डोंबिवली शहराचा पाणीपुरवठा मंगळवारी बारा तास बंद

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शहराचा पाणी पुरवठा येत्या मंगळवार, ३० डिसेंबर रोजी सकाळी ९ ते रात्र ९ या वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. खंबाळपाडा भागातील एक जलकुंभाच्या जलवाहिनीमध्ये गळती होत असल्याने ती दुरुस्त करण्यासाठी हा पाणीपुरवठा बंद केला जात आहे, असे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. कल्याण डोंबिवली महापालिका उल्हासनदीतून पाणी उचलते. या पाण्यावर प्रक्रिया करून ते शहरातील ग्राहकांपर्यंत पोहचवले जाते. मोहिली उदंचन केंद्रातून उचललेले पाणी नेतिवली जलशुध्दीकरण केंद्रात पाठविले जाते आणि तेथे शुध्दीकरणानंतर डोंबिवली पूर्व व पश्चिम शहरांना पुरवठा केले जाते.


केंद्र आणि राज्य शासनाच्या समन्वयाने अमृत योजना दोन चा टप्पा महापालिका हद्दीत राबविला जात आहे. या योजनेतून खंबाळपाडा भागातील एका उंच जलकुंभाची अंतर्गत जलवाहिका महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीस जोडण्यात आली आहे. या जोडणीच्या ठिकाणी तांत्रिक कारणामुळे गळती अधिक प्रमाणात झाली आहे. या गळतीचे पाणी परिसरात पसरल्याने दुरुस्ती आवश्यक ठरली आहे. मंगळवारी या ठिकाणी नवीन जोडसांधा बसविण्यासाठी काम करण्यात येणार आहे. यामुळे गळती थांबेल, असे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी म्हणाले. या कालावधीत नेतिवली जलशुध्दीकरण केंद्र देखील बंद राहणार आहे.

Comments
Add Comment

LPG Scam : पोलिसांनी उधळला LPG सिलिंडरचा काळा बाजार करण्याचा डाव

ठाणे : पश्चिम आशियात युद्ध सुरू झाल्यापासून देशात ठिकठिकाणी एलपीजी सिलिंडरची कृत्रिम टंचाई निर्माण करून

Sahar Shaikh MIM Mumbra : अब कैसे लटकाया...! एक नाही तर ४ शासकीय कार्यालयांना बाप-लेकीनं लावला चुना; पण आता...?

ठाणे : ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांना

Sahar Shaikh Mumbra AIMIM : कैसा हराया... एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख गोत्यात! बनावट जात दाखल्याने पालिकेची खुर्ची धोक्यात ?

ठाणे : जानेवारी महिन्यात पार पडलेल्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीत ज्यांच्या 'कैसा हराया...' या डायलॉगची चर्चा

Dombivali News : पर्यटनासाठी कोकणात गेलेल्या डोंबिवलीच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

डोंबिवली : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील आरे समुद्र किनाऱ्यावर घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत डोंबिवलीतील २४

Kanjur Marg to Badlapur Metro : लवकरच धावणार शहरातील सर्वात लांब मेट्रो; बदलापूरकरांना होणार फायदा

मुंबई : संपूर्ण मुंबईत मेट्रो आपले जाळे विणत चाललं आहे, त्यामुळे मुंबईकरांचा दररोजचा प्रवास हा सुखकर आणि

Mumbai Metro 5 : भिवंडी शहरात पहिल्यांदाच धावणार मेट्रो; 'ऑरेंज मेट्रो लाइन ५' साठी नवी डेडलाईन जाहीर!

ठाणे : दहिसर-काशीगाव मेट्रोच्या यशानंतर आता ठाणे शहरात धावणाऱ्या 'ऑरेंज लाईन' मेट्रो ५ च्या कामाला मोठी गती