मीरा-भाईंदर महापालिकेत चार माजी महापौरांची प्रतिष्ठा पणाला

भाईंदर : मीरा-भाईंदर पालिकेच्या स्थापनेपासून आजपर्यंत पालिकेत महिलाराजच राहिलेले आहे. या काळात झालेल्या आठपैकी सहा वेळा महापौर बनण्याचा मान महिलांना मिळाला. त्यापैकी चार माजी महापौरांची प्रतिष्ठा निवडणुकीत पणाला लागली आहे.


मीरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीसाठी चार माजी महापौर विविध प्रभागांतून लढत देत आहेत. यातील तीन माजी महापौर भाजपकडून, तर एक माजी महापौर शिवसेनेकडून नशीब अजमावत आहे. महापौर पद हे सर्वाधिक काळ महिलांकडे राहिले तर उपमहापौरपदी सर्वाधिक काळ पुरुषांकडे राहिले. आठपैकी सात वेळा पुरुष उपमहापौर राहिले आहेत; मात्र त्यापैकी केवळ भाजपचे हसमुख गेहलोत माजी उपमहापौर निवडणूक लढवत आहेत. महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांच्या कार्यकाळात गेहलोत उपमहापौरपदी विराजमान होते.


निर्मला सावळे : मीरा-भाईंदर महापालिकेची २००२ मध्ये स्थापना झाल्यानंतर दुसरा महापौर होण्याचा मान निर्मला सावळे यांना मिळाला होता.


कॅटलीन परेरा : कॅटलीन परेरा माजी आमदार दिवंगत गिल्बर्ट मेंडोंसा यांच्या कन्या आहेत. २०१२ मध्ये महापौरपदी विराजमान झाल्या. शिवसेनेच्या विभाजनानंतर त्या शिंदे गटासोबत राहिल्या. त्या भाईंदर पश्चिम येथील प्रभाग आठमधून निवडणूक रिंगणात आहेत.


डिंपल मेहता : भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र मेहता यांच्या वहिनी डिंपल मेहता यांच्या गळ्यात २०१७ मध्ये माळ पडली. आता त्या पुन्हा एकदा मीरा रोड येथील प्रभाग १२ मधून निवडणूक लढवत आहेत.


जोत्स्ना हसनाळे : २०२२ मध्ये महापालिकेची मुदत संपतना ज्योत्स्ना हसनाळे महापौर होत्या. काशीमीरा येथील प्रभाग १४ मधून भाजपच्या तिकीटावर त्या नशीब अजमावत आहेत.

Comments
Add Comment

ठाणे आणि विरार बुलेट ट्रेन स्थानक होणार स्मार्ट; एमएमआरडीएचा मास्टर प्लॅन

प्रवाशांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध ठाणे : मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील महाराष्ट्रातील ठाणे

पाणीटंचाई विरोधात पीएनटी कॉलनीतील नागरिकांचा कडोंमपा मुख्यालयावर मोर्चा

२५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील डोंबिवली पूर्वेतील नांदिवली

मीरा-भाईंदरमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापौर सक्रिय

भाईंदर : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडीची समस्या, त्यामुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास तसेच

श्रद्धेच्या सान्निध्यातील शाश्वततेचा भव्य संकल्प ‘निसर्गायण’

टिटवाळा ठरणार पर्यावरण –पर्यटनाचे नवे केंद्र कल्याण : श्रद्धा, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणीय जबाबदारी यांचा

कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांचा पुन्हा हल्ला; ७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू, परिसरात संताप

कल्याण : काही दिवसांपूर्वीच कुत्र्याच्या चाव्यानंतर भीतीतून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती.

भटका कुत्रा चावला अन् तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

कल्याण : दहशतवादी संघटनांप्रमाणेच आता भटक्या कुत्रांचीही दहशत अनेक शहरात वाऱ्यासारखी परसरत आहेत. अनेक