मीरा-भाईंदरमध्ये महाविकास आघाडीत वादंग

काँग्रेस जिल्हा प्रवक्त्याचा राजीनामा; ‘निर्भय भारत आघाडी’ मैदानात


भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीतील जागावाटपावरून महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये तीव्र असंतोष उफाळून आला आहे. उबाठा गटाला सर्वाधिक जागा, काँग्रेसकडून निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींना उमेदवारी, मनसेची अवघ्या १२ जागांवर बोळवण आणि मागील निवडणुकीत खातेही न उघडू शकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाला दिलेल्या १५ जागा—या कारणांमुळे आघाडीत अंतर्गत वाद चिघळले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे मुख्य जिल्हा प्रवक्ता प्रकाश नागणे यांनी राजीनामा देण्याचे जाहीर संकेत दिले असून, सर्व नाराज व बंडखोर उमेदवारांना एकत्र आणत ‘निर्भय भारत आघाडी’ स्थापन केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसमोर गंभीर राजकीय आव्हान उभे राहिल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.


भाजपला प्रभावी टक्कर देण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मुजफ्फर हुसेन यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता. जनाधार, उमेदवारांचे कार्य आणि लोकप्रियता लक्षात घेऊन जागावाटपाचे सूत्र ठरवण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र उबाठा (७५), मनसे (२५) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) (४५) अशा मोठ्या मागण्यांमुळे समन्वय साधण्यात अडचणी निर्माण झाल्या.


अंतिम जागावाटपात सर्वच घटक पक्षांना अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्याने नाराजी वाढली आहे. त्यातच भाजप-शिवसेना युती न झाल्याने काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) यांच्यात छुपी युती होण्याची शक्यता असल्याची भीती काही घटक पक्षांनी व्यक्त केली आहे. शिवसेनेने काही प्रभागांत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळेही संशय अधिक बळावला आहे.नागणे यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले होते. मात्र त्यांच्या प्रभागात एकाच कुटुंबातील दोन उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आल्याने नागणे यांना अधिकृत उमेदवारी मिळाली नाही. या प्रकारामुळे नाराज नागणे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून, काँग्रेसचा राजीनामा देत निर्भय भारत सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नाराज व बंडखोर उमेदवारांची स्वतंत्र आघाडी उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

Comments
Add Comment

Gautami Patil : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर गौतमी पाटीलनं दिली प्रतिक्रिया, म्हणाली...

नाशिक : नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरातचे दिवसेंदिवस अनेक काळे कारनामे समोर येत असून महिला लैंगिक शोषण, आर्थिक

Bigg Boss Marathi 6 : पहिला फायनलिस्ट कोण ठरणार ? तिकीट टू फिनालेची उत्सुकता वाढली

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन आता शेवटच्या टप्प्यात पोहचलं असून ११ जानेवारी २०२५ रोजी सुरु झालेल्या बिग बॉस मराठी

Ramayana Movie : रामायणमध्ये भूमिका साकारणार बिग बींचा जावई, 'या' महत्वाच्या भूमिकेत झळकणार

मुंबई : रामायण ( Ramayana ) सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु असून रामायणमधील रणबीर कपूर ( Ranbir Kapoor) चा पहिला लूक पाहिल्यानंतर

Gaurav More Marriage: हास्यजत्रेमधील 'फिल्टर पाड्याचा बच्चन' गौरव मोरे अडकला विवाहबंधनात, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

मुंबई : आपल्या कॉमेडीनं संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारा त्याचबरोबर फिल्टर पाड्याचा बच्चन म्हणून

FIDE Candidates Tournament 2026 : भारतीय ग्रँडमास्टर वैशालीचा सलग दुसरा विजय

सायप्रस : भारतीय ग्रँडमास्टर आर. वैशालीने फिडे कॅन्डिडेट्स टूर्नामेंट २०२६ च्या सातव्या फेरीत शानदार कामगिरी

Abhishek bachchan : अखेर ऐश्वर्यासोबतच्या नात्याबाबत अभिषेकनं सोडलं मौन

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडी ऐश्वर्या राय (Aishwarya Rai ) आणि अभिषेक बच्चन (Abhishek bachchan ) अनेक कारणांमुळे सतत चर्चेत असतात.