मुंबईत शरद पवार गटाला धक्का! राखी जाधव भाजपमध्ये प्रवेश करणार?

मुंबई: राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे. शरद पवार गटाने मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी रोहित पवार यांना दिल्याने राखी जाधव नाराज झाल्याचे चिन्ह आहे. यामुळे शरद पवार गटाला राम राम देऊन, भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. राखी जाधव यांचा आजच पक्षप्रवेश होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुंबई अध्यक्षांनीच पक्षाची साथ सोडल्यामुळे शरद पवार गटाला धक्का बसणार आहे.


राखी जाधव या गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचा किल्ला एकहाती लढवत होत्या. राष्ट्रवादीतील फुटीनंतर त्या शरद पवार गटासोबत एकनिष्ठ होत्या. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शरद पवार गट आणि उबाठामध्ये असलेल्या आघाडीमध्ये शरद पवार गटाच्या वाट्याला फक्त ५ ते १० जागा आल्याने त्या प्रचंड नाराज झाल्या होत्या. राखी जाधवांप्रमाणेच गटातील इतर कार्यकर्तेसुद्धा नाराज असल्याने अनेकांनी अजित पवारांकडे मोर्चा वळवला. तर राखी जाधव यांनी थेट कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

राखी जाधव या राजकारणातील प्रवेशापासून राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहेत. पक्ष फुटीनंतर त्या शरद पवार गटामध्ये सक्रिय होत्या. मागील अनेक वर्षापासून त्या मुंबईमध्ये राष्ट्रवादीची धुरा सांभाळत आहेत. घाटकोपरच्या पूर्व भागात त्या स्थानिक नेत्या म्हणून सक्रिय असून मतदार संघातील प्रत्येकासोबत त्यांचा जवळचा संबंध आहे. मागील दोन वर्षापासून त्या शरद पवार गटाच्या मुंबई अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत असून त्यांच्याकडे अनेक वर्षाचा राजकारणाचा अनुभव आहे.

Comments
Add Comment

उबाठा गटाने ४२ जणांना दिले एबी फॉर्म

मुंबई: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता दुसऱ्या आणि

मुंबई मनपासाठी भाजपची पहिली यादी जाहीर! ६७ जणांना उमेदवारी

मुंबई: महानगर पालिका निवडणूक २०२५ साठी सर्वच पक्षांकडून जागा वाटपासाठी बैठकींचा धडाका सुरू आहे. राज्यात

नव्या वर्षासाठी रेल्वे प्रशासनाचे सज्ज! मुंबईच्या सेवेत येणार अतिरिक्त उपनगरीय आणि एक्सप्रेस गाड्या

मुंबई: नव्या वर्षाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना रेल्वेकडून नागरिकांना नवा वर्षीची भेट मिळाली आहे. मुंबईतील

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास

मुंबई उपनगरीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलणार

१८,३६४ कोटींचे ४०० किमी रेल्वे प्रकल्प मार्गी मुंबई : मुंबईची उपनगरीय रेल्वेव्यवस्था येत्या काही वर्षांत

सरकारी रुग्णालयांमध्ये डिजिटल सुविधा सुरू करणार

केईएम, जेजेमध्ये AI-आधारित शवविच्छेदन मुंबई : न्यायवैद्यक शास्त्राचे आधुनिकीकरण करण्याच्या दिशेने एक