मीरा-भाईंदर महापालिकेत चार माजी महापौरांची प्रतिष्ठा पणाला

भाईंदर : मीरा-भाईंदर पालिकेच्या स्थापनेपासून आजपर्यंत पालिकेत महिलाराजच राहिलेले आहे. या काळात झालेल्या आठपैकी सहा वेळा महापौर बनण्याचा मान महिलांना मिळाला. त्यापैकी चार माजी महापौरांची प्रतिष्ठा निवडणुकीत पणाला लागली आहे.


मीरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीसाठी चार माजी महापौर विविध प्रभागांतून लढत देत आहेत. यातील तीन माजी महापौर भाजपकडून, तर एक माजी महापौर शिवसेनेकडून नशीब अजमावत आहे. महापौर पद हे सर्वाधिक काळ महिलांकडे राहिले तर उपमहापौरपदी सर्वाधिक काळ पुरुषांकडे राहिले. आठपैकी सात वेळा पुरुष उपमहापौर राहिले आहेत; मात्र त्यापैकी केवळ भाजपचे हसमुख गेहलोत माजी उपमहापौर निवडणूक लढवत आहेत. महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांच्या कार्यकाळात गेहलोत उपमहापौरपदी विराजमान होते.


निर्मला सावळे : मीरा-भाईंदर महापालिकेची २००२ मध्ये स्थापना झाल्यानंतर दुसरा महापौर होण्याचा मान निर्मला सावळे यांना मिळाला होता.


कॅटलीन परेरा : कॅटलीन परेरा माजी आमदार दिवंगत गिल्बर्ट मेंडोंसा यांच्या कन्या आहेत. २०१२ मध्ये महापौरपदी विराजमान झाल्या. शिवसेनेच्या विभाजनानंतर त्या शिंदे गटासोबत राहिल्या. त्या भाईंदर पश्चिम येथील प्रभाग आठमधून निवडणूक रिंगणात आहेत.


डिंपल मेहता : भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र मेहता यांच्या वहिनी डिंपल मेहता यांच्या गळ्यात २०१७ मध्ये माळ पडली. आता त्या पुन्हा एकदा मीरा रोड येथील प्रभाग १२ मधून निवडणूक लढवत आहेत.


जोत्स्ना हसनाळे : २०२२ मध्ये महापालिकेची मुदत संपतना ज्योत्स्ना हसनाळे महापौर होत्या. काशीमीरा येथील प्रभाग १४ मधून भाजपच्या तिकीटावर त्या नशीब अजमावत आहेत.

Comments
Add Comment

भिवंडीत श्वानदंश झालेल्या मुलाचा मृत्यू

भिवंडी : श्वानदंश झालेल्या १२ वर्षीय हमीद खान याचा उपचारादरम्यान मृत्यूची घटना भिवंडीत घडली आहे. १० जानेवारीला

ठाण्यातील भव्य त्रिमंदिर भाविकांसाठी खुले; तीन दिवसांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनास सुरुवात

ठाणे : ठाणे शहरात उभारण्यात आलेले भव्य त्रिमंदिर अखेर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. तीन दिवस चाललेल्या

ठाणे-घोडबंदर रोडचे रुंदीकरण होणार?

मीरा-भाईंदर (वार्ताहर): ठाणे-घोडबंदर रस्ता ६० मीटर रुंद करण्यासाठी आवश्यक असणारी भूसंपादनाची प्रक्रिया

कोयना प्रकल्पग्रस्त सुविधांपासून वंचित

ठाणे ( प्रतिनिधी): साडेसहा दशकांपूर्वी सातारा जिल्ह्यातील कोयना धरण प्रकल्पात बाधित झालेल्या सुमारे ८०हून अधिक

ठाणे शहरात उभारणार १९ ई-वाहन चार्जिंग स्टेशन्स

ठाणे (प्रतिनिधी) : महापालिका क्षेत्रातील इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शहरात ई-वाहन वापराला

सायबर दृष्टी सेलचा डिजिटल साक्षरता प्रवास

कल्याण (प्रतिनिधी) : बी. के. बिर्ला नाईट कॉलेज, कल्याण येथील सायबर दृष्टी सेल यांच्या विद्यमाने नागरिकांमध्ये