यांसाठी महत्वाचा दुवा आहे. बोपदेव घाट हा आजपासून ते पुढील ७ दिवसांपर्यत बंद करण्यात आला आहे. त्यामुळे घाटातून नेहमी प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांसाठी ही बातमी महत्वाची आहे.


बोपदेव घाट बंद करण्याचं कारण म्हणजे बोपदेव घाटात सुरु असलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचं आणि विस्तारीकरणाच्या कामामुळे हा मार्ग आजपासून बुधवार पर्यंत म्हणजेच १४ जानेवारी पर्यंत बंद करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने हे काम हाती घेतले असून कामाचा दर्जा आणि सुरक्षितता राखण्यासाठी घाट बंद ठेवण्यात येणार आहे.



पर्यायी मार्ग


घाट बंद ठेवण्यात येणार असलयाने प्रवाश्यांनी दिवे घाट, नारायणपूर मार्गे चिव्हेवाडी घाटाचा वापर करावा असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून केले आहे.


बोपदेव घाटामध्ये दुरुस्तीचे काम सुरु राहणार असलयाने या कालावधीत एकेरी वाहतूकही सुरु राहणार नसल्याने वाहनचालकांनी या घाटाच्या दिशेने जाऊच नये. त्याऐवजी नेमून दिलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करावा. दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यासाठी आणि हे काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Comments
Add Comment

Ashok Kharat Case : नाशिक खरात प्रकरण: मंदिरातील देणग्या ते परदेशी दुव्यांपर्यंत SIT ची चौकशी

मुंबई : नाशिकमधील अशोक खरात प्रकरणात तपास दिवसेंदिवस अधिक व्यापक होत असून, विशेष तपास पथक (SIT) विविध अंगांनी चौकशी

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन