नववर्षाची पार्टी बेतली जीवावर! ४०० फुट दरीत कोसळलेल्या तरूणाला रेस्क्यू टीमने दिले जीवनदान

सातारा: नववर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण पार्टी आणि सहलीला बाहेर गेले आहेत. पार्टी म्हटल्यावर मद्य आणि मांसाहार, मत्स्याहार हे सर्व महत्त्वाचं आहे. मात्र मद्य प्यायल्यानंतर भानावर नसलेल्या तळीरामांकडून अनेक अशक्य गोष्टी घडल्याच्या बातम्या आजवर ऐकण्यात आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार साताऱ्यातून समोर आला आहे. सरत्या वर्षाच्या पार्टीसाठी कास मार्गावरील एका हॉटेलमध्ये गेलेला तरुण बुधवारी (३१ डिसेंबर) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास महादरे-यवतेश्वर येथील डोंगर कड्यावरून चारशे फूट खोल दरीत कोसळला. या घटनेनंतर शिवेंद्रराजे ट्रेकर्स आणि रेस्क्यू टीमने चार तास जंगलातून पायपीट करत घटनास्थळ गाठून तरुणाचा जीव वाचवला आहे.


शिवेंद्रराजे ट्रेकर्स आणि रेस्क्यू टीमने पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास तरुणाला दरीतून वर आणून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. आदित्य कांबळे (रा. माहुली, सातारा) असे दरीत कोसळलेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कास मार्गावरील एका हॉटेलमध्ये सरत्या वर्षानिमित्त आदित्य कांबळे पार्टीसाठी गेला होता. पार्टीमध्ये मद्य घेतल्यानंतर लघुशंकेसाठी बाहेर गेलेल्या आदित्यचा तोल जाऊन तो महादरे-येवतेश्वर डोंगराच्या कड्यावरून चारशे फूट खोल दरीत कोसळला. या घटनेची माहिती मिळताच शिवेंद्रराजे ट्रेकर्स आणि रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी जंगलातून पाच किलोमीटर पायपीट करत घटनास्थळ गाठले.




शिवेंद्रराजे ट्रेकर्स आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचताच दरीत कोसळलेला आदित्य तरूण बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. ४०० फुट उंचावरून थेट खाली कोसळल्याने त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. सध्या तो वैद्यकीय उपचाराखाली असून त्याला वेळेत मदत मिळाल्याने त्याचा जीव वाचला आहे. मात्र त्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर असून डोक्याला गंभीर दुखापत झालेली होती.


कडाक्याच्या थंडीतदेखील रात्रभर बचाव मोहीम राबवत रेस्क्यू टीमने जखमी तरूणाला महादरेच्या जंगलातून बाहेर काढले. यानंतर रूग्णवाहिकेतून तरुणाला तातडीने सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करताना उत्साहाला आवर घातला नाही तर जीवावर कसे बेतू शकते, हे या घटनेतून पाहायला मिळाले.

Comments
Add Comment

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी