मीरा-भाईंदरमध्ये महाविकास आघाडीत वादंग

काँग्रेस जिल्हा प्रवक्त्याचा राजीनामा; ‘निर्भय भारत आघाडी’ मैदानात


भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीतील जागावाटपावरून महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये तीव्र असंतोष उफाळून आला आहे. उबाठा गटाला सर्वाधिक जागा, काँग्रेसकडून निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींना उमेदवारी, मनसेची अवघ्या १२ जागांवर बोळवण आणि मागील निवडणुकीत खातेही न उघडू शकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाला दिलेल्या १५ जागा—या कारणांमुळे आघाडीत अंतर्गत वाद चिघळले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे मुख्य जिल्हा प्रवक्ता प्रकाश नागणे यांनी राजीनामा देण्याचे जाहीर संकेत दिले असून, सर्व नाराज व बंडखोर उमेदवारांना एकत्र आणत ‘निर्भय भारत आघाडी’ स्थापन केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसमोर गंभीर राजकीय आव्हान उभे राहिल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.


भाजपला प्रभावी टक्कर देण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मुजफ्फर हुसेन यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता. जनाधार, उमेदवारांचे कार्य आणि लोकप्रियता लक्षात घेऊन जागावाटपाचे सूत्र ठरवण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र उबाठा (७५), मनसे (२५) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) (४५) अशा मोठ्या मागण्यांमुळे समन्वय साधण्यात अडचणी निर्माण झाल्या.


अंतिम जागावाटपात सर्वच घटक पक्षांना अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्याने नाराजी वाढली आहे. त्यातच भाजप-शिवसेना युती न झाल्याने काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) यांच्यात छुपी युती होण्याची शक्यता असल्याची भीती काही घटक पक्षांनी व्यक्त केली आहे. शिवसेनेने काही प्रभागांत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळेही संशय अधिक बळावला आहे.नागणे यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले होते. मात्र त्यांच्या प्रभागात एकाच कुटुंबातील दोन उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आल्याने नागणे यांना अधिकृत उमेदवारी मिळाली नाही. या प्रकारामुळे नाराज नागणे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून, काँग्रेसचा राजीनामा देत निर्भय भारत सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नाराज व बंडखोर उमेदवारांची स्वतंत्र आघाडी उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

Comments
Add Comment

या ब्लॉकबस्टर चित्रपटाने मोडला ६ वर्षांपूर्वीचा मोठा रेकॉर्ड; नवीन वर्षातही कमाई सुरूच..

Avatar Fire And Ash Box Office Collection Day 14: धूरांधरलाही मागे टाकून या ब्लॉकबस्टर चित्रपटाने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाही तगडी कमाई

अक्षय खन्नाची रेहमान डकैतच्या भूमिकेची ऑफर ऐकल्यावरची भन्नाट प्रतिक्रिया

एखादा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट होण्यासाठी कथा जितकी दमदार असावी लागते, तितकंच त्याचं कास्टिंगसुद्धा.आदित्य धर

४५० वर्षांची परंपरा जपणारी शिराळे गावची ‘गावपळण’सुरू

गावाबाहेरील राहुट्यांत नागरिकांनी थाटला संसार वैभववाडी : दरवर्षी होणाऱ्या अनोख्या आणि परंपरागत गावपळणीसाठी

राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत रत्नागिरीचा झेंडा फडकला

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रीडा विश्वासाठी अभिमानास्पद ठरणारी कामगिरी करत रत्नदुर्ग पिस्टल आणि

उद्या अवकाशात 'सुपर मून'ने उजळणार रात्र!

चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ येणार नवी दिल्ली : नववर्ष २०२६ च्या सुरुवातीलाच अर्थात उद्या ३ जानेवारी २०२६ रोजी

‘निमेसुलाईड’ पेनकिलर औषधावर केंद्र सरकारची बंदी

१०० मिलीग्रॅमपेक्षा जास्त क्षमतेच्या गोळ्यांच्या विक्रीस मनाई नवी दिल्ली : सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी अशा