उबाठा-मनसे युती म्हणजे अस्तित्वहीन पक्षांची अस्तित्व टिकवण्यासाठीची धडपड - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उबाठा आणि मनसेची अधिकृत युती जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या युतीवर तिखट टीका केली आहे. “ही युती म्हणजे दोन अस्तित्वहीन पक्षांनी स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी केलेली केविलवाणी धडपड आहे. काही प्रसारमाध्यमे हे दृश्य जणू रशिया आणि युक्रेनची युती होत आहे, पुतीन आणि झेलेन्स्की एकत्र येत आहेत असे चित्र उभे करत आहेत. परंतु, कुठल्याही पक्षाला निवडणुकीत अस्तित्व टिकवण्यासाठी जे करावे लागते, ते या दोन पक्षांनी केले आहे. या पलीकडे याचा दुसरा अर्थ काढण्याचे कारण नाही. या युतीमुळे महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही. ठाकरे बंधू म्हणजे मुंबई किंवा मराठी माणूस नाही. ठाकरे बंधू एकत्र आले याचा मला आनंद आहे, पण यामुळे राजकीयदृष्ट्या मोठे फेरबदल होतील असा समज बाळगणे बाळबोधपणा आहे”, असे मुख्यमंत्री म्हणाले.


मंत्रालयात माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले, "उबाठाने मुंबईकरांचा सातत्याने विश्वासघात केला आहे. मराठी माणसाला मुंबईबाहेर घालवण्याचे पाप त्यांनी केले. अमराठींवर हल्ले केले, त्यामुळे तेही त्यांच्यासोबत नाहीत. मुंबईत कोणीही ठाकरे बंधूंसोबत येणार नाही. त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड फक्त भ्रष्टाचार आणि स्वहिताचा आहे. निवडणुका आल्या की भावनिक बोलतात, पण आता जनता त्यांना भुलणार नाही. मुंबईकरांनी महायुतीने केलेला विकास पाहिला आहे. विशेषतः मराठी माणसाला मुंबईत हक्काची घरे देण्याचा कार्यक्रम आम्ही हाती घेतला आहे. त्यामुळे मुंबईची जनता विकासावर महायुतीलाच कौल देईल. ठाकरे बंधू म्हणजे मुंबई किंवा मराठी नाहीत. त्यांच्या गर्व आणि दुराभिमानामुळे मुंबईकर त्यांच्यापासून दूर गेले आहेत. मुंबईकरांना सेवेकरी हवे आहेत, राज्य गाजवणारे नाहीत. ठाकरे बंधूंची युती प्रीतिसंगम नव्हे, तर भीतीसंगम आहे", असा टोलाही त्यांनी लगावला.


"ठाकरे विकासावर बोलले तर मी १ हजार रुपये देईन अशी घोषणा मी पूर्वी केली होती. पण माझे पैसे अजून वाचले आहेत. ते विकासाची एकही गोष्ट बोलत नाहीत. ही निवडणूक मुंबईच्या विकासाची आहे, त्यावर ते बोलू शकत नाहीत. कारण त्यांना २५ वर्षांचा हिशेब द्यावा लागेल. मिठी नदी, मराठी माणसाच्या घरांचा हिशेब द्यावा लागेल", असेही मुख्यमंत्री म्हणाले.


पलटी मारणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही फडणवीसांनी ठाकरेंना लक्ष्य केले. "मी हिंदुत्वात जन्मलो आणि हिंदुत्वातच मरेन. मतांसाठी भगवी शाल घालणारे, रोज मत बदलणारे आम्ही नाही. मुंबई-महाराष्ट्र हिंदुत्ववादी आहे. जे हिंदुत्व सोडतील, लांगुलचालन करतील त्यांची अवस्था विधानसभेत दिसली आहे. आमचे हिंदुत्व व्यापक आहे, भारतीय जीवनपद्धतीवर आधारित आहे. प्रभू श्रीरामांना मानणाऱ्यांना आम्ही सोबत घेतो, त्यांची जात-धर्म पाहत नाही. पलटी मारणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये," असा घणाघात त्यांनी केला.

Comments
Add Comment

Eknath Shinde : एकनाथ शिंदे-गणेश नाईक यांच्यात मनोमिलन? - मंत्रालयात बंद दाराआड चर्चा

नवी मुंबई पालिकेसह ठाण्यातील जागावाटपाचा तीढा सुटणार मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाणे आणि नवी मुंबईतील

“ही युती मराठी माणसाचे नव्हे तर स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी” उद्धव-राज युतीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जहरी टीका

“सोन्याची अंडी खाऊन झाली आता कोंबडीच कापायला निघाले" “आमच्याकडे विकासाचा, तर त्यांच्याकडे खुर्चीचा

नवी मुंबई विमानतळाला लवकरच दि.बा. पाटील यांचे नाव - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन

मुंबई : बहुचर्चित नवी मुंबई विमानतळाला ‘लोकनेते स्व. दि. बा. पाटील’ यांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे

उद्या नाताळच्या निमित्ताने शेअर बाजार, बँका,कमोडिटी बाजार चालू राहतील का? वाचा

प्रतिनिधी:उद्या ख्रिसमस निमित्त शेअर बाजार बंद असणार आहे.त्यामुळे नेहमीप्रमाणे बाजार परवा २६ डिसेंबरला उघडणार

Stock Market: सेन्सेक्स व निफ्टीची पलटी! ख्रिसमस पूर्व किरकोळ घसरण का? जाणून सविस्तर विश्लेषण टेक्निकल पोझिशनसह

मोहित सोमण: अखेरच्या सत्रात शेअर बाजारात घसरण झाली आहे. अस्थिरतेचा फटका बसल्याने अखेरच्या सत्रात सकाळची तेजी

मराठी माणसाच्या अस्मितेसाठी नाही तर पक्ष अस्तित्वासाठी एकत्र

हा तर संधीसाधूंचा सत्ता पिपासूपणा, भाजपा नेते मंत्री ॲड. आशिष शेलार यांची टीका मुंबई: मराठी माणसाने तुम्हाला