गुढीपाडवा का साजरा केला जातो? जाणून घ्या गुढीपाडव्याचे महत्त्व, पूजा विधी आणि परंपरा

मुंबई : महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक अत्यंत शुभ दिवस मानला जातो. या दिवशी अभ्यंगस्नान करून घरासमोर गुढी म्हणजेच ब्रह्मध्वज उभारण्याची परंपरा आहे. नवीन वर्षासाठी संकल्प करून शुभ कार्याची सुरुवात करण्याचा हा दिवस मानला जातो.


यंदा १९ मार्च २०२६ रोजी गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. या दिवशी नवीन वर्षाच्या पंचांगाची पूजा करून वर्षभर त्याचा वापर करण्याची प्रथा आहे.



गुढीपाडव्याचे धार्मिक महत्त्व


पुराणानुसार सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाने चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी केली असे मानले जाते. त्यामुळे हा दिवस सृष्टीचा वाढदिवस मानून गुढी उभारून साजरा केला जातो.


दुसऱ्या कथेनुसार पैठणचे राजा शालिवाहन यांनी अत्याचारी शकांचा पराभव करून जनतेची मुक्तता केली. त्या विजयाच्या स्मरणार्थ शालिवाहन शक सुरू झाला आणि त्यानंतर चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून नूतन वर्ष साजरे करण्याची परंपरा सुरू झाली.


तिसऱ्या मान्यतेनुसार विष्णू यांचा अवतार असलेल्या राम अवताराने रावणाचा पराभव केला. यानंतर राम अयोध्येत परत येत होते त्यावेळी नागरिकांनी गुढ्या उभारून त्यांचे स्वागत केले. त्या दिवसाच्या स्मरणार्थ गुढीपाडवा साजरा केला जातो.



गुढीपाडव्याची पूजा कशी करावी ?


गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता करावी आणि अंगाला सुगंधी तेल लावून अभ्यंगस्नान करावे. घराच्या दारासमोर सुंदर रांगोळी काढून नवीन कपडे परिधान करावेत.


दरवाजाला आंब्याच्या पानांचे तोरण बांधावे. बांबूची काठी स्वच्छ करून तिच्या टोकाला तांबडे किंवा पिवळे कापड, फुलांची माळ आणि त्यावर उलटा कलश ठेवून गुढी उभारावी. काही ठिकाणी गुढीला बत्ताशांची माळही घातली जाते. या गुढीला ब्रह्मध्वज असेही म्हणतात.


यानंतर गुढीची पूजा करावी. कडुनिंबाची कोवळी पाने, जिरे, मिरी, हिंग, सैंधव मीठ आणि ओवा यांचे मिश्रण करून ते थोडेसे खाण्याची प्रथा आहे. वर्षाच्या सुरुवातीला कडुनिंब खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते, असे मानले जाते.


त्यानंतर नवीन वर्षाच्या पंचांगाची पूजा करून त्यातील वर्षफळ वाचले जाते. गोड पदार्थ खाऊन हा नूतन वर्षाचा दिवस आनंदात साजरा केला जातो. सूर्यास्तापूर्वी गुढीला नमस्कार करून ती खाली उतरवण्याची प्रथा आहे.



या दिवशी काय करतात?


गुढीपाडव्याच्या दिवशी मौल्यवान वस्तू खरेदी करणे, नवीन कामाची सुरुवात करणे आणि शुभ कार्याचा आरंभ करणे अत्यंत मंगल मानले जाते. त्यामुळे महाराष्ट्रात हा सण मोठ्या आनंदात आणि श्रद्धेने साजरा केला जातो.

Comments
Add Comment

State Government : व्यावसायिक हेतूने होणाऱ्या शाळांच्या स्थलांतराला ब्रेक; राज्य सरकारकडून नवे धोरण जाहीर

 कमी पटसंख्येच्या शाळांना स्थलांतराच्या प्रक्रियेतून पूर्णपणे वगळले मुंबई : राज्यातील शाळांच्या

Indian Musician Death : भारतीय शास्त्रीय संगीतविश्वाला मोठा धक्का! ज्येष्ठ तबला वादक उस्ताद साबिर खान यांचं निधन

कोलकाता : भारतीय शास्त्रीय संगीतविश्वासाठी अत्यंत दुःखद बातमी. प्रख्यात तबला वादक उस्ताद साबिर खान यांचे

Pune Young woman's number leaked : पुण्यात धक्कादायक प्रकार! हॉटेलच्या QR कोडमधून तरुणीचा नंबर लीक, मध्यरात्री आले वैयक्तिक मेसेज

पुणे: डिजिटल युगात हॉटेलमध्ये गेल्यानंतर मेन्यू पाहण्यासाठी QR कोड स्कॅन करणं आता सर्वसामान्य बाब झाली आहे.

Mouni Roy-Suraj Nambiar Divorce : “आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय…”; अखेर मौनी रॉयने घटस्फोटावर मोडलं मौन

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून 'नागिन' फेम अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) आणि तिचा पती सूरज नांबियार (Suraj Nambiar) यांच्या

 नाशिक : भोंदूबाबा खरात प्रकरणात उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील यांचे निलंबन

 भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील निलंबित -१४३ वेळा कॉल आणि आर्थिक गुंतवणुकीचा

Maharashtra : राज्यातील १८३ तालुक्यांत पारा ४५ अंशांवर

उष्णतेची तीव्र लाट; मागील वर्षीच्या तुलनेत जलसाठा मात्र समाधानकारक मुंबई : मे महिन्याचा पंधरवडा उलटत असतानाच