‘एक्स’वर महिलांचे आक्षेपार्ह फोटो, 'एआय'च्या गैरवापराबद्दल खासदारांचं मोदी सरकारला पत्र!


नवी दिल्ली : शिवसेना (उबाठा)च्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी नुकतेच केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बनावट खात्यांचा वापर करून महिलांची आक्षेपार्ह छायाचित्रे पोस्ट करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) साधनांच्या कथित गैरवापराबद्दल चिंता व्यक्त केली. अशा प्रकारच्या कृतींमुळे महिलांच्या गोपनीयतेचे गंभीर उल्लंघन होते. त्यामुळे केंद्र सरकारने महिलांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली.


प्रियांका चतुर्वेदी यांनी पत्रात लिहिले आहे की, सोशल मीडियावर, विशेषतः 'एक्स'वर, एआय ग्रोकचा गैरवापर केला जात आहे. यामध्ये पुरुष बनावट खात्यांचा वापर करून महिलांचे फोटो पोस्ट करत आहेत. ग्रोकला चुकीच्या सूचना करून आक्षेपार्ह फोटो तयार करत आहेत. हे केवळ बनावट खात्यांद्वारे फोटो शेअर करण्यापुरते मर्यादित नाही, तर ज्या महिला स्वतःचे फोटो पोस्ट करतात त्यांनाही लक्ष्य केले जात आहे. हे अस्वीकार्य आहे आणि एआयचा हा घोर गैरवापर आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. याहून वाईट गोष्ट म्हणजे, ग्रोक अशा विनंत्या मान्य करून या वर्तनाला प्रोत्साहन देत आहे, असे त्या म्हणाल्या.


सदर प्रकार हा महिलांच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन आहे. तसेच महिलांच्या फोटोचा अनधिकृत वापर केला जात आहे, जो केवळ अनैतिकच नाही, तर गुन्हेगारी देखील आहे, असे त्यांनी म्हटले. प्रियांका चतुर्वेदी यांनी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'विरुद्ध निर्णायक कारवाई करण्याची आणि महिलांच्या ऑनलाइन सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी एआय-आधारित साधनांमध्ये सुरक्षा उपाय लागू करण्याची विनंती केली आहे.

Comments
Add Comment

आयएनएस ‘अरिदमन’ आणि ‘तारगिरी’ नौदलात दाखल

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथे आयोजित नेत्रदीपक सोहळ्यात स्वदेशी बनावटीची आयएनएस अरिदमन ही

West Bengal : पश्चिम बंगाल : मालदा हिंसाचाराच्या सूत्रधाराला अटक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील कालियाचक इथल्या हिंसाचाराचा सूत्रधार आणि एआयएमआयएम नेते

जन विश्वास विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर; वाहतूक कोंडी, ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणात होणारा विलंब हे आता गुन्हे नाहीत

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जन विश्वास विधेयकाला मंजुरी दिली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली की

संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते विशाखापट्टणममध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचे आणि स्टेल्थ फ्रिगेटचे जलावतरण

विशाखापट्टणम : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज (शुक्रवार ३ एप्रिल २०२६) विशाखापट्टणममध्ये

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न

Summer Special Train: उन्हाळ्यात घरी परतणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मुंबई-पुणे दरम्यान २१०० हून अधिक विशेष गाड्या धावणार

मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी घरी परतण्याची योजना आखणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेने