मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार


मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील इच्छुक उमेदवारांच्या अंगात शंभर हत्तीचे बळ आल्याचे बोलले जात आहे. परंतु, ज्यांनी मनसेची साथ सोडून उबाठामध्ये प्रवेश केला, त्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे काय, असा सवाल उपस्थित होत आहे. ज्या मनसेवर टिका केली आणि तेथील वर्तणुकीमध्ये पक्ष सोडत उबाठा गटाची साथ धरली. त्या मनसेची मदत आता कशी घेतली जाणार, असाही सवाल उपस्थित होत आहे. त्यातच मनसेतून उबाठा गटात गेलेल्यांना उमेदवारी देवू नये, याबाबत राज ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.


मनसेची स्थापना झाल्यानंतर शिवसेनेतील अनेकांनी त्या पक्षात प्रवेश देत राज ठाकरेंची साथ दिली. परंतु, २०१७ नंतर मनसेची ताकद मुंबईत कमी होवू लागल्यानंतर तसेच पक्ष संघटना वाढवण्याकडे कल नसल्याचे दिसून आल्यानंतर अनेकांनी मनसेची साथ सोडली. यामध्ये वांद्र्यातील अखिल चित्रे, बोरीवलीतील चेतन कदम, नितीन नांदगावकर, किर्तीकुमार शिंदे, धारावीतील हर्षला मोरे, जोगेश्वरी गोरेगावमधील सुगंधा शेट्ये आदींनी उबाठा गटामध्ये मनसेला सोडून उबाठा गटात प्रवेश केला आणि उबाठा गटातून कामाला सुरुवात केली. परंतु, आता मनसेच एकत्र आल्यामुळे पक्ष सोडून उबाठात गेलेल्यांचे काय होणार?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.


अखिल चित्रे, सुगंधा शेट्ये, हर्षला मोरे तसेच चेतन कदम यांची पत्नी आता इच्छुक उमेदवारांच्या चर्चेत आहे. त्यामुळे आता जिंकण्यासाठी ही मंडळी मनसेची मदत कशी घेणार आणि आपला पक्ष सोडून जात आपल्याच पक्षावर नाराजी व्यक्त करणाऱ्यांना मनसैनिक कशी मदत करणार हाही प्रश्न उपस्थित होत आहे. या मनसेतून उबाठात आलेल्यांमुळे उबाठातील प्रस्थापितांच्या जागा गेल्या आहेत. त्यामुळे आधी मनसेला जागा सोडल्यामुळे नाराजी आहेतच त्यात मनसेतून आलेल्यांना उबाठाकडून तिकीट दिले जात असल्याने ही नाराजी तळाला अधिकच वाढली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उबाठामध्ये मनसेतून गेलेल्यांना तिकीट देवून नये किंवा त्यांना तिकीट दिल्यास आम्ही मतदान करणार नाही किंवा त्यांना मदतही करणार नाही, अशा प्रकारचे वातावरण तयार होण्याची दाट शक्यता असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे मनसेतून उबाठात गेलेल्यांना उमेदवारी देवू नये, अशा प्रकारच्या सूचना आता राज ठाकरे यांच्याकडून दिल्या जातात का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Comments
Add Comment

Vijaya Mehta : मराठी नाट्यसृष्टीवर शोककळा; ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन

मुंबई : मराठी रंगभूमीला नवे विचार, नवी दिशा आणि असंख्य गुणी कलाकार देणाऱ्या ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका (Theatre Director)

BMC : रस्ते विकासकामे झाडांच्या मुळांवर

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या रस्ते काँक्रिटीकरणाची कामे जोरात असून ही सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे

BMC News : बांधकामांच्या ठिकाणच्या १०७ जलजोडण्या कापल्या

मुंबईतील ४१८ अनधिकृत जलजोडण्या खंडित, १०२ बुस्टर जप्त मुंबई : पावसाळा (Rain) लांबणीवर पडल्याने मुंबईत १५ मे २०२६

Mumbai Rain Orange Alert : मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा; ४ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी!

मुंबई : मुंबईत मंगळवार रात्रीपासून सुरू झालेला पाऊस (Rain) बुधवार सकाळपर्यंतही अखंड सुरू असून, पुढील चार दिवस शहरात

SIR in Mumbai : 'मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेत राजकीय पक्षांचे सहकार्य आवश्यक'

मुंबई : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह

Illegal Water Connections : बांधकामांच्या ठिकाणच्या १०७ जलजोडण्यावर पालिकेची कारवाई

४१८ अनधिकृत जलजोडण्या खंडित, १०२ बुस्टर जप्त मुंबई : पावसाळा लांबणीवर पडल्याने मुंबईत १५ मे २०२६ पासून १० टक्के