कोकणातील आंबा-काजू उत्पादकांना मोठा दिलासा; हेक्टरी २२ हजार रुपयांपर्यंत मदत देण्याचा राज्य सरकारचा मानस

मुंबई: गेल्या काही दिवसांत झालेल्या अवेळी पाऊस आणि हवामान बदलामुळे कोकणातील आंबा आणि काजू पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अत्यंत सकारात्मक पाऊल उचलले असून, फळ पीक विमा न उतरवलेल्या शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत देण्याची तयारी दर्शविली आहे. मुख्यमंत्री यांनी आज विधानसभेत यासंदर्भात सविस्तर माहिती देत पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याचे जाहीर केले.





नुकसानीचा प्राथमिक अहवाल आणि बैठक


आंबा व काजू पिकाच्या सद्यस्थितीबाबत १७ मार्च रोजी पहिली महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सादर करण्यात आलेल्या प्राथमिक अहवालानुसार, प्रतिकूल हवामानामुळे यंदा फळधारणा अत्यंत कमी झाली असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांतील सुमारे ८० हजार शेतकऱ्यांनी आंबा पिकासाठी विमा उतरवला आहे. कोकणातील ३०२ महसूल मंडळांपैकी १५५ मंडळांमध्ये नुकसानीची तीव्रता अधिक असल्याचे समोर आले आहे.


विमा संरक्षण आणि नुकसान भरपाईचे स्वरूप


अवेळी पावसामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी १५ मे पर्यंत विमा संरक्षण लागू आहे. हवामान आधारित फळ पीक विमा योजनेअंतर्गत आंबा उत्पादकांसाठी प्रति हेक्टर २ लाख २७ हजार रुपये नुकसान भरपाईची तरतूद आहे. तर काजू उत्पादकांसाठी प्रति हेक्टर १ लाख ६० हजार रुपये नुकसान भरपाई मिळू शकते. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवलेला नाही, त्यांनाही वाऱ्यावर न सोडता शासन स्तरावर आर्थिक मदत दिली जाणार आहे. गेल्या वेळी अशा शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १५ हजार रुपये देण्यात आले होते. मात्र, नुकसानीचे स्वरूप पाहता यंदा ही मदत वाढवून २२ हजार रुपये प्रति हेक्टर देण्याचा सरकारचा मानस असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : इस्रायलमध्ये छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार

शिवराज्याभिषेक दिनी महावाणिज्यदूत यानीव रेवाच यांची घोषणा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द केले

Ind vs Afg :टीम इंडियाला मोठा धक्का! अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेतून विराट कोहली बाहेर;यशस्वी जयस्वाल संधी !

मुंबई : अफगाणिस्तान विरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषण करण्यात आली आहे.संघात मोठे बदल करण्यात आले आहेत.

Minister of State Ramdas Athawale : जातनिहाय जनगणना होईपर्यंत अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करू नये

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी; 'बदर समिती' बरखास्त करण्याची मुख्यमंत्र्यांकडे करणार

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Nashik : कांदा उत्पादकांना मोठा दिलासा! ‘नाफेड-NCCF’ थेट बाजारात; 'या' दिवसापासून कांदा खरेदी सुरू

Nashik Onion Farmer : मागील अनेक दिवसांपासून कमी दरामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं होतं. योग्य

The Fort owners : किल्लेदारांनी बोटीतून केली मिठी नदीची सैर... दाखवला नदीत कचऱ्यासह तीन फुटांपर्यंतचा गाळ

मुंबई : मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सध्या नालेसफाईच्या कामाला सुरुवात असून सत्ताधारी पक्षाकडून प्रत्येक