नववर्षाच्या रात्री ‘लेट नाईट’ बेस्ट बससेवा

गेटवे ते गोराईपर्यंत बेस्टची स्पेशल राइड


मुंबई : नववर्ष स्वागतासाठी बुधवारी (दि. ३१) रोजी रात्री मोठ्या प्रमाणावर नागरिक समुद्रकिनाऱ्यांकडे नववर्षाचा जल्लोष साजरा करण्यासाठी जाणार असल्याने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्ट उपक्रमातर्फे विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. गेटवे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई खाडी, मार्वे चौपाटी आदी ठिकाणी जाण्यासाठी रात्री १० वाजल्यापासून १२.३० वाजेपर्यंत विविध बसमार्गांवर अतिरिक्त बसफेऱ्या सुरू करण्यात येणार असून, प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनाने केले आहे.
याअंतर्गत बसमार्ग क्र. ए-२१, सी-८६, ए-११२, ए-११६, २०३, २३१, ए-२४७, ए-२७२ आणि ए-२९४ या मार्गांवर अतिरिक्त बसगाड्या धावणार आहेत. तसेच ‘हेरिटेज टूर’ हा विशेष बसमार्ग बुधवारी सायंकाळी ५.३० वाजल्यापासून गुरुवारी नववर्षाच्या पहाटेपर्यंत प्रवासी प्रतिसादानुसार चालविण्यात येणार आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री नववर्ष स्वागतासाठी प्रवाशांनी बेस्ट उपक्रमातर्फे सुरू करण्यात येणाऱ्या या अतिरिक्त बसफेऱ्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

अतिरिक्त बसफेऱ्यांचा तपशील पुढीलप्रमाणे :

  •  बस मार्ग ए-२१ (डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक ते देवनार आगार) – ३ बस

  • सी-८६ (डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक ते वांद्रे आगार) – ३ बस,

  • ए-११२ (डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक ते चर्चगेट स्थानक) – ३ बस

  • ए-११६ (डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) – ५ दुमजली बस

  •  २०३ (अंधेरी स्थानक (पश्चिम) ते जुहू चौपाटी) – २ बस

  • २३१ (सांताक्रूझ स्थानक (पश्चिम) ते जुहू बस स्थानक) – ४ बस

  • ए-२४७ व ए-२९४ (बोरिवली बस स्थानक (पश्चिम) ते गोराई बीच) – २ बस

  • ए-२७२ (मालाड स्थानक (पश्चिम) ते मार्वे चौपाटी) – २ बस.

Comments
Add Comment

महाविद्यालयीन शुल्कातील गैरप्रकारांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत घोषणा; दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे संकेत मुंबई :

'गॅस तुटवड्याविषयी सरकारने उपाययोजना कराव्यात'

मुंबई : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशासह राज्यात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचे पडसाद बुधवारी

नागरिकांना विनासायास डिजिटल सेवा मिळण्यासाठी व्यापक धोरण तयार करा; माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय ई-सेवा आणि आधार संबंधित सेवा कोणत्याही अडथळ्याविना मिळाव्यात,

माजी सैनिक आणि भूमिहीनांच्या जमिनी वर्ग १ होणार, महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा

मुंबई : राज्यातील माजी सैनिक, भूमिहीन शेतकरी आणि शेतमजुरांना महाराष्ट्र शेत जमीन (सीलिंग) अधिनियमांतर्गत वाटप

प्रवासी आरक्षण सेवा इतके तास बंद राहणार

मुंबई : मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) दिनांक १२.०३.२०२६ रोजी २३.४५ वाजल्यापासून दिनांक १३.०३.२०२६ रोजी

एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! महामंडळात १७,७४२ पदांची होणार जंगी भरती

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी)