करप्ट लोकांची स्क्रिप्टेड मुलाखत, वाघासमोर ‘टॉम अँड जेरी’चा केविलवाणा प्रयत्न!” - शिवसेना प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांचा घणाघाती आरोप

मुंबई : शिवसेना (शिंदे गट) प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांनी विरोधकांच्या तथाकथित मुलाखतीवर जोरदार टीका करत, ती “करप्ट लोकांची स्क्रिप्टेड मुलाखत” असल्याचा आरोप केला आहे. या टीकेदरम्यान उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांनी थेट शब्दांत सांगितले की, एकनाथ शिंदे यांच्या राजकीय धसक्यानेच आज हे सगळे नाट्य रचले जात आहे. ठाकरे बंधूंच्या नावांचा थेट उल्लेख न करता डॉ. वाघमारे म्हणाल्या, “ज्या दोन भावांनी वर्षानुवर्षे एकमेकांचे चेहरेही पाहिले नाहीत, ते आज एकाच सोफ्यावर बसले आहेत. ही एकता नाही, तर एकनाथ शिंदे नावाच्या वादळाने उडवलेली झोप आहे.” त्यांच्या मते, जनतेला हे स्पष्ट दिसत आहे की सत्ता गेल्यावर अचानक आलेली ‘एकजूट’ ही केवळ राजकीय मजबुरी आहे.


विरोधकांवर खोचक टीका करत त्या म्हणाल्या, “ही ‘टॉम अँड जेरी’ची जोडी कितीही प्रयत्न केले, तरी वाघाला म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांना आव्हान देऊ शकणार नाही.” जनतेचा कौल आणि वास्तवातलं प्रशासन यामध्ये जमीनअस्मानाचं अंतर असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं.


डॉ. वाघमारे यांनी थेट सवाल केला, “मुख्यमंत्री असताना अडीच वर्षे घराबाहेर न पडणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आज अचानक जनतेच्या दुःखाची आठवण कशी झाली? तेव्हा प्रशासन कुठे होतं? शेतकरी, कामगार, सामान्य जनता त्रस्त असताना हे लोक काय करत होते?”


ही संपूर्ण मुलाखत म्हणजे राजकारण नव्हे तर सिनेमाचा सेट असल्याची टीका करत त्या म्हणाल्या, “राजकारणाला सिनेमा समजून कितीही मोठे सेट उभे केले, मुलाखतींचे खेळ खेळले, तरी ‘बडे मियाँ-छोटे मियाँ’ची ही जोडी आता पूर्णपणे आऊटडेटेड झाली आहे.” शेवटी त्यांनी ठामपणे सांगितले की, “स्क्रिप्टेड मुलाखती, बनावटी एकजूट आणि खोटा कळवळा महाराष्ट्राची जनता ओळखते. खरी स्क्रिप्ट आता जनता लिहिणार आहे आणि त्यात एकनाथ शिंदे यांचे काम बोलणार आहे.”

Comments
Add Comment

महापालिका सभागृहात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाहिली श्रध्दांजली

मुंबई: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानिमित्त महापालिका सभागृहात शोक प्रस्तावाद्वारे

Drink and Drive New Rules Maharashtra: दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर...; परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील महामार्गांवर होणारे अपघात रोखण्यासाठी परिवहन विभागाने आता कंबर कसली आहे. विशेषतः समृद्धी

Vidarbha Railway: गोंदिया ते जबलपूर रेल्वे प्रकल्पाला केंद्र सरकारची मंजुरी

मुंबई: गोंदिया ते जबलपूर रेल्वे प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार असून या मार्गाच्या दुहेरीकरणाला अखेर केंद्र

आर्थिक बेशिस्तीला मुख्यमंत्री फडणवीसांचा लगाम

११ हजार ९९५ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर; वित्तीय शिस्त राखताना अत्यावश्यक बाबींना दिले प्राधान्य मुंबई :

गरजूंपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहचविणे हीच खरी देशसेवा

मुंबई : देशातील गरीब व्यक्तींपर्यंत विनासायास व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा पोहोचविणे हे आपले प्रमुख ध्येय

फिटनेस स्टार मयांक पवार याचे ३७ व्या वर्षी आकस्मिक निधन

मुंबई : रिअ‍ॅलिटी शोच्या दुनियेतून प्रसिद्धी मिळवलेले आणि फिटनेस क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करणारे