मीरा-भाईंदरमध्ये भाजप - शिवसेना स्वबळावर

जोरदार शक्तिप्रदर्शन करत भरले नामांकन पत्र


भाजपचे ३ माजी महापौर रिंगणात; २४ वर्षीय युवतीला उमेदवारी


भाईंदर : मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजप शिवसेना युती होणार किंवा नाही या चर्चेला आता पूर्ण विराम मिळाला असून दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवीत आहेत. भाजपा आणि शिवसेनेने जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारांनी आपली नामांकन पत्रे भरली आहेत.


भाजपाने २४ वर्षीय युवतीला उमेदवारी देऊन निवडून आणण्याचे आव्हान स्वीकारल्यामुळे ती सर्वात कमी वयाची नगरसेविका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. युती बाबतच्या चर्चेला यश न आल्याने दोन्ही पक्षांनी मंगळवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी स्वबळावर निवडणूक लढवण्याचे आपल्या उमेदवारांची नामांकन पत्र भरली आहेत. उबाठाचे उपजिल्हाप्रमुख शंकर विरकर यांनी वर्षाभरापूर्वीच भाजपात प्रवेश करून मुलगी आकांक्षा विरकर हिला शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या प्रभाग क्र. १० मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे.


भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी आकांक्षाला निवडून आणण्याचा चंग बांधल्यामुळे आकांक्षा विरकर सर्वात कमी वयाची नगरसेविका होण्याची शक्यता आहे.


भाजपच्या ३ माजी महापौरांनी सुद्धा नामांकन पत्र भरली आहेत. तसेच उप महापौर हसमुख गहलोत यांनीसुद्धा पूर्वीच्याच प्रभागातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काही माजी नगरसेवकांच्या प्रभागात अदलाबदल करण्यात आली आहे. शहरातील ७ निवडणूक कार्यालयात सर्व पक्षीय उमेदवारांनी गर्दी केली होती. भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), उबाठा, मनसे, रिपब्लिकन पार्टी, आम आदमी पार्टी, तसेच अनेक अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.


मीरा भाईंदरमध्ये भाजप ८६ जागा लढविणार; राष्ट्रवादी (अजित पवार) ८ तर १ आरपीआय ९५ जागांपैकी भाजप ८६ जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यासाठी ८ तर आरपीआय साठी १ जागा सोडण्यात आली आहे. आ.मेहता मेहता यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. भाजपने जागा वाटपात सर्व प्रादेशिक उमेदवारांना संधी दिली आहे. ७० हून अधिक उमेदवार जिंकण्याचा विश्वास नरेंद्र मेहता यांनी व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षा होणार, प्रफुल्ल पटेलांची घोषणा

नवी दिल्ली : अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाच्या नेतृत्वाबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला

Sunil Tatkare: विलीनीकरणाबाबत प्रस्ताव आल्यास भाजपला विश्वासात घेणे अनिवार्य - सुनील तटकरे

शशिकांत शिंदे यांच्या लेखाचा घेतला समाचार मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य

Devendra Fadnavis: तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रासाठी वाकायामा प्रांताशी सहकार्य अधिक दृढ करणार - मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई: महाराष्ट्र आणि जपानच्या वाकायामा प्रांतामधील संबंध मैत्रीपूर्ण आहेत. तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा

ISRO Science Trip: अंतराळ संशोधन क्षेत्रात ग्रामीण विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी इस्रो विज्ञान सहल

- विज्ञान प्रेरणा अभियानांतर्गत आश्रमशाळेतील १०० विद्यार्थी सहलीत सहभागी होणार मुंबई : इतर मागास बहुजन कल्याण

NCP Merger: शरद पवार गटाच्या साप्ताहिकातून मोठा दावा, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर आम्ही पक्षाचं नेतृत्व अजित पवारांकडे...

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला असतानाच,

Narhari Zirwal: "चौकशीत नाव आलं तर..."; ACB च्या छाप्यानंतर नरहरी झिरवाळ यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या