गुढीपाडवा का साजरा केला जातो? जाणून घ्या गुढीपाडव्याचे महत्त्व, पूजा विधी आणि परंपरा

मुंबई : महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक अत्यंत शुभ दिवस मानला जातो. या दिवशी अभ्यंगस्नान करून घरासमोर गुढी म्हणजेच ब्रह्मध्वज उभारण्याची परंपरा आहे. नवीन वर्षासाठी संकल्प करून शुभ कार्याची सुरुवात करण्याचा हा दिवस मानला जातो.


यंदा १९ मार्च २०२६ रोजी गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. या दिवशी नवीन वर्षाच्या पंचांगाची पूजा करून वर्षभर त्याचा वापर करण्याची प्रथा आहे.



गुढीपाडव्याचे धार्मिक महत्त्व


पुराणानुसार सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाने चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी केली असे मानले जाते. त्यामुळे हा दिवस सृष्टीचा वाढदिवस मानून गुढी उभारून साजरा केला जातो.


दुसऱ्या कथेनुसार पैठणचे राजा शालिवाहन यांनी अत्याचारी शकांचा पराभव करून जनतेची मुक्तता केली. त्या विजयाच्या स्मरणार्थ शालिवाहन शक सुरू झाला आणि त्यानंतर चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून नूतन वर्ष साजरे करण्याची परंपरा सुरू झाली.


तिसऱ्या मान्यतेनुसार विष्णू यांचा अवतार असलेल्या राम अवताराने रावणाचा पराभव केला. यानंतर राम अयोध्येत परत येत होते त्यावेळी नागरिकांनी गुढ्या उभारून त्यांचे स्वागत केले. त्या दिवसाच्या स्मरणार्थ गुढीपाडवा साजरा केला जातो.



गुढीपाडव्याची पूजा कशी करावी ?


गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता करावी आणि अंगाला सुगंधी तेल लावून अभ्यंगस्नान करावे. घराच्या दारासमोर सुंदर रांगोळी काढून नवीन कपडे परिधान करावेत.


दरवाजाला आंब्याच्या पानांचे तोरण बांधावे. बांबूची काठी स्वच्छ करून तिच्या टोकाला तांबडे किंवा पिवळे कापड, फुलांची माळ आणि त्यावर उलटा कलश ठेवून गुढी उभारावी. काही ठिकाणी गुढीला बत्ताशांची माळही घातली जाते. या गुढीला ब्रह्मध्वज असेही म्हणतात.


यानंतर गुढीची पूजा करावी. कडुनिंबाची कोवळी पाने, जिरे, मिरी, हिंग, सैंधव मीठ आणि ओवा यांचे मिश्रण करून ते थोडेसे खाण्याची प्रथा आहे. वर्षाच्या सुरुवातीला कडुनिंब खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते, असे मानले जाते.


त्यानंतर नवीन वर्षाच्या पंचांगाची पूजा करून त्यातील वर्षफळ वाचले जाते. गोड पदार्थ खाऊन हा नूतन वर्षाचा दिवस आनंदात साजरा केला जातो. सूर्यास्तापूर्वी गुढीला नमस्कार करून ती खाली उतरवण्याची प्रथा आहे.



या दिवशी काय करतात?


गुढीपाडव्याच्या दिवशी मौल्यवान वस्तू खरेदी करणे, नवीन कामाची सुरुवात करणे आणि शुभ कार्याचा आरंभ करणे अत्यंत मंगल मानले जाते. त्यामुळे महाराष्ट्रात हा सण मोठ्या आनंदात आणि श्रद्धेने साजरा केला जातो.

Comments
Add Comment

Nashik News : पर्यावरणदिनी नंदिनी नदीच्या स्वच्छतेसाठी विशेष मोहीम, मंत्री गिरीश महाजनही झाले सहभागी

Nashik News : जागतिक पर्यावरण दिनाच्या (World Environment Day) पार्श्वभूमीवर व 'उन्नत नाशिक अभियान' अंतर्गत आज नाशिक शहरातील नंदिनी

Ahilyanagar : पोलीस बदल्यांचा ‘दरबार’! कुणाच्या चेहऱ्यावर आनंद, तर कुणाच्या डोळ्यांत अश्रू

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात (Ahilyanagar District Police Force) गुरुवारी प्रशासकीय बदल्यांचा मोठा ‘दरबार’ पार पडला. तब्बल 300

Nashik News : विंचूरमध्ये गुटखा विक्रेत्यावर एफडीएचा छापा; सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त, आरोपी अटकेत

Nashik News : महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा व सुगंधित पानमसाल्याच्या विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धडक

FIFA World Cup 2026 : चार वेळा विश्वविजेता इटलीच बाहेर; पाच दिग्गज संघ वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर...

मुंबई : फिफा वर्ल्ड कप 2026 12 जूनपासून सुरू होणार आहे. यंदाचा वर्ल्ड कप हा सर्वात मोठा वर्ल्ड कप आहे. कारण फिफा वर्ल्ड

Nashik : ‘स्वदेस’च्या उपक्रमातून काळूणे गावाचा कायापालट, जलजीवन, स्वच्छता, शेळीपालन आणि जलसंधारणामुळे विकासाला नवी दिशा

Nashik : स्वदेस फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली पेठ तालुक्यातील काळुणे येथे राबविण्यात आलेल्या जलजीवन प्रकल्पामुळे

वसतिगृहाच्या टेरेसवर झोपलेल्या विद्यार्थ्याचा खून, पोलिसांकडून तपास सुरु

पुणे : पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोनवडी येथील