Mumabi News : समुद्राच्या मोठ्या भरतीने चौपाट्यांवर कचऱ्याचा खच

दहा दिवसांमध्ये २ हजार ४९९ मेट्रीक टन कचरा केला जमा


मुंबई : मुंबईतील समुद्रकिनारे स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक राखण्याच्या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेतर्फे ०९ जुलै २०२६ ते १९ जुलै २०२६ या कालावधीत विशेष समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. विशेष म्हणजे, १४ जुलै ते १८ जुलै २०२६ या कालावधीत समुद्राला ४.५ मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटांसह मोठी भरती येणार असल्याने समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कचरा वाहून येण्याची शक्यता लक्षात घेऊन या विशेष स्वच्छता मोहिमेचे नियोजन करण्यात आले. या विशेष मोहिमेदरम्यान भरती-ओहोटीमुळे समुद्रकिनाऱ्यावर वाहून आलेला प्लास्टिक, थर्माकोल, लाकडी अवशेष, जलवनस्पती तसेच इतर विविध प्रकारचा कचरा असे एकूण २ हजार ४९८.६६ मेट्रिक टन कचरा गोळा करण्यात आला. जमा करण्यात आलेल्या या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली.(Mumbai News)



महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनात तसेच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांच्या नेतृत्वाखाली समुद्रकिनारा विशेष स्वच्छता मोहीम अत्यंत नियोजनबद्ध, समन्वयपूर्ण आणि प्रभावीपणे राबविण्यात आली. या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी संबंधित विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधण्यात आला. स्वच्छता कामांचे नियमित नियोजन, देखरेख आणि आवश्यक त्या उपाययोजनांवर विशेष भर देण्यात आला. विशेषतः मान्सून काळात भरती-ओहोटीमुळे समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात वाहून येणारा कचरा तात्काळ हटविण्यासाठी यंत्रसामग्री, वाहने आणि आवश्यक मनुष्यबळाची प्रभावी उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली. या व्यापक स्वच्छता उपक्रमामुळे नागरिक आणि पर्यटकांना स्वच्छ, आरोग्यदायी व सुरक्षित वातावरण उपलब्ध झाले आहे.



मुंबईतील समुद्रकिनारे स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक राहावेत, यासाठी महानगरपालिका सातत्याने नियोजनबद्ध पद्धतीने कार्यरत आहे. विशेषतः मान्सून काळात भरती - ओहोटीमुळे समुद्रातून मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक, थर्माकोल, लाकडी अवशेष, जलवनस्पती तसेच इतर विविध प्रकारचा कचरा समुद्रकिनाऱ्यावर वाहून येत असल्याने तो तातडीने हटविण्यासाठी विशेष स्वच्छता पथके नियुक्त करण्यात आली आहेत. ही पथके नियमितपणे समुद्रकिनाऱ्यांची पाहणी करून कचऱ्याचे संकलन व त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे कार्य करत आहेत. समुद्रकिनाऱ्यांच्‍या स्वच्छतेकामी नागरिकांचाही सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. नागरिकांनी समुद्रकिनारे स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी महानगरपालिकेच्या प्रयत्नांना सहकार्य करावे,असे आवाहन महापालिका उपायुक्त किरण दिघावकर यांनी केले आहे.(Mumbai)





  1. ९ जुलै ते दिनांक १९ जुलै २०२६ या कालावधीतील कचरा विल्हेवाट

  2. १.१ किलोमीटर लांबीच्‍या गिरगाव चौपाटी येथून ३३.६६ मेट्रिक टन,

  3. ५ किलोमीटर लांबीच्‍या दादर - माहीम समुद्रकिनारा १५२.१० मेट्रिक टन,

  4. ३.५ किलोमीटर लांबीच्‍या चिंबई - वारिंगपाडा समुद्रकिनारा १२७.२० मेट्रिक टन,

  5. ८ किलोमीटर लांबीच्‍या मढ - मार्वे समुद्रकिनारा ४४. २८ मेट्रिक टन,

  6. ६ किलोमीटर लांबीच्‍या जुहू समुद्रकिनारा १,८२५ मेट्रिक टन,

  7. ४.५ किलोमीटर लांबीच्‍या वेसावे समुद्रकिनारा येथून २७७.६० मेट्रिक टन

  8. सरासरी ७ किलोमीटर लांबीच्‍या गोराई समुद्रकिनारा ३८.८२ मेट्रिक टन

  9. एकूण २ हजार ४९८.६६ मेट्रिक टन कचरा उचलून लावली विल्हेवाट

Comments
Add Comment

BMC News : मुंबईकरांना जागतिक दर्जाची, सुलभ आणि उत्तरदायी आरोग्यसेवा

- मुंबई महानगरपालिका बनवत आहे टप्पेनिहाय आराखडा मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील नागरिकांना दर्जेदार,

Mumbai News : एकाच दिवशी मुंबईत २७ हजार ८६६ महिलांच्या कर्करोगाची तपासणी

मुंबईत २९८ ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी राबवले महिलांसाठी स्तन कर्करोग तपासणी शिबिर आशिया बूक रेकॉर्ड

Driving Licence Rules : १ ऑगस्टपासून ड्रायव्हिंग लायसन्सचे कडक नियम लागू!

- ड्रायव्हिंग लायसन्स काढताय? हे नवीन नियम नक्की पाहा! मुंबई : तुम्हाला माहितीये का? महाराष्ट्रात ड्रायव्हिंग

Devendra Fadnavis : उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ'

मुंबई(Mumbai) : राज्य शासनाच्या सर्वसमावेशक विकासाच्या धोरणाला उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वाची प्रभावी साथ

Ashadhi Wari Special Train : आषाढी वारीसाठी रेल्वेची मोठी भेट! CSMT–मिरज दरम्यान आणखी २ विशेष 'वन-वे' गाड्या; २३ जुलैपासून आरक्षण सुरू

मुंबई : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी आणि भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी ४४ हजार कोटींच्या ‘अर्बन चॅलेंज फंड’ची अंमलबजावणी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश; आधुनिक, स्वावलंबी शहरे घडविणार मुंबई(Mumbai) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस