Eknath Shinde : मुंबईत महायुतीची ललकारी! ६८ नगरसेवक बिनविरोध! ही विजयाची नांदी; शिंदेंनी फुंकले मुंबईत प्रचाराचे रणशिंग

"हा शुभारंभ नव्हे, विजयाची नांदी!" ६८ बिनविरोध जागांवरून एकनाथ शिंदेंचा हुंकार


मुंबईचा महापौर 'मराठीच' होणार! शिंदेंची काळ्या दगडावरची भगवी रेघ


मुंबई : "मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर होताच महायुतीचे ६८ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असून, आजची सभा हा प्रचाराचा शुभारंभ नसून विजयाची नांदी आहे," अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील प्रचाराचा शंखनाद केला. वांद्रे येथील 'डोम'मध्ये आयोजित महायुतीच्या महासभेत ते बोलत होते.


?si=5KC5GhFrVXHqcGtB

भ्रष्टाचाराच्या बकासुरापासून मुंबईची सुटका


एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "ही सभा म्हणजे मुंबईतील भ्रष्टाचाराविरोधातील एक मोठी ललकारी आहे. मुंबईला भ्रष्टाचाराच्या मगर मिठीतून आणि बकासुराच्या तावडीतून सोडवायचे आहे. लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ मिळून मुंबईवर महायुतीचा भगवा फडकवतील. मुंबईचा महापौर 'मराठीच' होणार, ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे."



'म' मलिद्याचा की मराठीचा? शिंदेंचा टोला


उद्धव ठाकरे आणि मनसेच्या संभाव्य जवळीकीवर निशाणा साधताना शिंदे म्हणाले, "जनतेने यांचा सीझन संपवल्यानंतर यांना आता व्हिजन आठवले आहे. यांनी मुंबईसाठी किंवा मराठी माणसासाठी केलेले एक तरी काम दाखवावे. यांचा 'म' हा मराठीचा नसून 'मलिद्याचा' आहे. आमचा 'म' मात्र मराठी, महाराष्ट्र आणि महायुतीचा आहे." त्यांनी पुढे स्पष्ट केले की, जनतेने बँड वाजवल्यानंतर यांना ब्रँडची आठवण झाली, पण खरा ब्रँड फक्त बाळासाहेब ठाकरे आणि सामान्य कार्यकर्ता आहे.



सूर्याजी पिसाळ कोण? टीकेला प्रत्युत्तर


'उबाठा' गटाकडून होणाऱ्या सूर्याजी पिसाळ या टीकेला प्रत्युत्तर देताना शिंदे आक्रमक झाले. "बाळासाहेबांचे विचार जपणारा सूर्याजी पिसाळ की विचारांचा खून करणारे सूर्याजी पिसाळ? हे जनतेला चांगलेच ठाऊक आहे. गेल्या वेळी माझ्या विनंतीवरून देवेंद्रजींनी मुंबईत शिवसेनेचा महापौर बसवला, पण हे लोक सत्तेसाठी लाचार झाले. आम्ही सत्तेसाठी गेलो नाही, तर मंत्रिपदावर पाणी सोडून तत्त्वासाठी बाहेर पडलो. आम्ही जीव गेला तरी तुमच्यासारखे लाचार होणार नाही," असे खडेबोल त्यांनी सुनावले.



विकासाचे वारकरी हवेत, मारेकरी नकोत


शिंदे यांनी संभाजीनगरमधील उमेदवारीवरूनही ठाकरेंना घेरले. "संभाजीनगरमध्ये रशीद मामूला तिकीट दिले, आज बाळासाहेब असते तर यांना उलटे टांगून फटके दिले असते," असे ते म्हणाले. तसेच, "दिवसभर नेटफ्लिक्स आणि निवडणुका आल्या की पॉलिटिक्स करण्याचा जमाना आता गेला आहे. मुंबईकरांना आता शहराचे मारेकरी नकोत, तर विकासाचे वारकरी हवे आहेत," असे म्हणत त्यांनी महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.

Comments
Add Comment

Health Department : आरोग्य विभागाच्या बदलीत राजकीय दबाव आणल्यास शिस्तभंगाची कारवाई

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागातील मनुष्यबळ व्यवस्थापनात सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकारने

Ambernath Local : अंबरनाथ लोकलमध्ये महिलांची तुफान मारामारी; व्हिडीओ व्हायरल

मुंबई : मुंबईची लाईफलाईन म्हणजेच मुंबईची लोकल ट्रेन. याच लोकल ट्रेनमध्ये जेव्हा मारामारी होते, ती सोशल

Food Poisoning : मुंबईत धक्कादायक प्रकार! 'आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं...'; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील पायधूनी परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली असून विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा

Mumbai-Bhopal Flight Accident : मुंबई ते भोपाळ विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; १६६ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले

मुंबई : विमान अपघाताच्या अनेक घटना या समोर येत आहेत. अहमदाबादची एक भयंकर मोठी विमान दुर्घटनेच्या आठवणी आजही

Marine Drive Accident : मरीन ड्राईव्हवर पहाटे भीषण थरार! मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तिघांचा मृत्यू

मुंबई : मुंबईत सोमवार, २७ एप्रिल रोजी पहाटे मरीन ड्राईव्ह परिसरात भीषण अपघात घडला असून यात तिघांचा मृत्यू झाला

अमेरिकेच्या येल विद्यापिठाचा विद्यार्थी करणार मुंबई बंदर, माथाडी कामगार, शहराचा विकासावर पीएचडी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) अमेरिकेच्या येल विद्यापिठाच्या इतिहास विभागातील विद्यार्थी हा , विसाव्या शतकातील