२९ महापालिकांमध्ये ३५.७ टक्के बंडखोरांची माघार

राज्यातील ८९३ प्रभागांत १५ हजार ९३१ उमेदवार रिंगणात; मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक स्पर्धा


मुंबई : राज्यात दीर्घकाळाने होत असलेल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली होती. मात्र, यातील अनेक बंडखोरांना थंड करण्यात सर्वपक्षीयांना, विशेषतः भाजपला यश मिळाले. राज्य निवडणूक आयोगाने शनिवारी या निवडणुकीसाठी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली. त्यानुसार, २९ महानगरपालिकांमधील एकूण ८९३ प्रभाग आणि २ हजार ८६९ नगरसेवक पदांसाठी १५ हजार ९३१ उमेदवार रिंगणात उरले आहेत. वैध ठरलेल्या २४ हजार ७७१ अर्जांपैकी ८ हजार ८४० म्हणजे ३५.७ टक्के उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली. सरासरी प्रत्येक जागेसाठी ५.५५ उमेदवार लढत असल्याने या निवडणुका अत्यंत चुरशीच्या होणार आहेत.


देशातील सर्वात मोठी आणि श्रीमंत महानगरपालिका अशी ओळख असलेल्या मुंबई पालिका निवडणुकीत सर्वाधिक स्पर्धा दिसून येत आहे. येथील २२७ प्रभागांमध्ये २ हजार ५१६ उमेदवारी अर्ज दाखल झाली होती. त्यापैकी २ हजार १५३ वैध ठरली, तर ४५३ उमेदवारांनी माघार घेतली. आता १ हजार ७०० उमेदवार रिंगणात आहेत. येथे प्रत्येक जागेसाठी सरासरी ७.४९ उमेदवार रिंगणात असल्याने स्पर्धा अत्यंत तीव्र आहे. पुणे महानगरपालिकेतील ४१ प्रभाग आणि १६५ जागांसाठी ३ हजार ६१ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी २ हजार १३४ वैध ठरले, तर ९६८ जणांनी माघार घेतली आणि आता १ हजार १६६ उमेदवार रिंगणात आहेत. नागपूरमधील ३८ प्रभाग आणि १५१ जागांसाठी ९९३ उमेदवार रिंगणात आहेत. नाशिकमध्ये अर्जांचे प्रमाण सर्वाधिक असले तरी माघारीचे प्रमाणही मोठे (६६१) असल्याने स्पर्धा काहीशी कमी झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ८५९, तर पनवेलमध्ये सर्वात कमी २५५ उमेदवार रिंगणात आहेत.

Comments
Add Comment

SIR Campaign : राज्यात 'एसआयआर' मोहिमेला १७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या विशेष सघन मतदार यादी पुनरिक्षण म्हणजेच 'एसआयआर' मोहिमेला (SIR Campaign) १७ ऑगस्टपर्यंत

Bihar and Bengal : बिहार-बंगालमध्ये वीज कोसळून ११ मृत्यू , भूस्खलनामुळे बद्रीनाथ महामार्ग ठप्प; मुसळधार पावसाचा अनेक राज्यांना वेढा

नवी दिल्ली : अनेक राज्यांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला असून वाहतूक, दैनंदिन

Abbas Araghchi : परराष्ट्र मंत्री अराघची यांना हटवण्याची तयारी, इराणमध्ये अंतर्गत संघर्ष तीव्र

तेहरान : इराणच्या सत्ताकेंद्रात मोठ्या राजकीय हालचाली सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. काही खासदारांनी परराष्ट्र

Railways Act : रेल्वे कायदा, १९८९ मध्ये सुधारणा, विनातिकीट प्रवास आणि आरक्षित डब्यात प्रवेशावर वाढला दंड

मुंबई : रेल्वे कायदा, १९८९ मधील काही प्रमुख तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली असून, अनधिकृत प्रवास, आरक्षित

PoP ban : पीओपी बंदीवर अंतिम निर्णयाची प्रतीक्षा, राज्य सरकारच्या भूमिकेवर न्यायालयाचे ताशेरे

मुंबई : पर्यावरणस्नेही सण-उत्सवांना प्रोत्साहन देण्याच्या पार्श्वभूमीवर प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)

Neeraj Chopra : नीरज चोप्रा या महिन्यात लॉझेन डायमंड लीगमध्ये उतरणार

लॉझेन : भारताचा स्टार भालाफेकपटू, माजी ऑलिम्पिक आणि जागतिक चॅम्पियन नीरज चोप्रा २१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या लॉझेन