धर्मस्वातंत्र्य कायद्यामुळे आमिष, बळजबरी करणाऱ्यांचे कंबरडे मोडणार!

मुंबई : राज्यातील १४ कोटी जनतेच्या सुरक्षिततेसाठी आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने 'धर्मस्वातंत्र्य विधेयक' मंजूर केले आहे. आमिष किंवा दबाव टाकून धर्मांतर करणाऱ्या संस्थांचे कंबरडे आता या कायद्यामुळे मोडले जाईल.," असे सांगून या कायद्याचे समर्थन करणारे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभारही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मानले.


बावनकुळे म्हणाले की, "देशातील १२ राज्यांनी यापूर्वीच हा कायदा केला असून आता महाराष्ट्रही त्यात सामील झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायदा करताना अतिशय काळजीपूर्वक मांडणी केली आहे. तथापि, या विषयावरून आमदार जितेंद्र आव्हाडांचे मानसिक संतुलन बिघडले. ते केवळ आपल्या मतदारसंघातील ७० टक्के विशिष्ट मतदारांना खूश करण्यासाठी गलिच्छ राजकारण करत आहेत.


* समन्वय समितीची बैठक पुढील आठवड्यात : महायुतीची समन्वय समितीची बैठक पुढील आठवड्यात होईल आणि मित्रपक्षांनी मांडलेल्या मुद्द्यांवर तिथे सविस्तर चर्चा केली जाईल.


* तक्रार जशी आली, तशी पुढे ! : आमदार नरेंद्र मेहता यांच्या विरोधातील तक्रारीबाबत बावनकुळे म्हणाले, मंत्री म्हणून माझ्याकडे कुणीही तक्रार केली, तर तिची चौकशी करण्याचे आदेश देणे हे माझे कर्तव्य आहे. मंत्रालयातील कामकाजाच्या पद्धतीनुसार, तक्रार अर्ज जसा येतो तसाच तो चौकशीसाठी संबंधित कार्यालयाकडे पाठवला जातो. यात कोणताही वैयक्तिक हस्तक्षेप नाही. नरेंद्र मेहता यांनी काहीही चुकीचे केलेले नाही"


* ओरिसात मोदींच्या विकासापुढे काँग्रेस हतबल : ओडिशा राज्यसभा निवडणुकीत भाजपाचे केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून विजयानंतर आपली भूमिका स्पष्ट करताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओरिसामध्ये जी विकासकामे केली आहेत, त्या कामांच्या जोरावर तेथील काँग्रेसचे आमदारही आता आपल्याच पक्षाला मतदान करायला तयार नाहीत. 'तुम्ही आता विकास करू शकत नाही, केवळ भाजपच विकास करू शकतो' असे ठणकावून सांगत काँग्रेसच्या आमदारांनी सर्वांसमक्ष भाजपला मतदान केले आहे. ओरिसाचे राजकारण बदलण्याच्या दृष्टीने हा मोठा प्रयत्न असून मोदींच्या विकासाची ही लाट आता देशव्यापी झाली आहे."

Comments
Add Comment

Navnath Ban : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा; ‘राहुल गांधींच्या रिलाँचिंगसाठी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक’

मुंबई : आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या सरकारने चर्चेच्या माध्यमातून मान्य केल्या असून, त्यानंतरही

Raksha Bandhan : राष्ट्रपतींसह अन्य नेत्यांनी देशवासीयांना रक्षाबंधन सणाच्या दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह

PMJDY :'प्रधानमंत्री जन धन योजने'ला 12 वर्षे पूर्ण, 59.09 कोटी खाती उघडली, 3.17 लाख कोटी रुपये जमा

56% खातेधारक महिला आहेत तर 78% खाती ग्रामीण व निम-शहरी भागांमधील आहेत देशभरात डिजिटल पेमेंट आणि आर्थिक

USA Murder Case : अमेरिकेत प्रेयसीची हत्या केली, भारतात ठिकाना लावला...अन् आरोपीला आग्र्यातून अटक!

अमेरिकेत आपल्या प्रेयसीची भयंकर हत्या करून भारतात पळून आलेल्या एका आरोपीला आग्रा येथून पोलिसांनी अटक केली आहे.

Jal Jeevan Mission : भूजल निधीच्या मनमानी खर्चाला चाप, पाणीटंचाईग्रस्त गावांना मिळणार प्राधान्य; ‘जल जीवन मिशन’ला बळकटी देण्यासाठी विशेष धोरण

मुंबई : केंद्र सरकार, जागतिक बँक आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) भूजल पातळी वाढवण्यासाठी मिळणारा निधी

Ahilyangar Crime : ‘पैसे अन् सोनं सिद्ध करून देतो’ म्हणत महिलेची 45 हजारांची फसवणूक, भोंदू साधू गजाआड

Ahilyangar Crime : ‘पैसे आणि सोन्याची अंगठी सिद्ध करून देतो’, असा बहाणा करत महिला व्यापाऱ्याची तब्बल 45 हजार रुपयांची फसवणूक