राज्यातील दहा महापालिकांमध्ये भाजपचे ४७ नगरसेवक बिनविरोध

मुख्यमंत्र्यांचे 'ऑपरेशन मनधरणी' यशस्वी; महायुतीच्या बिनविरोध उमेदवारांची संख्या पोहोचली ६४वर


मुंबई : राज्यातील महानगरपालिकांच्या प्रचाराचा नारळ फोडण्याआधीच भाजप-महायुतीने विजयाचा गुलाल उधळला आहे. राज्यातील १० महापालिकांमध्ये भाजपचे तब्बल ४७ नगरसेवक बिनविरोध निवडून आले, तर महायुतीला (भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी) एकूण ६४ जागा बिनविरोध मिळाल्या. यात शिवसेनेला १५, तर राष्ट्रवादीच्या २ जागांचा समावेश आहे.


महानगरपालिका निवडणुकांसाठी अर्ज माघारी घेण्याचा शुक्रवार हा शेवटचा दिवस होता. अनेक ठिकाणी पक्षांतर्गत बंडखोरी आणि मित्रपक्षांतील नाराजीमुळे वातावरण तंग झाले होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेऊन बंडखोरांशी संवाद साधला. साताऱ्यातील साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरूनही ते फोनवरून नाराज नेत्यांशी बोलताना दिसले. वर्षानुवर्षे पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांना भविष्यात महापालिकेत स्वीकृत सदस्य किंवा राज्य-जिल्हा स्तरावरील समित्यांमध्ये संधी देण्याची हमी दिली. या प्रयत्नांचा परिणाम म्हणून भाजपला सर्वाधिक ४७ जागा बिनविरोध मिळाल्या.



किती नगरसेवक बिनविरोध?



  1. कल्याण-डोंबिवली : भाजप १५, शिवसेना ६

  2. पनवेल : भाजप ७

  3. पुणे : भाजप २

  4. पिंपरी-चिंचवड : भाजप २

  5. जळगाव : भाजप ७, शिवसेना ६

  6. नागपूर : भाजप २

  7. ठाणे : शिवसेना ३

  8. भिवंडी : भाजप ६

  9. अहिल्यानगर : भाजप २, राष्ट्रवादी २

  10. धुळे : भाजप ४

  11. एकूण : महायुती ६४ (भाजप ४७, शिवसेना १५, राष्ट्रवादी २)


महायुतीचे मनोबल वाढले



  1. - पनवेल महापालिकेत अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी ७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपचे ७ नगरसेवक बिनविरोध निवडून आले. उबाठा गट, शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेसच्या उमेदवारांच्या माघारीमुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. यामुळे पनवेलमध्ये भाजपच्या विजयाचा मार्ग निश्चित झाला आहे. भाजपचे नितीन पाटील, रुचिता लोंढे, अजय बहिरा, दर्शना भोईर, प्रियंका कांडपिळे, ममता प्रितम म्हात्रे आणि स्नेहल ढमाले हे उमेदवार बिनविरोध निवडून आले.

  2. कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपचे १५ उमेदवार बिनविरोध विजयी झाले. यात रंजना पेणकर (२६ ब), आसावरी नवरे (२६ क), मंदा पाटील (२७ अ), ज्योती पाटील (२४ ब), रेखा चौधरी (१८ अ), मुकंद तथा विशू पेडणेकर (२६ अ), महेश पाटील (२७ ड), साई शेलार (१९ क), दिपेश म्हात्रे (२३ अ), जयेश म्हात्रे (२३ ड), हर्षदा भोईर (२३ क), डॉ. सुनिता पाटील (१९ ब), पूजा म्हात्रे (१९ अ), रविना माळी (३० अ) आणि मंदार हळबे (२६ ड) यांचा समावेश आहे.

  3. जळगाव महापालिकेत महायुतीचे एकूण १३ उमेदवार (भाजप ७, शिवसेना ६) बिनविरोध निवडून आले. एकूण ७५ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत आता फक्त ६२ जागांवरच स्पर्धा राहिली आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेत महायुतीचे ४ नगरसेवक बिनविरोध निवडून आले. यात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आणि भाजपचे प्रत्येकी २ उमेदवार आहेत.

  4. ठाणे महापालिकेत शिवसेनेचे तीन नगरसेवक बिनविरोध निवडून आले यात जयश्री फाटक, सुखदा मोरे आणि एकता भोईर यांचा समावेश आहे. पुणे महापालिकेत प्रभाग क्रमांक ३५ (सनसिटी माणिकबाग) मधून भाजपचे श्रीकांत जगताप आणि मंजुषा नागपूरे बिनविरोध निवडून आले.

  5. या बिनविरोध निवडींमुळे निवडणुकीआधीच महायुतीचे मनोबल वाढले आहे. भाजपच्या सर्वाधिक ४७ बिनविरोध उमेदवारांमुळे २९ महानगरपालिकांपैकी बहुतांश ठिकाणी कमळ फुललेले दिसेल, असे संकेत मिळत आहेत.

Comments
Add Comment

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन

‘पीएनजी’ क्षेत्रातील नागरिकांना ३० जूननंतर ‘एलपीजी’ गॅस पुरवठा बंद; पर्यायी इंधन म्हणून केरोसीनचे वाटप होणार

मुंबई: राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे गॅस (पीएनजी) जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी पीएनजी

Ramdas Athawale: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभा खासदार पदाची केली हॅट्ट्रिक

मुंबई: रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची तिस-यांदा

Delhi: हातात पुष्पगुच्छ घेऊन थेट शिरला विधानसभेत, अध्यक्षांच्या गाडीजवळ फुलांचा गुच्छ ठेवला अन्...

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेत सुरक्षेचा मोठा भंग झाल्याचे वृत्त आहे. एका वाहनाने बॅरियर तोडून गेट क्रमांक २ मधून

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या

Mumbai Local : कल्याण स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

कल्याण : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आजचा प्रवास मनस्तापाचा ठरला. कल्याण स्थानकावर अचानक सिग्नल यंत्रणेत