विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध


मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती येणार आहे. या प्रकल्पाचे भूसंपादन आर्थिक अडचणींमुळे रखडले होते, मात्र आता भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला आहे.


राज्य सरकारने भूसंपादनासाठीच्या २२ हजार ५०० कोटी रुपयांच्या कर्जासाठी हमी दिल्यानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) हुडकोकडून २२ हजार ५०० कोटी रूपयांचे कर्ज उपलब्ध झाले आहे. आर्थिक अडचण दूर झाल्याने आता महिन्याभरात भूसंपादनाच्या कामास सुरुवात केली जाणार असून तीन महिन्यात ७० टक्के भूसंपादन पूर्ण करण्याचे नियोजन एमएसआरडीसीचे आहे.


विरार ते अलिबाग प्रवास अतिजलद करण्यासाठी विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका बांधण्यात येणार आहे. मात्र अद्याप या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. आर्थिक कारणांमुळेच या प्रकल्पाचे भूसंपादन रखडले होते.


आता मात्र नवीन वर्षात या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्याचे नियोजन एमएसआरडीसीचे आहे. त्यानुसार एमएसआरडीसीने १२९ किमीच्या विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेतील नवघर ते बलवली अशा ९८ किमीच्या मार्गिकेच्या बांधकामासाठी बांधा-वापरा-हस्तांतरीत करा तत्वानुसार निविदा काढण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे.


या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर तात्काळ निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. आता या प्रकल्पातील भूसंपादनाचा मार्गही मोकळा झाला आहे. पहिल्या टप्प्यातील भूसंपादनासाठी हुडकोकडून कर्ज घेण्यासाठी राज्य सरकारने हमी दिल्यानंतर आता हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज मिळाले आहे. कर्ज मिळाल्याने आता महिन्याभरात भूसंपादनाच्या प्रक्रियेस सुरुवात केली जाणार आहे.


Comments
Add Comment

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील

मुंबईत महायुतीला बहुमत मिळाल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून केले अभिनंदन

राज्यभरातील २९ महानगरपालिकांमध्ये महायुतीच अव्वल मुंबई : अत्यंत प्रतिष्ठेची निवडणुक ठरलेल्या मुंबई

Raj Thackeray : भावाशी युती करूनही राज ठाकरेंच्या खात्यात २२ शून्य, मुंबईत 'मनसे'ला जबरदस्त धक्का; ठाकरे ब्रँड फेल!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेसाठी २० वर्षांचा वनवास संपवून एकत्र आलेल्या 'ठाकरे बंधूं'साठी आजचा निकाल

तेजिंदर सतनाम सिंग तिवाना यांचा प्रचंड मतांनी दणदणीत विजय

वार्ड ४७ मध्ये तरुणाईचा विजयघोष मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत वार्ड क्रमांक ४७ मधून भारतीय जनता पक्षाचे

Chandrashekhar Bawankule : महाराष्ट्रानं विकासालाच कौल दिला!" भाजपच्या मुसंडीनंतर बावनकुळेंनी मानले मतदारांचे आभार

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांचे कल स्पष्ट होऊ लागले असून, भाजपने महायुतीसह मुसंडी मारली