विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध


मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती येणार आहे. या प्रकल्पाचे भूसंपादन आर्थिक अडचणींमुळे रखडले होते, मात्र आता भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला आहे.


राज्य सरकारने भूसंपादनासाठीच्या २२ हजार ५०० कोटी रुपयांच्या कर्जासाठी हमी दिल्यानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) हुडकोकडून २२ हजार ५०० कोटी रूपयांचे कर्ज उपलब्ध झाले आहे. आर्थिक अडचण दूर झाल्याने आता महिन्याभरात भूसंपादनाच्या कामास सुरुवात केली जाणार असून तीन महिन्यात ७० टक्के भूसंपादन पूर्ण करण्याचे नियोजन एमएसआरडीसीचे आहे.


विरार ते अलिबाग प्रवास अतिजलद करण्यासाठी विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका बांधण्यात येणार आहे. मात्र अद्याप या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. आर्थिक कारणांमुळेच या प्रकल्पाचे भूसंपादन रखडले होते.


आता मात्र नवीन वर्षात या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्याचे नियोजन एमएसआरडीसीचे आहे. त्यानुसार एमएसआरडीसीने १२९ किमीच्या विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेतील नवघर ते बलवली अशा ९८ किमीच्या मार्गिकेच्या बांधकामासाठी बांधा-वापरा-हस्तांतरीत करा तत्वानुसार निविदा काढण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे.


या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर तात्काळ निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. आता या प्रकल्पातील भूसंपादनाचा मार्गही मोकळा झाला आहे. पहिल्या टप्प्यातील भूसंपादनासाठी हुडकोकडून कर्ज घेण्यासाठी राज्य सरकारने हमी दिल्यानंतर आता हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज मिळाले आहे. कर्ज मिळाल्याने आता महिन्याभरात भूसंपादनाच्या प्रक्रियेस सुरुवात केली जाणार आहे.


Comments
Add Comment

महावितरणचा 'आयपीओ' येणार - उत्पन्न वाढीसाठी मुख्यमंत्र्यांनी केली सूचना; 'कॉर्पोरेट गव्हर्नन्स' चा अंमल करणार

मुंबई : ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असलेल्या बाजारपेठेचा लाभ उठवित महावितरणने आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) आणत

Kokan Railway: कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! शिमग्यासाठी धावणार खास विनाआरक्षित 'ही' ट्रेन

मुंबई : कोकणकरांसाठी महत्वाचा सण म्हणजे शिमगा, राज्याच्या कानाकोपऱ्यातून चाकरमानी आपल्या गावी शिमग्यासाठी

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :