ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण करण्यात आली आहे. या ठाकरे बंधूंच्या युतीमुळे उबाठा शिवसैनिक आणि मनसैनिक यांच्या दिलजमाई झाल्याचे चित्र रंगवले असले तरी प्रत्यक्षात तळाला दोन्ही पक्षाच्या कार्यकर्ते मनाने एकत्र आल्याचे दिसून येत नाही. वरळीतील डोममध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर जर युतीची घोषण केली असती तर आजच्या घडीला दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची मन जुळली असती. परंतु राज ठाकरे यांनी मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना उबाठाच्या शाखांसह कार्यक्रमांमध्ये सहभागी न होण्याच्या सूचना देण्यात आल्याने अजुन तरी मनसैनिक आणि उबाठा सैनिक मनाने एकत्र न आल्याने याचा परिणाम येत्या निवडणुुकीत दिसून येणार आहे.



उबाठाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वरळीतील पत्रकार परिषदेत दोन्ही पक्षांच्या युतीची अधिकृत घोषणा केली. त्यामुळे दोन्ही पक्ष युतीमध्ये निवडणूक लढवतील. याचा परिणाम आगामी महापालिका निवडणुकीत होईल अशाप्रकारचे वातावरण निर्माण केले जात आहे. परंतु उबाठा सैनिक या युतीसाठी आग्रही असल्या तरी मनसैनिकांच्या मनाला ही युती पटलेली नाही. काही मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही भावांचे१८ वर्षांनंतर मनोमिलन झाले होते, त्याच कार्यक्रमात जर दोन्ही पक्षांच्या युतीची घोषणा झाली असती तर आजपर्यंत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते हे एकदिलाने काम करू शकले असते. परंतु दोन भावांच्या मनोमिलनानंतर मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी गुप्त संदेश देत पदाधिकारी आणि नेत्यांना उबाठाच्या शाखांसह कार्यक्रमांमध्ये न जाण्याचे कळवले होते. त्यामुळे मनसैनिकांमध्ये प्रचंड संभ्रम पसरला होता.



काही नेत्यांच्या म्हणण्यानुसार तर युतीची घोषणा आधी झाली असती, एव्हाना दोन्ही पक्षांचे कार्यक्रम संयुक्तपणे होवू शकले असते. परंतु आता निवडणुकीच्या मतदानाला २० दिवस असताना दोन्ही पक्षांची युती झाल्याने कार्यकर्त्यांची मने जुळायला हा अवधी कमी आहे. त्यामुळे युतीची घोषणा लांबवल्यामुळे दोन्ही पक्षांचा प्रभावशील परिणाम म्हणावा तेवढा दिसून येणार नाही.

या युतीमुळे जे जुने शिवसैनिक आहेत ते आणि ज्यांचा गुजराती,मारवाडीसह इतरांवर राग आहेत, ते आनंद व्यक्त करताना दिसतील आणि ते मतदान करतील. मनसैनिक शिवसेेनेच्या उमेदवाराला मतदान करतील किंवा मन लावून काम करेल असे चित्र नसेल. त्यामुळे या युतीचा फायदा उबाठा शिवसेनेला होणार नसून याचा फायदा झाला तर राज ठाकरे यांच्या मनसे पक्षालाच अधिक होईल,अशीही शक्यता तळागाळातून व्यक्त होताना दिसत आहे.
Comments
Add Comment

चित्र साकारताना कल्पनाशक्तीची ज्योत सतत तेवत ठेवा; शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांचा संदेश

मुंबई: चित्रकला म्हणजे मनातील विचारांना कागदावर उतरविण्याचे साधन असते. यात निसर्गातील विविध रंगांसह आपल्या

मुंबई महापालिका रुग्णालयांमधील मिळणार खाटांची माहिती; डॅशबोर्डची सेवा उपलब्ध करून देणार

मुंबई: नागरिकांना महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपलब्ध रुग्णशया व अतिदक्षता विभागातील रुग्णाशय्या इत्यादी

घाटकोपरवासियांचा १० एप्रिल २०२६ पासून पाणीपुरवठा पूर्ववत; पुढील काही दिवस उकळून प्यावे लागणार पाणी

मुंबई: घाटकोपर (पश्चिम) येथील घाटकोपर निम्नस्तरीय जलाशयातील दोन कप्प्याच्या दुरुस्तीचे काम महानगरपालिकेच्या

MLA Amit Satam सीसी रस्त्यांमुळे खड्डे दुरुस्तीवरील खर्चात जवळपास ७० टक्क्याहून अधिक घट — भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम

आमदार अमीत साटम यांनी घेतला सीसी रस्त्यांच्या कामांचा आढावा मुंबई : भाजप-नेतृत्वाखालील महायुती सरकारकडून

Matunga Fire : माटुंगा वर्कशॉपमध्ये ट्रेनच्या डब्यांना भीषण आग; धुरामुळे परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : मुंबईतील माटुंगा रेल्वे वर्कशॉप येथे आज म्हणजेच मंगळवार ७ एप्रिल रोजी दुपारी उभ्या असलेल्या ट्रेनच्या

रंगांमधून उमलणारी स्वप्नं : जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये

दिव्यांग कलाकारांसाठी ‘विविधतेचा उत्सव’ मुंबई : कॅनव्हासवर रंग उमटत होते, पण ते केवळ चित्र