धर्मस्वातंत्र्य कायद्यामुळे आमिष, बळजबरी करणाऱ्यांचे कंबरडे मोडणार!

मुंबई : राज्यातील १४ कोटी जनतेच्या सुरक्षिततेसाठी आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने 'धर्मस्वातंत्र्य विधेयक' मंजूर केले आहे. आमिष किंवा दबाव टाकून धर्मांतर करणाऱ्या संस्थांचे कंबरडे आता या कायद्यामुळे मोडले जाईल.," असे सांगून या कायद्याचे समर्थन करणारे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभारही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मानले.


बावनकुळे म्हणाले की, "देशातील १२ राज्यांनी यापूर्वीच हा कायदा केला असून आता महाराष्ट्रही त्यात सामील झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायदा करताना अतिशय काळजीपूर्वक मांडणी केली आहे. तथापि, या विषयावरून आमदार जितेंद्र आव्हाडांचे मानसिक संतुलन बिघडले. ते केवळ आपल्या मतदारसंघातील ७० टक्के विशिष्ट मतदारांना खूश करण्यासाठी गलिच्छ राजकारण करत आहेत.


* समन्वय समितीची बैठक पुढील आठवड्यात : महायुतीची समन्वय समितीची बैठक पुढील आठवड्यात होईल आणि मित्रपक्षांनी मांडलेल्या मुद्द्यांवर तिथे सविस्तर चर्चा केली जाईल.


* तक्रार जशी आली, तशी पुढे ! : आमदार नरेंद्र मेहता यांच्या विरोधातील तक्रारीबाबत बावनकुळे म्हणाले, मंत्री म्हणून माझ्याकडे कुणीही तक्रार केली, तर तिची चौकशी करण्याचे आदेश देणे हे माझे कर्तव्य आहे. मंत्रालयातील कामकाजाच्या पद्धतीनुसार, तक्रार अर्ज जसा येतो तसाच तो चौकशीसाठी संबंधित कार्यालयाकडे पाठवला जातो. यात कोणताही वैयक्तिक हस्तक्षेप नाही. नरेंद्र मेहता यांनी काहीही चुकीचे केलेले नाही"


* ओरिसात मोदींच्या विकासापुढे काँग्रेस हतबल : ओडिशा राज्यसभा निवडणुकीत भाजपाचे केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून विजयानंतर आपली भूमिका स्पष्ट करताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओरिसामध्ये जी विकासकामे केली आहेत, त्या कामांच्या जोरावर तेथील काँग्रेसचे आमदारही आता आपल्याच पक्षाला मतदान करायला तयार नाहीत. 'तुम्ही आता विकास करू शकत नाही, केवळ भाजपच विकास करू शकतो' असे ठणकावून सांगत काँग्रेसच्या आमदारांनी सर्वांसमक्ष भाजपला मतदान केले आहे. ओरिसाचे राजकारण बदलण्याच्या दृष्टीने हा मोठा प्रयत्न असून मोदींच्या विकासाची ही लाट आता देशव्यापी झाली आहे."

Comments
Add Comment

Ind vs Eng : भारत - इंग्लंड तिसरी ODI किती वाजता सुरू होणार ? कशी असेल लॉर्ड्सची खेळपट्टी ?

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा आणि निर्णायक सामना शनिवार १९ जुलै रोजी लंडन येथील लॉर्ड्स मैदानावर

US Visa : एफ-१ आणि जे-१ व्हिसाधारकांसाठी अमेरिकेचे नवे नियम; भारतीय विद्यार्थ्यांची वाढली चिंता

नवी दिल्ली : अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागाने (डीएचएस) स्थलांतराशी संबंधित एक नवा आणि कठोर नियम लागू

Jammu and Kashmir Flood : जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा कहर; 8 जणांचा मृत्यू, 6 बेपत्ता; अमरनाथ-वैष्णोदेवी यात्रा तात्पुरती स्थगित

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रविवारी मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली.

Maharashtra Weather : आनंदाची बातमी! महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होणार, कोकणात ४८ तासांत पाऊस पडणार

मुंबई : मागील दीड महिन्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. आता राज्यात पुन्हा एकदा

Vaishno Devi Yatra : हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे अमरनाथ आणि माता वैष्णो देवी यात्रा स्थगित

मुंबई : हवामान विभागाने दिलेल्या तीव्र हवामानाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून

Malad Sewage Treatment Plant : मालाड मलजल प्रक्रिया केंद्राला खारफुटीसह इतर परवानगी प्राप्त; महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी):  मुंबई मलनिस्सारण प्रकल्प विभागाने ४५४ दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेच्या मालाड मलजल