सयाजी शिंदेंच्या ‘सह्याद्री देवराई ’ प्रकल्पाला आग! नेमकं कारण काय?

बीड: एखाद तान्ह बाळ जन्माला आल्यापासून त्याची सर्व निगा राखायची, वाढ पाहायची, आपल्यासोबत खुलताना त्याला जवळ करायचं आणि आपल्या आधीच त्याचं जाणही आपणच बघायचं. हा दुर्दैवी प्रवास महाराष्ट्रातील एका वृक्ष संवर्धकासोबत घडला आहे. मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील वृक्ष संवर्धनाच्या लढ्यासाठी सयाजी शिंदे यांचे नाव जोडले जाते. सयाजी शिंदेंच्या पर्यावरण संवर्धनाचा महाराष्ट्रातील एक वस्तुपाठ मानल्या जाणाऱ्या बीड तालुक्यातील पालवन परिसरातील ‘सह्याद्री देवराई ’ प्रकल्पाला २४ डिसेंबरच्या संध्याकाळी भीषण आग लागली.





‘सह्याद्री देवराई ’ला लागलेल्या आगीने क्षणातच रौद्ररूप धारण केल्यामुळे देवराई प्रकल्पातील डोंगरावर असणारी हजारो झाडे, दुर्मिळ औषधी वनस्पती आणि असंख्य पशू-पक्षी होरपळून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे सयाजी शिंदे आणि त्यांच्या टीमने वर्षानुवर्षे घेतलेल्या मेहनतीवर क्षणार्धात पाणी फेरलं गेलंय. कारण सयाजी शिंदे यांनी या ओसाड डोंगराला हिरवेगार करण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले होते. विशेष म्हणजे कडक उन्हाळ्यातही पाण्याचे टँकर लावून इथल्या झाडांनाही हायड्रेट ठेवण्यात येत होते. मात्र हे सगळं एका आगीमुळे डोळ्यासमोर पुन्हा ओसाड झाल्यासारखे झाले आहे.



या घटनेबाबत एक दुसरी बाजू समोर येत आहे ते म्हणजे संबंधित आग देवराईला लागली नसून जवळच असणाऱ्या पिंपळवंडी भागात लागली होती. या ठिकाणी अनेकजण पार्ट्या करायला येतात. तसेच थंडीचे दिवस असल्यामुळे शेकोटी करतात. त्यामुळे सिगरेट्स आणि इतर ज्वलनशील पदार्थांबद्दल तरूणांनी दाखवलेला निष्काळजीपणा भोवल्याचे दिसून येत आहे. तर महत्त्वाचे म्हणजे रानातील पालापाचोळा, गवत सुकल्यामुळे आणि संध्याकाळच्या वेळी वाऱ्याचा वेग अधिक असल्याने आग वेगाने पसरण्यास वेळ लागला नाही. आता आग नेमकी कुठे लागली हा मुद्दा जरी महत्त्वाचा असला तरी शेकडो वृक्षांचे जीवन संपले आहे, ही गोष्ट हृदयद्रावक आहे.

Comments
Add Comment

‘धुरंधर’मध्ये रणवीर सिंह यांचा धमाका: हम्जाच्या भूमिकेतील ५ अविस्मरणीय क्षण

मुंबई : धुरंधर: द रिवेंज च्या प्रदर्शनाला आता फक्त एक महिना उरला आहे, आणि गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण

‘जय सोमनाथ’ : १०२६ मधील सोमनाथ मंदिरावरील आक्रमणाची गाथा रुपेरी पडद्यावर

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीने इतिहासावर आधारित अनेक भव्य चित्रपट दिले आहेत. आता आणखी एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक

नितेश राणे यांची केरला स्टोरी 2 – गोज बियॉन्ड या ट्रेलरवर प्रतिक्रिया, चित्रपटाला जाहीर पाठिंबा

इंस्टाग्रामवर ट्रेलर शेअर करत पाहण्याचे केले आवाहन मुंबई : आजच ‘केरला स्टोरी २  – गोज बियॉन्ड या चित्रपटाचा

The Kerala Story 2 : लव्ह ट्रॅप, छळ आणि धर्मांतर! २५ वर्षांत भारत इस्लामिक स्टेट होईल...अंगावर शहारे आणणारा ‘द केरळ स्टोरी २’ चा वादग्रस्त ट्रेलर आऊट

२०२३ मध्ये बॉक्स ऑफिसवर वादळ निर्माण करणाऱ्या ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटानंतर आता निर्मात्यांनी याच्या

डोंबिवलीमध्ये रंगणार 'द राहुल देशपांडे कलेक्टिव्ह'

मुंबई: शास्त्रीय संगीताची परंपरा आणि आधुनिकतेची सांगड घालत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे राहुल देशपांडे

थिएटर रिलीजपूर्वी ‘बैटल ऑफ गलवान’ टीमकडून खास आदरांजली; लष्करी वीर आणि त्यांच्या कुटुंबियांना समर्पित व्हिडिओ मालिका प्रदर्शित

मुंबई : Salman Khan Films ने ‘बैटल ऑफ गलवान’च्या प्रदर्शनापूर्वी एक खास व्हिडिओ मालिका प्रदर्शित केली असून, यात खऱ्या