Eknath Shinde : मुंबईत महायुतीची ललकारी! ६८ नगरसेवक बिनविरोध! ही विजयाची नांदी; शिंदेंनी फुंकले मुंबईत प्रचाराचे रणशिंग

"हा शुभारंभ नव्हे, विजयाची नांदी!" ६८ बिनविरोध जागांवरून एकनाथ शिंदेंचा हुंकार


मुंबईचा महापौर 'मराठीच' होणार! शिंदेंची काळ्या दगडावरची भगवी रेघ


मुंबई : "मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर होताच महायुतीचे ६८ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असून, आजची सभा हा प्रचाराचा शुभारंभ नसून विजयाची नांदी आहे," अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील प्रचाराचा शंखनाद केला. वांद्रे येथील 'डोम'मध्ये आयोजित महायुतीच्या महासभेत ते बोलत होते.


?si=5KC5GhFrVXHqcGtB

भ्रष्टाचाराच्या बकासुरापासून मुंबईची सुटका


एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "ही सभा म्हणजे मुंबईतील भ्रष्टाचाराविरोधातील एक मोठी ललकारी आहे. मुंबईला भ्रष्टाचाराच्या मगर मिठीतून आणि बकासुराच्या तावडीतून सोडवायचे आहे. लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ मिळून मुंबईवर महायुतीचा भगवा फडकवतील. मुंबईचा महापौर 'मराठीच' होणार, ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे."



'म' मलिद्याचा की मराठीचा? शिंदेंचा टोला


उद्धव ठाकरे आणि मनसेच्या संभाव्य जवळीकीवर निशाणा साधताना शिंदे म्हणाले, "जनतेने यांचा सीझन संपवल्यानंतर यांना आता व्हिजन आठवले आहे. यांनी मुंबईसाठी किंवा मराठी माणसासाठी केलेले एक तरी काम दाखवावे. यांचा 'म' हा मराठीचा नसून 'मलिद्याचा' आहे. आमचा 'म' मात्र मराठी, महाराष्ट्र आणि महायुतीचा आहे." त्यांनी पुढे स्पष्ट केले की, जनतेने बँड वाजवल्यानंतर यांना ब्रँडची आठवण झाली, पण खरा ब्रँड फक्त बाळासाहेब ठाकरे आणि सामान्य कार्यकर्ता आहे.



सूर्याजी पिसाळ कोण? टीकेला प्रत्युत्तर


'उबाठा' गटाकडून होणाऱ्या सूर्याजी पिसाळ या टीकेला प्रत्युत्तर देताना शिंदे आक्रमक झाले. "बाळासाहेबांचे विचार जपणारा सूर्याजी पिसाळ की विचारांचा खून करणारे सूर्याजी पिसाळ? हे जनतेला चांगलेच ठाऊक आहे. गेल्या वेळी माझ्या विनंतीवरून देवेंद्रजींनी मुंबईत शिवसेनेचा महापौर बसवला, पण हे लोक सत्तेसाठी लाचार झाले. आम्ही सत्तेसाठी गेलो नाही, तर मंत्रिपदावर पाणी सोडून तत्त्वासाठी बाहेर पडलो. आम्ही जीव गेला तरी तुमच्यासारखे लाचार होणार नाही," असे खडेबोल त्यांनी सुनावले.



विकासाचे वारकरी हवेत, मारेकरी नकोत


शिंदे यांनी संभाजीनगरमधील उमेदवारीवरूनही ठाकरेंना घेरले. "संभाजीनगरमध्ये रशीद मामूला तिकीट दिले, आज बाळासाहेब असते तर यांना उलटे टांगून फटके दिले असते," असे ते म्हणाले. तसेच, "दिवसभर नेटफ्लिक्स आणि निवडणुका आल्या की पॉलिटिक्स करण्याचा जमाना आता गेला आहे. मुंबईकरांना आता शहराचे मारेकरी नकोत, तर विकासाचे वारकरी हवे आहेत," असे म्हणत त्यांनी महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.

Comments
Add Comment

Mumabi News : समुद्राच्या मोठ्या भरतीने चौपाट्यांवर कचऱ्याचा खच

दहा दिवसांमध्ये २ हजार ४९९ मेट्रीक टन कचरा केला जमा मुंबई : मुंबईतील समुद्रकिनारे स्वच्छ, सुरक्षित आणि

BMC News : मुंबईकरांना जागतिक दर्जाची, सुलभ आणि उत्तरदायी आरोग्यसेवा

- मुंबई महानगरपालिका बनवत आहे टप्पेनिहाय आराखडा मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील नागरिकांना दर्जेदार,

Mumbai News : एकाच दिवशी मुंबईत २७ हजार ८६६ महिलांच्या कर्करोगाची तपासणी

मुंबईत २९८ ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी राबवले महिलांसाठी स्तन कर्करोग तपासणी शिबिर आशिया बूक रेकॉर्ड

Driving Licence Rules : १ ऑगस्टपासून ड्रायव्हिंग लायसन्सचे कडक नियम लागू!

- ड्रायव्हिंग लायसन्स काढताय? हे नवीन नियम नक्की पाहा! मुंबई : तुम्हाला माहितीये का? महाराष्ट्रात ड्रायव्हिंग

Devendra Fadnavis : उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ'

मुंबई(Mumbai) : राज्य शासनाच्या सर्वसमावेशक विकासाच्या धोरणाला उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वाची प्रभावी साथ

Ashadhi Wari Special Train : आषाढी वारीसाठी रेल्वेची मोठी भेट! CSMT–मिरज दरम्यान आणखी २ विशेष 'वन-वे' गाड्या; २३ जुलैपासून आरक्षण सुरू

मुंबई : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी आणि भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य