७२ तासांत बदलले तीन पक्ष; मतदार राजाही संभ्रमात!

उल्हासनगर : उल्हासनगरमधील प्रभाग क्रमांक १५ मध्ये अवघ्या ७२ तासांत घडलेल्या एका प्रकाराने महापालिका निवडणुकीतील राजकीय नैतिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या संपूर्ण पॅनेलने ऐनवेळी अर्ज मागे घेत, शिंदे गटाच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्याने उल्हासनगरच्या राजकारणात खळबळ उडाली. या प्रकारामुळे पक्षनिष्ठा, तत्त्व आणि विचारधारा यापेक्षा संधी महत्त्वाची ठरते का, असा थेट सवाल उपस्थित झाला आहे.


या प्रभागात नीलेश बोबडे, रवी वसिटा, सुरज कारकर आणि एक महिला उमेदवार हे सत्ताधारी भाजपचे कार्यकर्ते होते. पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी केली व राष्ट्रवादी (अजित पवार गट)कडून उमेदवारी अर्ज दाखल केला; परंतु अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी या चारही उमेदवारांनी अचानक उमेदवारी अर्ज मागे घेत,थेट शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला. परिणामी, प्रभाग क्रमांक १५ मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे संपूर्ण पॅनलच निवडणूक रिंगणातून बाहेर पडले.


तर अर्ज मागे घेण्याबाबत सुरज कारकर म्हणाले की, “आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधून अर्ज भरला होता, पण अर्ज मागे घेतल्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला खेद आहे. तसेच शिवसेनेचा आणि आमचा दृष्टिकोन एकच असल्याने आम्ही हा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, या पॅनलमधील काही उमेदवारांनी अवघ्या दोन दिवसांत भाजप - राष्ट्रवादी अजित पवार गट- शिवसेना शिंदे गट असा राजकीय प्रवास केल्याची चर्चा शहरात रंगली आहे. या घटनेमुळे निवडणुकीतील पक्षनिष्ठा, विचारसरणी आणि राजकीय नैतिकता या संकल्पनांवरच प्रश्नचिन्ह उभे राहिल्याच्या भावणा स्थानिक मतदारांनी व्यक्त केल्या.

Comments
Add Comment

देवेंद्र फडणवीसांच्या एका कॉलनं बदलला निर्णय, प्राजक्त तनपुरेंनी राहुरी पोटनिवडणुकीतून घेतली माघार

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरण्याची मुदत सोमवारी संपुष्टात आली आहे. या निवडणुकीत दिवंगत

Nagpur Crime : नागपूर हादरलं! पैशांसाठी १४ वर्षीय मित्राची निघृण हत्या

नागपूर : नागपूर शहरात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शहराला हादरवून सोडणाऱ्या १४ वर्षीय मुलाच्या अपहरण आणि

Gautami patil : गौतमी पाटीलच्या 'या' नवीन गाण्यानं घातला धूमाकूळ

मुंबई : आपल्या मनमोहक अदांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारी महाराष्ट्राची लाडकी नृत्यागंणा गौतमी पाटील ( Gautami Patil ) चा

Gautami Patil : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर गौतमी पाटीलनं दिली प्रतिक्रिया, म्हणाली...

नाशिक : नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरातचे दिवसेंदिवस अनेक काळे कारनामे समोर येत असून महिला लैंगिक शोषण, आर्थिक

Bigg Boss Marathi 6 : पहिला फायनलिस्ट कोण ठरणार ? तिकीट टू फिनालेची उत्सुकता वाढली

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन आता शेवटच्या टप्प्यात पोहचलं असून ११ जानेवारी २०२५ रोजी सुरु झालेल्या बिग बॉस मराठी

Ramayana Movie : रामायणमध्ये भूमिका साकारणार बिग बींचा जावई, 'या' महत्वाच्या भूमिकेत झळकणार

मुंबई : रामायण ( Ramayana ) सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु असून रामायणमधील रणबीर कपूर ( Ranbir Kapoor) चा पहिला लूक पाहिल्यानंतर