जिल्हा परिषदांच्या निवडणुकांना लवकरच मुहूर्त?

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे संकेत ५० टक्के आरक्षण


मर्यादेतील जिल्हा परिषदांचा पहिल्या टप्प्यात समावेश


मुंबई : राज्यात महापालिकांच्या निवडणुकांची धामधूम सुरू असतानाच आता जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे बिगुल कधीही वाजू शकते, असे संकेत मिळत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचक वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. ३२ जिल्हा परिषद आणि ३३१ पंचायत समित्यांच्या निवडणुकांना लवकरच मुहूर्त लागण्याची शक्यता आहे.


राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन टप्प्यांत होतील, असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. ५० टक्के आरक्षण मर्यादेच्या आत येणाऱ्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रथम घेण्यात येतील, तर ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण असलेल्या जिल्ह्यांतील निवडणुका दुसऱ्या टप्प्यात होतील, असे त्यांनी स्पष्ट केले.


३२ जिल्हा परिषदांपैकी फक्त १२ जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची टक्केवारी ५० टक्क्यांच्या आत आहे. या १२ जिल्हा परिषदांमध्ये लातूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग यांचा समावेश आहे.


२० जिल्हा परिषदांनी आरक्षण मर्यादा ओलांडली


२० जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची टक्केवारी ५१ ते १०० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. या जिल्ह्यांमध्ये ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, अहिल्यानगर, जालना व बीड यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांतील निवडणुका लगेच घेणे शक्य नसल्याने दुसऱ्या टप्प्यात घेण्याचा विचार सुरू आहे. आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या २० जिल्हा परिषदांसाठीच्या निवडणुकांचे भवितव्य न्यायालयीन निकालावर अवलंबून आहे. सर्वोच्च न्यायालयात याबाबतच्या याचिकांवर २१ जानेवारीला सुनावणी होणार आहे.

Comments
Add Comment

Inspirational Story: दोन भावांची सोशल मीडियावर तुफान चर्चा, कमी वयात...

मुंबई: किशोर मंडल आणि त्याचा लहान भाऊ कृष मंडलची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. अतिशय कमी वयात या दोन्ही

तब्बल २ लाख ४४ हजार कोटींचे पायाभूत सुविधा प्रकल्प, राखीव निधी केवळ ३६ हजार कोटी

मुंबई: मुंबई महापालिच्यावतीने पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात आले असून आता या प्रकल्पांचा खर्च २ लाख ४४

क्रांतिसूर्य स्वा.सावरकर यांच्या सन्मानार्थ मुंबईतून किमान १० हजार स्वाक्षऱ्यांचे पत्र केंद्र व राज्य सरकारला पाठवणार

मुंबई: मुंबईमधील दादर पश्चिमेकडील बालमोह शाळेशेजारील सावरकर सदन हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

Satara: कराडमधील यशवंत को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात ५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल

सातारा: कराडमधील गाजलेल्या यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेतील ११२ कोटी १० लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात मुख्य आरोपी आणि

अनिल अंबानींचे मुंबईतील करोडो रुपयांचे निवासस्थान ईडीकडून जप्त

मुंबई : रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (रिलायन्स एडीए ग्रुप) चेअरमन अनिल अंबानी यांचे "अ‍ॅबोड" निवासस्थान

सिंधुदुर्ग किनारपट्टी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करा - मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील