हा फक्त राष्ट्रपतींचा नव्हे, तर संविधानाचा अपमान, पंतप्रधान मोदींचा ममता सरकारवर घणाघात

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यक्रमात प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्याच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारवर जोरदार टीका केली. ही घटना केवळ राष्ट्रपतींचा अपमान नसून, भारताच्या संविधान आणि लोकशाहीच्या भावनेवर आघात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त रविवारी दिल्लीमध्ये आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी सुमारे ३३ हजार ५०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करत होते. यावेळी आयोजित जनसभेला संबोधित करताना त्यांनी पश्चिम बंगाल सरकारवर निशाणा साधला. पंतप्रधान मोदी म्हणाले, आज देश आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करत आहे, पण काल पश्चिम बंगालमध्ये ममता सरकारने देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा घोर अपमान केला. त्या संथाल समाजाच्या मोठ्या उत्सवात सहभागी होण्यासाठी बंगालमध्ये गेल्या होत्या. मात्र त्यांचा सन्मान करण्याऐवजी तृणमुल काँग्रेसने या पवित्र कार्यक्रमाचा बहिष्कार केला.

मोदी पुढे म्हणाले की, द्रौपदी मुर्मू स्वतः आदिवासी समाजातून आलेल्या आहेत आणि त्या नेहमीच आदिवासी समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील असतात. तरीही राज्य सरकारने या कार्यक्रमाचे व्यवस्थापन योग्य प्रकारे केले नाही. हे केवळ राष्ट्रपतींचा अपमान नाही, तर भारताच्या संविधानाचा आणि लोकशाहीच्या महान परंपरेचाही अपमान आहे. सत्तेचा अहंकार कोणाचाही टिकत नाही. तो बंगालची जनता लवकरच चकनाचूर करेल, असे ते म्हणाले.

केंद्राने बंगाल सरकारकडून मागवला अहवाल

राष्ट्रपती मुर्मू या उत्तर बंगाल दौऱ्यावर असताना दार्जिलिंग जिल्ह्यातील ९व्या आंतरराष्ट्रीय संथाल परिषदेत मुख्य अतिथी म्हणून सहभागी झाल्या होत्या. सुरुवातीला हा कार्यक्रम फांसीदेवा ब्लॉकमधील बिधाननगर येथे होणार होता, जिथे मोठ्या प्रमाणावर संथाल आदिवासी समाजातील लोक उपस्थित राहू शकले असते. मात्र राज्य प्रशासनाने सुरक्षा, गर्दी आणि इतर कारणे सांगत कार्यक्रमाचे ठिकाण बागडोगरा विमानतळाजवळील गोसाईंपूर येथे हलवले. राष्ट्रपतींनी या बदलाबाबत नाराजी व्यक्त करत नवीन ठिकाण लहान असल्याने अनेकांना कार्यक्रमात सहभागी होता आले नसल्याचे सांगितले. तसेच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी किंवा राज्यातील कोणताही मंत्री त्यांना स्वागतासाठी उपस्थित नसल्याबद्दलही प्रश्न उपस्थित झाले. दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपचे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी सांगितले की, संबंधित कार्यक्रमाबाबत राज्य सरकारला कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नव्हती.
Comments
Add Comment

West Bengal Election 2026 : विक्रमी मतदानामुळे ममता बॅनर्जींचे सरकार संपुष्टात येईल - अमित शाह

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जिल्ह्यातील राणाघाट येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

Karnataka : पादचारी पूल कोसळला, आठ जखमी

मंगळुरू : कर्नाटकमध्ये दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मूडबिद्री तालुक्यात एक अरुंद पादचारी पूल कोसळला. या

West Bengal : पश्चिम बंगालमध्ये ठिकठिकाणी ईडीच्या धाडी

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वीच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राजधानी कोलकात्यात

Indian History : सापडले दोन हजार वर्षे जुने तीन किलो वजनाचे प्राचीन ताम्रपत्र

बिलासपूर : छत्तीसगडच्या बिलासपूर येथील मल्हार परिसरातील रहिवासी संजीव पांडेय यांच्या ताब्यातून सुमारे २०००

Delhi Airport : दिल्ली विमानतळावर स्विस एअर विमानाच्या इंजिनाला आग, ६ प्रवासी जखमी

दिल्लीतील आयजीआय विमानतळावर स्विस एअरच्या एलएक्स १४७ या विमानाच्या टेकऑफदरम्यान विमानाच्या इंजिनमध्ये अचानक

Monsoon 2026 : आनंद वार्ता! यंदा मान्सून लवकर येणार; १८ ते २५ मे दरम्यान पावसाचे आगमन होणार

- युरोपीयन मध्यम श्रेणी हवामान अंदाज केंद्राचा अंदाज एप्रिलमध्ये उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांनी बेजार