लातूरकरांचा प्रवास सुसाट! राज्य सरकारची मुंबई-लातूर महामार्गाला संमती, संरेखनेचे काम अंतिम टप्प्यात

मुंबई: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबई ते लातूर प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळला आहे. मुंबई ते लातूर प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कल्याण–लातूर जनकल्याण द्रुतगती महामार्ग उभारण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून या प्रकल्पाला तत्वतः मान्यता मिळाल्यानंतर एमएसआरडीसीने महामार्गाच्या संरेखनाचे काम प्रत्यक्षात सुरू केले आहे.


एमएसआरडीसीच्या सुमारे चार हजार किलोमीटर लांबीच्या प्रस्तावित रस्ते प्रकल्पांमध्ये कल्याण–लातूर द्रुतगती महामार्गाचा समावेश अनेक वर्षांपूर्वी करण्यात आला होता. मात्र दीर्घकाळ हा प्रकल्प कागदावरच मर्यादित राहिला होता. अलीकडे हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाविषयी सादरीकरण पाहिल्यानंतर प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले. त्यानंतर विधानसभेत अधिकृत घोषणा करून या महामार्गाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा करण्यात आला.



मराठवाड्याचा, विशेषतः लातूर जिल्ह्याचा विकास वेगाने साधावा या उद्देशाने या महामार्गाला 'जनकल्याण महामार्ग' असे नाव देण्यात आले आहे. या मार्गामुळे मुंबई, ठाणे परिसर आणि मराठवाडा यांच्यातील अंतर व प्रवासाचा कालावधी मोठ्या प्रमाणात कमी होणार असून व्यापार, उद्योग, शेतीमाल वाहतूक आणि दळणवळणाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. हा महामार्ग एकूण सहा जिल्ह्यांतून जाणार असून त्याचा लाभ ठाणे, पुणे, अहिल्यानगर, बीड, धाराशीव आणि लातूर या जिल्ह्यांतील अनेक तालुके व शहरांना होणार आहे.



राज्य सरकारच्या मंजुरीनंतर एमएसआरडीसीने सल्लागारांच्या माध्यमातून संरेखनाचे काम सुरू केले आहे. संरेखनेचे काम अंतिम टप्प्यात असून अंतिम संरेखन जाहीर झाल्यानंतरच महामार्गाचा नेमका मार्ग, बाधित क्षेत्रे आणि पुढील टप्प्यांबाबत अधिक स्पष्ट माहिती समोर येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. हा महामार्ग प्रत्यक्षात आल्यास मराठवाड्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

CH. SAMBHAJINAGAR : MGM Hospital परिसरात नायजेरियन तरुणांकडून महिलेची छेडछाड आणि मारहाण

छत्रपती संभाजीनगर: शहरातील MGM Hospital परिसरात एका महिलेची छेडछाड व मारहाण झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या

Malegaon Namaz Pathan : मालेगाव मनपा कार्यालयात नमाज पठण, सात जणांवर गुन्हा दाखल

मालेगाव महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये नमाज पडल्याप्रकरणी सात जणांवरती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल

शनिवारपासून सलग पाच दिवस बँका राहणार बंद

मुंबई: तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर

Air Ticket Refund Rules: विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; आतापासून तिकिट रद्द केल्यास परतावा..., जाणून घ्या नवीन नियम

मुंबई: देशातील विमान प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान

12th Exam Paper Leak : बारावी पेपरफुटी प्रकरणाला अंत नाहीच! रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रानंतर गणिताचा पेपरसुद्धा फुटला ?

नागपूर : बारावी पेपरफुटी प्रकणात नवनवीन धक्कादायक खुलासे सुरुच आहेत. १८ फेब्रुवारी रोजी पेपर फुटीचा पोलीस

बल्लारपूर येथे टिंबर म्युझियम व झायलरियम उभारणार; सुधीर मुनगंटीवारांच्या मागणीला वनमंत्र्यांचे ठाम आश्वासन

मुंबई: राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी