Eknath Shinde : मुंबईत महायुतीची ललकारी! ६८ नगरसेवक बिनविरोध! ही विजयाची नांदी; शिंदेंनी फुंकले मुंबईत प्रचाराचे रणशिंग

"हा शुभारंभ नव्हे, विजयाची नांदी!" ६८ बिनविरोध जागांवरून एकनाथ शिंदेंचा हुंकार


मुंबईचा महापौर 'मराठीच' होणार! शिंदेंची काळ्या दगडावरची भगवी रेघ


मुंबई : "मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर होताच महायुतीचे ६८ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असून, आजची सभा हा प्रचाराचा शुभारंभ नसून विजयाची नांदी आहे," अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील प्रचाराचा शंखनाद केला. वांद्रे येथील 'डोम'मध्ये आयोजित महायुतीच्या महासभेत ते बोलत होते.


?si=5KC5GhFrVXHqcGtB

भ्रष्टाचाराच्या बकासुरापासून मुंबईची सुटका


एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "ही सभा म्हणजे मुंबईतील भ्रष्टाचाराविरोधातील एक मोठी ललकारी आहे. मुंबईला भ्रष्टाचाराच्या मगर मिठीतून आणि बकासुराच्या तावडीतून सोडवायचे आहे. लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ मिळून मुंबईवर महायुतीचा भगवा फडकवतील. मुंबईचा महापौर 'मराठीच' होणार, ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे."



'म' मलिद्याचा की मराठीचा? शिंदेंचा टोला


उद्धव ठाकरे आणि मनसेच्या संभाव्य जवळीकीवर निशाणा साधताना शिंदे म्हणाले, "जनतेने यांचा सीझन संपवल्यानंतर यांना आता व्हिजन आठवले आहे. यांनी मुंबईसाठी किंवा मराठी माणसासाठी केलेले एक तरी काम दाखवावे. यांचा 'म' हा मराठीचा नसून 'मलिद्याचा' आहे. आमचा 'म' मात्र मराठी, महाराष्ट्र आणि महायुतीचा आहे." त्यांनी पुढे स्पष्ट केले की, जनतेने बँड वाजवल्यानंतर यांना ब्रँडची आठवण झाली, पण खरा ब्रँड फक्त बाळासाहेब ठाकरे आणि सामान्य कार्यकर्ता आहे.



सूर्याजी पिसाळ कोण? टीकेला प्रत्युत्तर


'उबाठा' गटाकडून होणाऱ्या सूर्याजी पिसाळ या टीकेला प्रत्युत्तर देताना शिंदे आक्रमक झाले. "बाळासाहेबांचे विचार जपणारा सूर्याजी पिसाळ की विचारांचा खून करणारे सूर्याजी पिसाळ? हे जनतेला चांगलेच ठाऊक आहे. गेल्या वेळी माझ्या विनंतीवरून देवेंद्रजींनी मुंबईत शिवसेनेचा महापौर बसवला, पण हे लोक सत्तेसाठी लाचार झाले. आम्ही सत्तेसाठी गेलो नाही, तर मंत्रिपदावर पाणी सोडून तत्त्वासाठी बाहेर पडलो. आम्ही जीव गेला तरी तुमच्यासारखे लाचार होणार नाही," असे खडेबोल त्यांनी सुनावले.



विकासाचे वारकरी हवेत, मारेकरी नकोत


शिंदे यांनी संभाजीनगरमधील उमेदवारीवरूनही ठाकरेंना घेरले. "संभाजीनगरमध्ये रशीद मामूला तिकीट दिले, आज बाळासाहेब असते तर यांना उलटे टांगून फटके दिले असते," असे ते म्हणाले. तसेच, "दिवसभर नेटफ्लिक्स आणि निवडणुका आल्या की पॉलिटिक्स करण्याचा जमाना आता गेला आहे. मुंबईकरांना आता शहराचे मारेकरी नकोत, तर विकासाचे वारकरी हवे आहेत," असे म्हणत त्यांनी महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.

Comments
Add Comment

BMC : गोकुळधाममध्ये पीपीपी तत्वावर दिलेल्या प्रसुतीगृहाच्या जागेत चालते शाळा

नगरसेविका प्रिती सातम यांनी केला संस्थेच्या कामांचा पुराव्यांसह पर्दाफाश चौकशी करून कारवाई करण्याचे

BMC News : आता तांत्रिक पाणीकपात टाळणार, महापालिकेची वतीने घेतली जाते खबरदारी

भांडुप संकुलातील विद्युत उपक्रेंद्राच्याठिकाणी उभारणार अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर मुंबई : मुंबईत (Mumbai) सध्या

Mumbai Rain : पावसामुळे अंधेरी सबवे बंद, शहरातील अनेक भाग जलमय; वाहतूक विस्कळीत

मुंबई : मुंबई आणि नवी मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली असून शहरातील अनेक सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी

Poison Capsule Case: विषारी कॅप्सूल वाटप प्रकरणात सायको किलरचा मास्टरप्लॅन; AI ला विचारले नको ते प्रश्न 

मुंबई: मुंबईतील (Mumbai) मोहरम मिरवणुकीदरम्यान विषारी कॅप्सूल वाटप (Poison Capsule Case) करण्याच्या संशयित कटाचा मुंबई

लोकल प्रवाशाच्या हत्येनंतर रेल्वे पोलिसांचा निर्णय; स्थानकांवर बॅगांची होणार तपासणी

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकल रेल्वेत प्रवाशाच्या हत्येनंतर रेल्वे पोलिसांनी

'निवडक प्रकल्पांमुळे पालघर जिल्हा होणार राज्याच्या विकासाचे ग्रोथ इंजिन'

वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, विमानतळ आणि सागरी सेतूची मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली पाहणी पालघर : राज्याच्या पायाभूत