धर्मस्वातंत्र्य कायद्यामुळे आमिष, बळजबरी करणाऱ्यांचे कंबरडे मोडणार!

मुंबई : राज्यातील १४ कोटी जनतेच्या सुरक्षिततेसाठी आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने 'धर्मस्वातंत्र्य विधेयक' मंजूर केले आहे. आमिष किंवा दबाव टाकून धर्मांतर करणाऱ्या संस्थांचे कंबरडे आता या कायद्यामुळे मोडले जाईल.," असे सांगून या कायद्याचे समर्थन करणारे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभारही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मानले.


बावनकुळे म्हणाले की, "देशातील १२ राज्यांनी यापूर्वीच हा कायदा केला असून आता महाराष्ट्रही त्यात सामील झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायदा करताना अतिशय काळजीपूर्वक मांडणी केली आहे. तथापि, या विषयावरून आमदार जितेंद्र आव्हाडांचे मानसिक संतुलन बिघडले. ते केवळ आपल्या मतदारसंघातील ७० टक्के विशिष्ट मतदारांना खूश करण्यासाठी गलिच्छ राजकारण करत आहेत.


* समन्वय समितीची बैठक पुढील आठवड्यात : महायुतीची समन्वय समितीची बैठक पुढील आठवड्यात होईल आणि मित्रपक्षांनी मांडलेल्या मुद्द्यांवर तिथे सविस्तर चर्चा केली जाईल.


* तक्रार जशी आली, तशी पुढे ! : आमदार नरेंद्र मेहता यांच्या विरोधातील तक्रारीबाबत बावनकुळे म्हणाले, मंत्री म्हणून माझ्याकडे कुणीही तक्रार केली, तर तिची चौकशी करण्याचे आदेश देणे हे माझे कर्तव्य आहे. मंत्रालयातील कामकाजाच्या पद्धतीनुसार, तक्रार अर्ज जसा येतो तसाच तो चौकशीसाठी संबंधित कार्यालयाकडे पाठवला जातो. यात कोणताही वैयक्तिक हस्तक्षेप नाही. नरेंद्र मेहता यांनी काहीही चुकीचे केलेले नाही"


* ओरिसात मोदींच्या विकासापुढे काँग्रेस हतबल : ओडिशा राज्यसभा निवडणुकीत भाजपाचे केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून विजयानंतर आपली भूमिका स्पष्ट करताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओरिसामध्ये जी विकासकामे केली आहेत, त्या कामांच्या जोरावर तेथील काँग्रेसचे आमदारही आता आपल्याच पक्षाला मतदान करायला तयार नाहीत. 'तुम्ही आता विकास करू शकत नाही, केवळ भाजपच विकास करू शकतो' असे ठणकावून सांगत काँग्रेसच्या आमदारांनी सर्वांसमक्ष भाजपला मतदान केले आहे. ओरिसाचे राजकारण बदलण्याच्या दृष्टीने हा मोठा प्रयत्न असून मोदींच्या विकासाची ही लाट आता देशव्यापी झाली आहे."

Comments
Add Comment

Anant Ambani : हिप्पोंना मारु नका, वनतारामध्ये पाठवा; अनंत अंबानी यांची कोलंबिया सरकारला विनंती

मुंबई : उद्योगपती अनंत अंबानी यांचे प्राणीप्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे. दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात

Mumbai News : मुंबईत पाण्याचा निचरा करण्यासाठी ५४७ पंपांची आणि फिरते डीवॉटरिंग पंप असणाऱ्या १० वाहनांची व्यवस्था

मुंबईत यंदा पाणी साचण्याची फक्त ८० ठिकाणे मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची

BMC News : 'मध्य वैतरणा प्रकल्प राबवताना तुमचे पर्यावरण प्रेम कुठे होते?'

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने गारगाई पाणी प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी स्थायी समिती व महापालिका

single-window clearance : लाईव्ह इव्हेंट्स परवानगीसाठी ‘एक खिडकी’ सुविधा

मुंबई : राज्यातील लाईव्ह मनोरंजन क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लाईव्ह

Godavari to Narmada : असा होणार गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचा समारोप समारंभ

मुंबई : जलव्यवस्थापन अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि जनसहभागातून प्रभावी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या

Seeds Act : राज्याचा स्वतंत्र बियाणे कायदा करणार

मुंबई : शेतकऱ्यांना स्वतःचे बियाणे साठवणे, वापरणे, देवाणघेवाण करणे आणि (ब्रँडेड नाव न वापरता) विक्री करण्यास