जिल्हा परिषदांच्या निवडणुकांना लवकरच मुहूर्त?

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे संकेत ५० टक्के आरक्षण


मर्यादेतील जिल्हा परिषदांचा पहिल्या टप्प्यात समावेश


मुंबई : राज्यात महापालिकांच्या निवडणुकांची धामधूम सुरू असतानाच आता जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे बिगुल कधीही वाजू शकते, असे संकेत मिळत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचक वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. ३२ जिल्हा परिषद आणि ३३१ पंचायत समित्यांच्या निवडणुकांना लवकरच मुहूर्त लागण्याची शक्यता आहे.


राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन टप्प्यांत होतील, असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. ५० टक्के आरक्षण मर्यादेच्या आत येणाऱ्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रथम घेण्यात येतील, तर ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण असलेल्या जिल्ह्यांतील निवडणुका दुसऱ्या टप्प्यात होतील, असे त्यांनी स्पष्ट केले.


३२ जिल्हा परिषदांपैकी फक्त १२ जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची टक्केवारी ५० टक्क्यांच्या आत आहे. या १२ जिल्हा परिषदांमध्ये लातूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग यांचा समावेश आहे.


२० जिल्हा परिषदांनी आरक्षण मर्यादा ओलांडली


२० जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची टक्केवारी ५१ ते १०० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. या जिल्ह्यांमध्ये ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, अहिल्यानगर, जालना व बीड यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांतील निवडणुका लगेच घेणे शक्य नसल्याने दुसऱ्या टप्प्यात घेण्याचा विचार सुरू आहे. आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या २० जिल्हा परिषदांसाठीच्या निवडणुकांचे भवितव्य न्यायालयीन निकालावर अवलंबून आहे. सर्वोच्च न्यायालयात याबाबतच्या याचिकांवर २१ जानेवारीला सुनावणी होणार आहे.

Comments
Add Comment

भाजपाच्या ८३ पैंकी ५४ माजी नगरसेवकांना दिली पुन्हा संधी

केवळ २७ माजी नगरसेवकांना नाकारले तिकीट मुंबई : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महायुतीच्या वतीने

कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरणांतर्गत मुंबईत प्रथमच जागतिक शिखर संमेलन

बीकेसी जिओ वर्ल्ड कन्वेन्शन सेंटर येथे २२ व २३ फेब्रुवारी रोजी जगातील आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्या,

१ फेब्रुवारीपासून सिगारेट आणि पान मसाला महागणार!

४० टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय मुंबई : १ फेब्रुवारीपासून तंबाखू उत्पादनांवर अतिरिक्त उत्पादन शुल्क आणि पान

अर्ज भरल्यापासून उमेदवाराला दैनंदिन खर्चाची नोंद ठेवणे बंधनकारक, सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे यांची माहिती

मुंबई (विशेष प्रतिनिधी): उमेदवारी अर्ज सादर केल्यापासून उमेदवारांनी दैनंदिन निवडणूक खर्चाची नोंद ठेवणे

मुंबईत गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये तब्बल ७०२ मतदान केंद्र

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी एकूण १० हजार २३१ मतदान केंद्रे

BMC News : निवडणूक कामात गैरवर्तणूक, महापालिकेने केले अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ कामकाजात गंभीर स्वरूपाचे गैरवर्तणूक