जिल्हा परिषदांच्या निवडणुकांना लवकरच मुहूर्त?

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे संकेत ५० टक्के आरक्षण


मर्यादेतील जिल्हा परिषदांचा पहिल्या टप्प्यात समावेश


मुंबई : राज्यात महापालिकांच्या निवडणुकांची धामधूम सुरू असतानाच आता जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे बिगुल कधीही वाजू शकते, असे संकेत मिळत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचक वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. ३२ जिल्हा परिषद आणि ३३१ पंचायत समित्यांच्या निवडणुकांना लवकरच मुहूर्त लागण्याची शक्यता आहे.


राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन टप्प्यांत होतील, असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. ५० टक्के आरक्षण मर्यादेच्या आत येणाऱ्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रथम घेण्यात येतील, तर ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण असलेल्या जिल्ह्यांतील निवडणुका दुसऱ्या टप्प्यात होतील, असे त्यांनी स्पष्ट केले.


३२ जिल्हा परिषदांपैकी फक्त १२ जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची टक्केवारी ५० टक्क्यांच्या आत आहे. या १२ जिल्हा परिषदांमध्ये लातूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग यांचा समावेश आहे.


२० जिल्हा परिषदांनी आरक्षण मर्यादा ओलांडली


२० जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची टक्केवारी ५१ ते १०० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. या जिल्ह्यांमध्ये ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, अहिल्यानगर, जालना व बीड यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांतील निवडणुका लगेच घेणे शक्य नसल्याने दुसऱ्या टप्प्यात घेण्याचा विचार सुरू आहे. आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या २० जिल्हा परिषदांसाठीच्या निवडणुकांचे भवितव्य न्यायालयीन निकालावर अवलंबून आहे. सर्वोच्च न्यायालयात याबाबतच्या याचिकांवर २१ जानेवारीला सुनावणी होणार आहे.

Comments
Add Comment

गोरेगाव मुलुंड पश्चिमेतील उड्डाणपूल प्रकल्पाला गती, मुंबई मेट्रो ४च्या खालून जाणार पूल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : तानसा जलवाहिनी ते नाहूर रेल्वे पूल येथपर्यंतचा १.८९ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल

महापालिकेच्या आपला दवाखान्यामध्येही मुख कर्करोगाची तपासणी

गर्भाशय मुख आणि स्तन कर्करोगाचे दवाखान्यांसह प्रसुतीगृहांमध्ये तपासणी शिबीर मुंबई (विशेष प्रतिनिधी)

गोरेगावात लिफ्टमध्ये हायड्रोजन फुग्यांचा स्फोट; तीन जण थोडक्यात बचावले

मुंबई : मुंबईतील गोरेगाव परिसरात हायड्रोजन गॅस भरलेल्या फुग्यांमुळे मोठा धोका निर्माण झाल्याची घटना समोर आली

भारतीय कृषी क्षेत्रावर तसा विपरीत परिणाम होऊ नये

अंदाजपत्रकातून विकासाला गती येण्यासाठी आणखी काही ठोस पावलांची अपेक्षा बारामती : केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत

शक्तीपीठ महामार्गाच्या आराखड्यात बदल

राज्य सरकारचा निर्णय; कागल आणि हातकणंगलेचा भाग वगळला मुंबई : राज्यातील साडेतीन शक्तीपीठांना जोडणाऱ्या

Pune Mumbai Expressway News : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गॅस गळतीमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला, पहाटेपर्यंत बचावकार्य सुरू

मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मंगळवारी संध्याकाळी ५ वाजेपासून सुरू झालेला वाहतुकीचा खोळंबा तब्बल १२