५० जणांना घेऊन जाणाऱ्या बसला ताम्हिणी घाटात भीषण अपघात, कारलाही उडवलं, पोलीस घटनास्थळी

रायगड : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात असलेल्या ताम्हिणी घाटात शुक्रवारी दुपारी एक भीषण अपघात घडला. सुमारे ५० प्रवाशांना घेऊन जाणारी खासगी बस तीव्र वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याबाहेर घसरत खडकाळ भागावर जाऊन आदळली. या अपघातात बसने एका कारलाही जोरदार धडक दिल्याने ती कार रस्ता ओलांडून थेट झाडीत जाऊन अडकली. या दुर्घटनेत २७ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी ८ ते १० जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सदर बस शुक्रवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास पुण्यातील भोसरी परिसरातून रवाना झाली होती. बसमध्ये भोसरी येथील सावन IB Auto प्रा. लिमिटेड कंपनीचे कर्मचारी होते. हे सर्व कर्मचारी काशिद बीचला सहलीसाठी निघाले होते. दुपारी ताम्हिणी घाटात प्रवेश केल्यानंतर गारवा हॉटेल परिसरातील एका तीव्र वळणावर बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला.


नियंत्रण सुटताच बस रस्त्यावरून खाली उतरली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या खडकाळ डोंगराला जाऊन धडकली. धडकेचा वेग इतका प्रचंड होता की बसमधील अनेक प्रवासी जागीच जखमी झाले. याच वेळी समोरून येणाऱ्या एका कारलाही बसने धडक दिली, त्यामुळे ती कार रस्ता ओलांडून बाजूच्या झाडीत जाऊन अडकली. सुदैवाने बस दरीत कोसळली नाही, अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती.


अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलीस, स्थानिक प्रशासन आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बसमधील जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. सर्व जखमींना तातडीने रुग्णवाहिकांच्या माध्यमातून माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर काही काळ ताम्हिणी घाटातील वाहतूकही विस्कळीत झाली होती. पोलिसांकडून अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४

मुंबईचा पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्ग पावसाळ्यापूर्वी समतल करा; उपमहापौरांची आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

मुंबई: मुंबई महानगरातील रस्त्यांची स्थिती अधिक सुधारण्यासाठी पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच प्रमुख