प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता


मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा वाटपाचा तिढा सोडवण्याच्या दृष्टीकोनातून त्यांचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, माहिम आणि वरळी विधानसभेत मोडणाऱ्या प्रभादेवीतील प्रभाग क्रमांक १९४ची जागा मनसेला सोडण्यावरून उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरलेली आहे. मनसेने दोन्ही इच्छुकांच्या नावाला उबाठाच्या पदाधिकाऱ्यांनी ना पसंती दर्शवली आहे. मनसेला हा प्रभाग सोडण्यास उबाठाच्या पदाधिकाऱ्यांचा जोरदार विरोध असून कोणत्याही परिस्थितीत हा प्रभाग उबाठा गटालाच सोडला जावा यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे उबाठाने मनसेला हा प्रभाग सोडल्यास याठिकाणी उबाठा गटाला मोठ्या बंडखोरीला सामोरे जाण्याची भीती प्रभागातील पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.


वरळीतील प्रभाग क्रमांक १९४मध्ये सध्या शिवसेनेचे समाधान सरवणकर हे नगरसेवक आहेत आणि समाधान सरवणकर यांना रोखण्यासाठी उबाठा पक्षामध्ये आधीपासूनच रणनिती ठरलेली आहे. या प्रभागातून उबाठा गटाच्यावतीने शेखर भगत आणि कैलास पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. दोन्ही इच्छुक उमेदवारांकडून उबाठा गटाच्यावतीने प्रचाराला सुरुवातही करण्यात आली आहे. परंतु स्थानिकांनी शेखर भगत यांच्या नावाला आधीच नापसंती दर्शवत यांच्या उमेदवारीला एकप्रकार विरोध केल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. त्यातुलनेत उबाठा गटाचे कैलास पाटील यांचा प्रचार जोरात सुरु आहे. मात्र, उबाठा गटआणि मनसेच्या युतीमध्ये प्रभाग क्रमांक १९४ ची जागा मनसेला सोडण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे या प्रभागातून मनसेच्यावतीने माजी नगरसेवक संतोष धुरी आणि मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे.


मनसेत किल्लेदार आणि धुरी यांच्यामध्ये उमेदवारी मिळवण्यावरून चढाओढ सुरु असली तरी दुसरीकडे उबाठाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी मनसेला हा प्रभाग न सोडण्याची विनंती केली आहे. तसेच मनसेकडून किल्लेदार किंवा धुरी यांना उमेदवारी दिल्यास आम्ही त्यांचे काम करणार नाही असा संदेशच आमदार आणि विभाग प्रमुख महेश सावंत यांच्या माध्यमातून पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याचीही चर्चा ऐकायला मिळत आहे. त्यामुळे माहिम आणि वरळी विधानसभेत मोडणाऱ्या या प्रभागातून उबाठा गटाचाच उमेदवार लढणार असे स्पष्ट करत एकमेव कैलास पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.मात्र, या प्रभागातून वरळीतील आमदार सुनील शिंदे यांचे बंधू निशिकांत हेही इच्छुक असल्याने कोणत्याही परिस्थितील हा प्रभाग मनसेला न सोडण्यावर उबाठाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये एकमत झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा प्रभाग येत्या काही दिवसांमध्ये चर्चेचा विषय ठरणार आहे. शिवसेनेचे संभाव्य उमेदवार समाधान सरवणकर यांच्या विरोधात उबाठा गटाचे उमेदवारच चांगली लढत देवू शकतो आणि जर मनसेचा उमेदवार आल्यास सरवणकर यांच्या विजयाचा मार्ग सुकर होईल असेही काही उबाठाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment

Mumbai Local : आता बिनधास्त प्रवास करा, महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलानं सुरू केला 'हा' नवा उपक्रम

मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना आता घाबरण्याची गरज नाही कारण चर्चगेट ते डहाणू दरम्यान लोकलनं प्रवास

Smruti Mandhana And Palash muchhal : स्मृती मानधना–पलाश मुच्छल पुन्हा एकत्र? बांद्र्यातील 'त्या' व्हिडिओने चर्चांना उधाण

मुंबई : भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या नात्याबाबत पुन्हा एकदा चर्चांना

Ramdas Athawale : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची भेट

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम जिष्णू देव वर्मा यांची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय

Bhondubaba Ashok Kharat : भोंदू खरातविरोधात तक्रारींचा महापूर, लैंगिक शोषणाचे आणखी ११ आरोप

मुंबई : वासनांध अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असून, तक्रारींची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे.

Bmc News, Andheri Subway : अंधेरी सब वे मधील पावसाचे तुंबणारे पाणी,  महापौरांनी  रेल्वेशी समन्वय राखून गती देण्याचे महापालिकेला दिले निर्देश

मुंबई : अंधेरी भूयारी मार्ग हा अतिसखल परिसर असल्याने पावसाळ्यात पाणी साचून वाहतुकीला अडथळा होतो. त्यावर

Bmc News : मुंबईत यापूर्वी खरेदी केलेल्या कचरा पेट्या गेल्या कुठे? महापालिका प्रशासनावर स्थायी समितीची प्रश्नांची सरबती

खासगी कंत्राटदार कचरा पेट्या देणार तर अधिक पेट्यांची खरेदी कशाला? पेट्या खरेदीचा प्रस्ताव अध्यक्षांनी ठेवला