ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण करण्यात आली आहे. या ठाकरे बंधूंच्या युतीमुळे उबाठा शिवसैनिक आणि मनसैनिक यांच्या दिलजमाई झाल्याचे चित्र रंगवले असले तरी प्रत्यक्षात तळाला दोन्ही पक्षाच्या कार्यकर्ते मनाने एकत्र आल्याचे दिसून येत नाही. वरळीतील डोममध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर जर युतीची घोषण केली असती तर आजच्या घडीला दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची मन जुळली असती. परंतु राज ठाकरे यांनी मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना उबाठाच्या शाखांसह कार्यक्रमांमध्ये सहभागी न होण्याच्या सूचना देण्यात आल्याने अजुन तरी मनसैनिक आणि उबाठा सैनिक मनाने एकत्र न आल्याने याचा परिणाम येत्या निवडणुुकीत दिसून येणार आहे.



उबाठाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वरळीतील पत्रकार परिषदेत दोन्ही पक्षांच्या युतीची अधिकृत घोषणा केली. त्यामुळे दोन्ही पक्ष युतीमध्ये निवडणूक लढवतील. याचा परिणाम आगामी महापालिका निवडणुकीत होईल अशाप्रकारचे वातावरण निर्माण केले जात आहे. परंतु उबाठा सैनिक या युतीसाठी आग्रही असल्या तरी मनसैनिकांच्या मनाला ही युती पटलेली नाही. काही मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही भावांचे१८ वर्षांनंतर मनोमिलन झाले होते, त्याच कार्यक्रमात जर दोन्ही पक्षांच्या युतीची घोषणा झाली असती तर आजपर्यंत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते हे एकदिलाने काम करू शकले असते. परंतु दोन भावांच्या मनोमिलनानंतर मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी गुप्त संदेश देत पदाधिकारी आणि नेत्यांना उबाठाच्या शाखांसह कार्यक्रमांमध्ये न जाण्याचे कळवले होते. त्यामुळे मनसैनिकांमध्ये प्रचंड संभ्रम पसरला होता.



काही नेत्यांच्या म्हणण्यानुसार तर युतीची घोषणा आधी झाली असती, एव्हाना दोन्ही पक्षांचे कार्यक्रम संयुक्तपणे होवू शकले असते. परंतु आता निवडणुकीच्या मतदानाला २० दिवस असताना दोन्ही पक्षांची युती झाल्याने कार्यकर्त्यांची मने जुळायला हा अवधी कमी आहे. त्यामुळे युतीची घोषणा लांबवल्यामुळे दोन्ही पक्षांचा प्रभावशील परिणाम म्हणावा तेवढा दिसून येणार नाही.

या युतीमुळे जे जुने शिवसैनिक आहेत ते आणि ज्यांचा गुजराती,मारवाडीसह इतरांवर राग आहेत, ते आनंद व्यक्त करताना दिसतील आणि ते मतदान करतील. मनसैनिक शिवसेेनेच्या उमेदवाराला मतदान करतील किंवा मन लावून काम करेल असे चित्र नसेल. त्यामुळे या युतीचा फायदा उबाठा शिवसेनेला होणार नसून याचा फायदा झाला तर राज ठाकरे यांच्या मनसे पक्षालाच अधिक होईल,अशीही शक्यता तळागाळातून व्यक्त होताना दिसत आहे.
Comments
Add Comment

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून