बदलापूर MIDC : पॅसिफिक केमिकल फॅक्टरीत स्फोटांनंतर अग्नितांडव

बदलापूर : बदलापूर पूर्व महावितरण कार्यालयाजवळ पॅसिफिक ऑरगॅनिक केमिकल कंपनीत एका पाठोपाठ एक असे पाच ते सहा स्फोट झाले आहेत. अवघ्या तासाभरात झालेल्या या स्फोटांमुळे संपूर्ण एमआयडीसी परिसर हादरून गेला आहे. यानंतर मोठी आग लागली आहे. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण आग मोठी असल्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वेळ लागेल, असा प्राथमिक अंदाज आहे.  पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून कंपनीच्या दिशेने जाणारे सर्व मार्ग फक्त आपत्कालीन सेवांपुरते सुरू ठेवले आहेत. नागरिकांना घटनास्थळापासून दूर सुरक्षित अंतरावर जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


लागोपाठ झालेले स्फोट आणि मोठी आग यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. आग लागल्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यामुळे नागरिकांमधील भीतीची तीव्रता आणखी वाढली आहे. पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचे तसेच सहकार्य करण्याचे आणि सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन केले आहे. अफवा पसरवू नका आणि अफवांवर विश्वास ठेवू नका, असेही आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.


बदलापूरच्या खरवई एमआयडीसीमध्ये पॅसिफिक केमिकल कंपनीला शॉर्ट सर्किट झाल्यामुळे मोठी आग लागल्याची चर्चा आहे. पण अधिकृत माहिती आग नियंत्रणात आल्यानंतर तपास करुन दिली जाईल, असे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. आगीचे स्वरुप मोठे असल्यामुळे अग्निशमन दलाच्या १० गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आसपासच्या शहरांतून आणखी मदत मागवण्यात आल्याचे समजते.

Comments
Add Comment

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे