इम्तियाज जलील यांच्या गाडीवर कार्यकर्त्यांचा हल्ला

काळे झेंडे दाखवत नाराजांचा राडा


छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकांसाठी प्रचार अंतिम टप्प्यात आला असून राजकीय वातावरण तापले आहे. यंदा मराठवाड्याची राजधानी संभाजीनगर महापालिकेकडे राज्याचे लक्ष लागले आहे. दोन शिवसेना, भाजप व एमआयएम पक्ष येथे ताकदीने निवडणूक लढवत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीही मैदानात आहे. एमआयएम पक्षातील नाराज गटाकडून माजी खासदार व पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांच्या कारवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. धावत्या कारच्या मागे पळून जलील यांना बाहेर काढून मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती आहे.


छत्रपती संभाजीनगरमधील बायजीपुरा येथे एमआयएमचे कार्यकर्ते व एमआयएमचे नाराज गटातील कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला. एमआयएम कार्यकर्ते व नाराज असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली असून नाराज कार्यकर्त्यांनी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला चढवला, तर काहींनी त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा झाला आहे.


काँग्रेसचे उमेदवार कलीम कुरेशी यांनी हल्ला केल्याचा आरोप


इम्तियाज जलील यांची प्रचार रॅली बायजीपुरा परिसरातून जात असताना काही तरुणांनी त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर रॅली पुढे गेली, पण रॅली संपताच अचानक काही तरुण जलील यांच्या गाडीच्या दिशेने चाल करून आले. यावेळी दोन गट समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार केला. जलील यांनी हा हल्ला कॉँग्रेसचे उमेदवार कलीम कुरेशी यांनी केल्याचा आरोप केला.

Comments
Add Comment

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे