२९ महापालिकांमध्ये ३५.७ टक्के बंडखोरांची माघार

राज्यातील ८९३ प्रभागांत १५ हजार ९३१ उमेदवार रिंगणात; मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक स्पर्धा


मुंबई : राज्यात दीर्घकाळाने होत असलेल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली होती. मात्र, यातील अनेक बंडखोरांना थंड करण्यात सर्वपक्षीयांना, विशेषतः भाजपला यश मिळाले. राज्य निवडणूक आयोगाने शनिवारी या निवडणुकीसाठी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली. त्यानुसार, २९ महानगरपालिकांमधील एकूण ८९३ प्रभाग आणि २ हजार ८६९ नगरसेवक पदांसाठी १५ हजार ९३१ उमेदवार रिंगणात उरले आहेत. वैध ठरलेल्या २४ हजार ७७१ अर्जांपैकी ८ हजार ८४० म्हणजे ३५.७ टक्के उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली. सरासरी प्रत्येक जागेसाठी ५.५५ उमेदवार लढत असल्याने या निवडणुका अत्यंत चुरशीच्या होणार आहेत.


देशातील सर्वात मोठी आणि श्रीमंत महानगरपालिका अशी ओळख असलेल्या मुंबई पालिका निवडणुकीत सर्वाधिक स्पर्धा दिसून येत आहे. येथील २२७ प्रभागांमध्ये २ हजार ५१६ उमेदवारी अर्ज दाखल झाली होती. त्यापैकी २ हजार १५३ वैध ठरली, तर ४५३ उमेदवारांनी माघार घेतली. आता १ हजार ७०० उमेदवार रिंगणात आहेत. येथे प्रत्येक जागेसाठी सरासरी ७.४९ उमेदवार रिंगणात असल्याने स्पर्धा अत्यंत तीव्र आहे. पुणे महानगरपालिकेतील ४१ प्रभाग आणि १६५ जागांसाठी ३ हजार ६१ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी २ हजार १३४ वैध ठरले, तर ९६८ जणांनी माघार घेतली आणि आता १ हजार १६६ उमेदवार रिंगणात आहेत. नागपूरमधील ३८ प्रभाग आणि १५१ जागांसाठी ९९३ उमेदवार रिंगणात आहेत. नाशिकमध्ये अर्जांचे प्रमाण सर्वाधिक असले तरी माघारीचे प्रमाणही मोठे (६६१) असल्याने स्पर्धा काहीशी कमी झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ८५९, तर पनवेलमध्ये सर्वात कमी २५५ उमेदवार रिंगणात आहेत.

Comments
Add Comment

CNG Price Hike : पेट्रोल-डिझेलनंतर आता CNG महाग; आजपासून नवे दर लागू

मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांदरम्यान आता सर्वसामान्यांना आणखी एक महागाईचा झटका बसला आहे.

Sanjay Ghadi : दुकानांची नावे इंग्रजीत सोडा चक्क उर्दूत; एक महिन्यांच्या दिलाय अल्टिमेट

अन्यथा माज उतरवण्याचा शिवसेनेने दिला इशारा मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईमध्ये मराठी पाट्यांचा मुद्दा आता

Kanjurmarg Dumping Ground : कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंड परिसरात आता ग्रीन फेन्सिंग! दुर्गंधी रोखण्यासाठी ५००मीटरचा बफर झोन

महापालिका आयुक्तांनी केली विविध प्रकल्पांची पाहणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) कांजूर मार्ग डम्पिंग ग्राउंडवरील

Ashwini Bhide : देवनारमधील वीज निर्मिती दिवाळीपूर्वीच! महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेने देवनार क्षेपणभूमी येथे कचऱ्यापासून वीजनिर्मिती (वेस्ट टू एनर्जी)

Maharashtra ATS Launches Massive Crackdown : ATS चा धडाका! पाकिस्तानस्थित 'भट्टी गँग'चे जाळे उखडून फेकले; महाराष्ट्रात ४० ठिकाणी छापे, ५७ जण ताब्यात

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) बुधवारी पहाटेच्या सुमारास संपूर्ण राज्यात एक मोठी शोधमोहीम राबवली.

Uttar Pradesh Storm : उत्तर प्रदेशात निसर्गाचं तांडव! वादळ, मुसळधार पाऊस आणि वीज कोसळून ५६ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) विविध जिल्ह्यांना बुधवारी भीषण वादळ आणि मुसळधार पावसाने झोडपून काढले. या