२० दिवसांच्या एसटी भाड्यात महिनाभर प्रवास !

मुंबई : दररोज लालपरीने किंवा ई-बसने प्रवास करणाऱ्या नोकरदार आणि विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नवी ई बसपास योजना सुरू केली आहे. प्रवाशांच्या खिशाला परवडणारी आणि पर्यावरणपूरक प्रवासाला चालना देणारी 'नवीन मासिक आणि त्रैमासिक पास योजना' जाहीर करण्यात आली आहे. "२० दिवसांचे भाडे भरा आणि ३० दिवस बिनधास्त प्रवास करा," असे या योजनेचे मुख्य आकर्षण आहे. परिवहन मंत्री सरनाईक यांच्या संकल्पनेतून ही योजना साकारली आहे. खासगी वाहनांचा वापर कमी करून नागरिकांनी आरामदायी ई-बसकडे वळावे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. ९० दिवसांच्या प्रवासासाठी ६० दिवसांचे भाडे आकारले जाईल. येथे तब्बल एका महिन्याचे भाडे वाचणार आहे. ही सवलत महामंडळाच्या ताफ्यातील ९ मीटर आणि १२ मीटर ई-बसेस तसेच 'ई-शिवाई' बस सेवेसाठी लागू असेल. सध्या एसटीच्या ताफ्यात साधारणपणे ५०० हून अधिक ई-बसेस धावत असून, आगामी काळात ही संख्या आणखी वाढवण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

आर्थिक बेशिस्तीला मुख्यमंत्री फडणवीसांचा लगाम

११ हजार ९९५ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर; वित्तीय शिस्त राखताना अत्यावश्यक बाबींना दिले प्राधान्य मुंबई :

गरजूंपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहचविणे हीच खरी देशसेवा

मुंबई : देशातील गरीब व्यक्तींपर्यंत विनासायास व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा पोहोचविणे हे आपले प्रमुख ध्येय

अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूटमधील गैरव्यवहाराची चौकशी होणार

मुंबई : अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सापगाव (ता. शहापूर जि. ठाणे) मधील

मंत्री नितेश राणे यांच्या बंदरे खात्याची उल्लेखनीय कामगिरी

इंडिया मेरिटाईम वीक २०२५ मधील ५६ हजार कोटींचे करार राज्यासाठी ऐतिहासिक यश; आमदार प्रवीण दरेकर बंदरे विभागातील

BKC च्या ट्रॅफिकला ब्रेक! मेट्रो 2B चा महत्वाचा टप्पा पूर्ण

मुंबई : वांद्रे–कुर्ला संकुल आणि आसपासच्या भागातील वाहतूक ताण कमी करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले गेले आहे.

शाळांमध्ये झळकणार सरकारी योजनांचे फलक; शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

मुंबई : मुंबई विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना असून त्यांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे