सयाजी शिंदेंच्या ‘सह्याद्री देवराई ’ प्रकल्पाला आग! नेमकं कारण काय?

बीड: एखाद तान्ह बाळ जन्माला आल्यापासून त्याची सर्व निगा राखायची, वाढ पाहायची, आपल्यासोबत खुलताना त्याला जवळ करायचं आणि आपल्या आधीच त्याचं जाणही आपणच बघायचं. हा दुर्दैवी प्रवास महाराष्ट्रातील एका वृक्ष संवर्धकासोबत घडला आहे. मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील वृक्ष संवर्धनाच्या लढ्यासाठी सयाजी शिंदे यांचे नाव जोडले जाते. सयाजी शिंदेंच्या पर्यावरण संवर्धनाचा महाराष्ट्रातील एक वस्तुपाठ मानल्या जाणाऱ्या बीड तालुक्यातील पालवन परिसरातील ‘सह्याद्री देवराई ’ प्रकल्पाला २४ डिसेंबरच्या संध्याकाळी भीषण आग लागली.





‘सह्याद्री देवराई ’ला लागलेल्या आगीने क्षणातच रौद्ररूप धारण केल्यामुळे देवराई प्रकल्पातील डोंगरावर असणारी हजारो झाडे, दुर्मिळ औषधी वनस्पती आणि असंख्य पशू-पक्षी होरपळून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे सयाजी शिंदे आणि त्यांच्या टीमने वर्षानुवर्षे घेतलेल्या मेहनतीवर क्षणार्धात पाणी फेरलं गेलंय. कारण सयाजी शिंदे यांनी या ओसाड डोंगराला हिरवेगार करण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले होते. विशेष म्हणजे कडक उन्हाळ्यातही पाण्याचे टँकर लावून इथल्या झाडांनाही हायड्रेट ठेवण्यात येत होते. मात्र हे सगळं एका आगीमुळे डोळ्यासमोर पुन्हा ओसाड झाल्यासारखे झाले आहे.



या घटनेबाबत एक दुसरी बाजू समोर येत आहे ते म्हणजे संबंधित आग देवराईला लागली नसून जवळच असणाऱ्या पिंपळवंडी भागात लागली होती. या ठिकाणी अनेकजण पार्ट्या करायला येतात. तसेच थंडीचे दिवस असल्यामुळे शेकोटी करतात. त्यामुळे सिगरेट्स आणि इतर ज्वलनशील पदार्थांबद्दल तरूणांनी दाखवलेला निष्काळजीपणा भोवल्याचे दिसून येत आहे. तर महत्त्वाचे म्हणजे रानातील पालापाचोळा, गवत सुकल्यामुळे आणि संध्याकाळच्या वेळी वाऱ्याचा वेग अधिक असल्याने आग वेगाने पसरण्यास वेळ लागला नाही. आता आग नेमकी कुठे लागली हा मुद्दा जरी महत्त्वाचा असला तरी शेकडो वृक्षांचे जीवन संपले आहे, ही गोष्ट हृदयद्रावक आहे.

Comments
Add Comment

आणखी एका कलाकाराच्या घराला आग! बॉलिवूड दिग्दर्शकालाही आगीच्या विळख्याचा धक्का

मुंबई: आज सकाळी मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील सोरेंटो अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली.

पुष्कर जोगच्या घराला आग! मदतीसाठी सोशल मीडीयावर पोस्ट

मुंबई: संपूर्ण देशात ख्रिसमस सण मोठ्या आनंदात साजरा केला जात आहे. मात्र दुसरीकडे मराठी सिनेक्षेत्रातील

संजय कपूरची ३० हजार कोटींची मालमत्ता कोणाला मिळणार ? न्यायालयासमोर आलेल्या याचिकेमुळे येणार नवा ट्विस्ट ?

नवी दिल्ली : उद्योगपती संजय कपूरची ३० हजार कोटी रुपयांची मालमत्ता कोणाच्या मालकीची होणार असा प्रश्न निर्माण

रफी पुरस्कार माझ्यासाठी देवाचा प्रसाद

जेष्ठ गायिका उत्तरा केळकर मुंबई : महान गायक मोहम्मद रफी यांच्या नावाने मला मिळालेला पुरस्कार हा माझ्यासाठी

'वेलकम ३'चे शूटिंग संपले , वेगवेगळ्या लूक मध्ये दिसणार अक्षय कुमार

Welcome 3 : बॉलिवूडच्या वेलकम ३ या चित्रपटाचे शूटिंग नुकतेच संपले आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार एक महत्त्वाची

लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाचा मोठा निर्णय

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधना मागील काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे