तिकीट वाटपावरून मातोश्रीत मध्यरात्री जोरदार राडा

मुंबई : मातोश्रीच्या किचन कॅबिनेटमध्ये रविवारी मध्यरात्री जोरदार राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. आमदार वरुण सरदेसाई यांच्या सांगण्यावरून अनिल परब समर्थकाचे तिकीट कापल्याने वादाला सुरुवात झाली. पुढे हा वाद टोकाला गेला आणि परब-सरदेसाई हमरातुमरीवर आले. शेवटी पक्षप्रमुखांनी भाच्याची बाजू घेतल्याने स्वतःला निष्ठावंत म्हणून घेणारे परब रागाने लालबूंद झाले आणि बैठक सोडून तडकाफडकी घरचा रस्ता धरला.


अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे येथील प्रभाग क्रमांक ९५ च्या उमेदवारीवरून हा वाद झाला. अनिल परब यांनी या जागेसाठी त्यांचे समर्थक चंद्रशेखर वायंगणकर यांचे नाव निश्चित केले होते. मात्र, ऐनवेळी वायंगणकर यांचे तिकीट कापून श्रीकांत सरमळकर यांचे जावई आदिक शास्त्री यांना उमेदवारी देण्यात आली. शास्त्री यांच्या नावासाठी स्थानिक आमदार वरुण सरदेसाई यांनी शिफारस केली होती.


मात्र, आपल्या समर्थकाचे तिकीट कापले गेल्याने अनिल परब यांचा संयम सुटला. मध्यरात्री सुरू असलेल्या बैठकीत त्यांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला. त्यात सरदेसाई यांनी मध्ये तोंड घातल्याने, दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. शेवटी वाद इतका विकोपाला गेला, की परब संतापून बैठक सोडून गेले. आता हा वाद कोणते स्वरुप धारण करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Comments
Add Comment

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला

मृणालताई गोरे विस्तारित उड्डाणपूलाच्या वाढीव खर्चावरून शंका; स्थायी समितीचे सदस्य करणार प्रत्यक्ष जागेची पाहणी

मुंबई: मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या राम मंदिर रोड ते गोरेगाव पश्चिम पर्यंतच्या रिलीफ रोड

सहली आडून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा घाट भाजपने उधळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांची राणीबाग आणि बोरीवली नॅशनल पार्कमध्ये सहल आयोजित करण्याचा

अखेर महापौर चषक स्पर्धा होणार; सन २०२६-२७ मध्ये होणाऱ्या महापौर चषक क्रीडा स्पर्धांसाठी पाच कोटी रुपये निधीची तरतूद

मुंबई: डिजिटल युगात मुले भ्रमणध्वनीभोवती गुरफटली आहेत. मुले मैदानी खेळ विसरली आहेत. मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ कमी

मुंबई अखंडपणे धावण्यामागे महिलांचे योगदान मोठे; 'सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार’ सोहळ्याप्रसंगी महापौरांचे वक्तव्य

मुंबई: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजातील अन्यायाविरोधात उभे राहत मुलींसाठी शिक्षणाचा मार्ग खुला