‘टोमणे मारण्यापेक्षा त्यांनी आत्मपरीक्षण करावे’

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उबाठावर निशाणा 


‘सच्चा जिता, हार गया झूठा, जनताने दिया उबाठा को जमालगोटा’!


मी झोपायला नाही, झोप उडवायला आलोय


मुंबई : 'टोपणे मारण्यापेक्षा त्यांनी आत्मपरीक्षण करावे' फेसबुक लाईव्ह करून शिवसेना वाढली असता का? कोण असली आणि कोण नकली, हे जनतेने दाखवून दिले, असे स्पष्ट करत शिवसेना मुख्यनेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर निशाणा साधला.


आम्ही अनेक योजना आणल्या, विकासाला चालना दिली. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या मतांची बेरीज केली तरी एकट्या शिवसेनेची मते जास्त आहेत. हा विजय इतिहास घडवणारा आहे. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेबांच्या विचारांची आहे", याची आठवणही शिंदे यांनी करून दिली.


स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विजयाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात बोलताना शिंदे यांनी उबाठावर जोरदार टीका केली. २५ वर्षे सत्तेत असणाऱ्या उबाठासाठी मुंबई सोन्याची अंड देणारी कोंबडी होती. कोविडमधला खिचडी घोटाळा, बनावट कोविड सेंटर, बॉडीबॅग घोटाळे करणाऱ्यांना मुंबईकर त्यांची जागा दाखवतील. सच्चा जिता, हार गया झूठा, जनताने दिया उबाठा को जमालगोटा’, अशी शायरी करीत ठाकरेंची खिल्ली उडवली. 'मी झोपायला नाही, झोप उडवायला आलोय', असा इशारा त्यांनी दिला. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीचाच विजय होईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.


शिवसेनेचा चांदा ते बांदा विस्तार


नगर परिषद निवडणुकांबाबत बोलताना शिंदे यांनी शिवसेनेचा चांदा ते बांदा विस्तार झाल्याचे सांगितले. "लोकसभेत आमचा स्ट्राईक रेट सर्वाधिक होता, विधानसभेतही चांगला होता. कमी जागा लढून जास्त जिंकल्या. आमदार नसलेल्या ठिकाणीही नगराध्यक्ष निवडून आले. राज्यात ६२ नगराध्यक्ष आहेत, हा आकडा ७० पर्यंत जाईल. यात ३३ लाडक्या बहिणी नगराध्यक्ष झाल्या. उबाठा आणि महाविकास आघाडीने कार्यकर्ते वाऱ्यावर सोडले होते. जे घरी बसले, त्यांना जनतेने कायमचे घरी बसवले. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या नगराध्यक्षांपेक्षा शिवसेनेचे जास्त आहेत. सर्वसामान्यांची नाळ शिवसेनेला जोडलेली आहे, ती कधीच तुटणार नाही. शिवसेनेला हरवणे अशक्य आहे", असेही एकनाथ शिंदे म्हणाले.



Comments
Add Comment

Kalidas Maharaj : कालीदास महाराजांचे अपघाती निधन, ४० वर्षांत उच्चारला नव्हता एकही शब्द

परभणी : मराठवाड्यातील एक अध्यात्मिक गुरु अशी ख्याती असलेल्या आणि मागील चार दशकांपासून एकही शब्द न बोलता केवळ

Nashik : कोथिंबिरीच्या जुडीला तब्बल २८५ रुपये; पालेभाज्यांचे भाव गगनाला

Nashik : पावसाने ओढ दिल्यामुळे भाजीपाल्याची आवक घटली असून त्याचा थेट परिणाम पालेभाज्यांच्या दरावर झाला आहे. नाशिक

Morning Routine : सकाळी उठल्यावर कधीही करू नका या ८ सवयी; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सकाळच्या छोट्या सवयी तुमच्या आरोग्यावर मोठा परिणाम करू शकतात. चला जाणून घेऊ दिवसाची सुरुवात कशी करावी.  ( Morning

‘ Samarth Marathi Movie : समर्थ’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आजच्या काळाशी जोडणाऱ्या ‘समर्थ’ या आगामी मराठी चित्रपटाचा

Ramayana Movie : 'रामायण'च्या ट्रेलरला सेन्सॉर बोर्डाची मंजुरी

मुंबई : रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या आणि अत्यंत बहुप्रतिक्षित अशा 'रामायण: पार्ट १' ( Ramayana Movie) या पौराणिक

Solar Eclipse : ऑगस्टमध्ये खग्रास सूर्यग्रहण; भारतातून दिसणार की नाही ? युरोपमधून दिसेल दुर्मिळ खगोलीय दृश्य !

नवी दिल्ली : तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा खग्रास सूर्यग्रहणाचे साक्षीदार होण्याची संधी जगाला मिळणार आहे.