सेबी अध्यक्ष तुहीन कांता पांडे यांचे मोठे विधान.....सेबी सायबर सुरक्षेसाठी एआय टूल्स विकसित करण्याच्या तयारीत?

मुंबई: सेबीने 'इज ऑफ डुईंग बिझनेस' सह घोटाळ्याविरोधात कडक कायदे व कडक अनुपालन (Compliance) लागू करत असताना आणखी सायबर सुरक्षेसाठी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. याविषयी बोलताना सेबीचे अध्यक्ष तुहिन कांता पांडे यांनी सांगितले आहे की, 'सेबीने नियमन केलेल्या संस्थांच्या सायबर सुरक्षेच्या तयारीचे विश्लेषण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित साधन विकसित करण्याच्या प्रक्रियेत आहे. बीएसईमध्ये एका कार्यक्रमात बोलताना पांडे यांनी सेबी बाजार पायाभूत सुविधा संस्थांसाठी (MIIs) तंत्रज्ञान रोडमॅप विकसित करण्यासाठी एक कार्यगट स्थापन करण्याच्या प्रक्रियेत आहे असे म्हटले.


याविषयी अधिक बोलताना ते म्हणाले आहेत की,'नियमन केलेल्या संस्थांच्या जोखीमेवर अवलंबून असलेल्या पर्यवेक्षणाला बळकटी देण्यासाठी एआय आधारित तपासणी साधन सध्या विकसित केले जात आहे असे पांडे यांनी सर्वात सेन्सेक्सच्या ४० व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात बोलताना यानिमित्ताने स्पष्ट केले. सध्या मोठ्या प्रमाणात सायबर सुरक्षेचा प्रश्न भेडसावत असताना पुढे पांडे यांनी विकसित केले जाणारे हे साधन सायबर ऑडिट अहवालांचे विश्लेषण करेल नियंत्रणातील त्रुटी ओळखेल आणि संस्थांना त्यांच्या जोखमीच्या पातळीनुसार वर्गीकृत करेल असे सांगितले. तंत्रज्ञान रोडमॅप MIIs ला सिक्युरिटीज मार्केट इकोसिस्टमसाठी एक संरचित पाच वर्षांची  आणि १० वर्षांची धोरणात्मक तंत्रज्ञान दृष्टी (Technical Outlook) प्रदान करेल,असे पांडे यांनी पुढे म्हटले.


त्यांनी एक्सचेंज आणि इतर MIIs (Market Infrastructure Institutions) ना तंत्रज्ञान, जोखीम व्यवस्थापन आणि सायबर लवचिकतेमध्ये गुंतवणूक सुरू ठेवण्याचे आवाहन केले.'आपल्याला हे सुनिश्चित करावे लागेल की नावीन्यपूर्णता बाजाराची अखंडता कमकुवत नाही, तर मजबूत करते' असे ते म्हणाले.


गुंतवणूकदार वर्गातील वाढता सहभाग (Participation) आणि विविधीकरण (Diversification) या पार्श्वभूमीवर सेबी बाजाराची अखंडता टिकवून ठेवणाऱ्या नियामक रचनेला बळकटी देण्यावर लक्ष केंद्रित करत आहे, असे ते म्हणाले. 'दीर्घकाळ टिकणारे बाजार क्षणिक तेजी किंवा आशावादाच्या चक्रांवर तयार होत नाहीत. ते अशा संस्थांवर तयार होतात ज्या विश्वास निर्माण करतात, बाजारासोबत विकसित होणारे नियमन आणि सतत जुळवून घेणाऱ्या व अद्ययावत होणाऱ्या प्रणालींवर आधारित असतात' असे सेबी प्रमुख पांडे यांनी कार्यक्रमात बोलताना सूचित विधान केले आहे.

Comments
Add Comment

Palghar Accident : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना मदत जाहीर

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि

Prabhakar Shinde : मुंबई पूरमुक्त करण्यासाठी महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनामधील समन्वय आवश्यक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रेल्वे कल्वर्टच्या भिंतींची दुरुस्ती करून कल्वर्टचे पातमुख विस्तारण्यावर भर द्यावा.

Mayor Ritu Tawde : सुधा पार्क मार्गावरील समस्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी, महापौरांची Action मोहीम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर मधील सुधा पार्क रस्त्यावर दुतर्फा अनधिकृतरित्या उभी केली जाणारी वाहने आणि

Devendra Fadnavis : इंधन, परकीय चलन बचत आणि स्वदेशीला प्राधान्य देऊया!

मुंबई : "आखाती युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक संकटकाळात इंधन बचत, परकीय चलनाचे जतन आणि स्वदेशी वस्तूंना

Maharashtra : राज्यात पेट्रोल, डिझेल, LPG टंचाई नाही

मुंबई : पश्चिम आशियातील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

Underwater Tourism : सिंधुदुर्गात भारतातील पहिले अंडरवॉटर म्युझियम, कृत्रिम प्रवाळ आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प

सिंधुदुर्गनगरी : निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक वारसा आणि सागरी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग