Agastya Nanda : बच्चन कुटुंबियाचा आभिनयाचा वारासा पुढे घेऊन जाण्यास नकार;अगस्त्य नंदा काय म्हणाला ?

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबातील सर्वच सदस्य फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठे नाव आहेत. स्वतः बिग बी, त्यांची पत्नी जया बच्चन, मुलगी श्वेता नंदा, मुलगा अभिषेक बच्चन आणि बहुतेक तिसऱ्या पिढीतील ऐश्वर्या राय बच्चन यांनी या क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे.त्यानंतर आता अगस्त्य नंदा, श्वेता नंदाचा मुलगा आणि अमिताभ बच्चनांचा नातू, यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. १ जानेवारी २०२६ रोजी रिलीज झालेल्या चित्रपट ‘इक्कीस’ मधून त्यांनी मोठ्या पडद्यावर डेब्यू केला. यामुळे बच्चन कुटुंबाची तिसरी पिढी मनोरंजन क्षेत्रात प्रवेश करते आहे.बच्चन परिवाराची फिल्म इंडस्ट्रीमध्ये वेगळीच झलक आहे पण...

पडद्यावर पदार्पणानंतरच, अगस्त्यने बच्चन कुटुंबाचा वारसा पुढे नेण्याबाबत केलेले वक्तव्य अनेकांना आश्चर्यचकित करणारे ठरले आहे. त्यांच्या विधानावर बॉलिवूडमध्ये आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे, आणि चाहते उत्सुकतेने त्यांच्या आगामी चित्रपटाची प्रतीक्षा करत आहेत.

बच्चन आणि कपूर कुटुंब हे बॉलिवूडमधील सर्वात प्रतिष्ठित आणि प्रभावशाली कुटुंबांपैकी आहेत. त्यातून येत असल्यामुळे तिसऱ्या पिढीवर सतत दबाव असतो, असा प्रश्न दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी अगस्त्य नंदाला विचारला.

त्यावर अगस्त्यने स्पष्ट शब्दांत उत्तर दिले...

"मी जराही दबाव जाणवत नाही, कारण तो माझा वारसा नाही. माझं आडनाव नंदा आहे, कारण सर्वात पहिले मी माझ्या वडिलांचा मुलगा आहे. त्यांना माझा अभिमान कसा वाटेल याचा मी विचार करतो आणि तो वारसा मी गांभीर्याने घेतो."

पुढे त्याने सांगितले...

"माझ्या कुटुंबातील इतर सदस्य, जे अभिनेते आणि अभिनेत्र्या आहेत, मला त्यांचं काम आवडतं आणि मी त्यांचं कौतुक करतो. पण मी त्यांच्यासारखा कधी बनू शकेन असं मला वाटत नाही. त्यामुळे त्याबाबत विचार करणं म्हणजे वेळेचा अपव्यय आहे."

अगस्त्यच्या या वक्तव्यामुळे स्पष्ट होते की, तो स्वतःच्या मार्गाने काम करायला इच्छुक आहे, आणि बच्चन कुटुंबाचा दबाव किंवा अपेक्षा त्याच्या निर्णयावर प्रभाव टाकत नाहीत..या वरुन सोशल मिडीयवर आणि अमिताभ बच्चन यांचे चाहत्यांमध्ये वेगळीच कुजबुज सुरु झाली आहे.या वरुन सर्व नेटकरी आपली टिपा टिपणी देताना दिसत आहेत...
Comments
Add Comment

Shruti Haasan: "म्हणून आमच्या घरात देवाचे कोणतेही फोटो नाही"; श्रुती हासनने केला अत्यंत मोठा खुलासा

मुंबई: एका मोठ्या तमिळ सुपरस्टारची मुलगी असूनही, श्रुती हासन या अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीत आपली स्वतःची अशी एक

Sachin Pilgaonkar: "प्रत्येकाला वेगळं असण्याचा हक्क आहे पण..."; सचिन पिळगावकर यांनी ट्रोलर्सना सुनावलं

मुंबई: सध्या सोशल मीडियावर अनेक सामान्य व्यक्तींपासून दिग्गज व्यक्तींना ट्रोल केलं जातं. सोशल मीडियावरून

मृणाल ठाकूरने ‘वध 2’चे केले कौतुक; नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांच्या अभिनयाचे भरभरून कौतुक

मुंबई : अभिनेत्री मृणाल ठाकूरने नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या बहुप्रतिक्षित

Sakhe G Sajani : 'सखे गं साजणी'तून उलगडणार तीन मित्रांची रंजक गोष्ट; ही' तगडी स्टारकास्ट झळकणार मुख्य भूमिकेत

मुंबई : खऱ्या मित्रांसोबत केलेला प्रवास हा केवळ ठिकाणं बदलण्यासाठी नसतो, तर तो स्वतःला शोधण्यासाठी आणि नाती अधिक

‘Vadh 2’ movie review : 'वध २' मध्ये पुन्हा एकदा दिसणार नीना गुप्ता-संजय मिश्रांची जादू!

मुंबई : चित्रपटसृष्टीत नेहमीच बंदिवास आणि सामाजिक नियंत्रणाच्या कथा प्रभावीपणे मांडल्या गेल्या आहेत. याच

मृणाल ठाकूरचे बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो व्हायरल; चाहते आश्चर्यचकित

Mrunal Thakur : दक्षिण चित्रपटसृष्टी गाजवलेली आणि तितकीच मराठमोळ्या चित्रपटांहून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी