भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा! कारण, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर परिसराच्या विकासासाठी प्रशासनाने सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर पुढील ३ महिने भाविकांना दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


विकास आराखड्यांतर्गत मंदिरात विविध तांत्रिक आणि बांधकामाची कामे करायची असल्याने मंदिर बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देवस्थान ट्रस्ट, स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार आहे. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अहवालाला मंजुरी देताच, मंदिर नेमके कधीपासून बंद राहणार, याबाबतचा अधिकृत आदेश काढण्यात येणार आहे.


२८८ कोटींचा भव्य विकास आराखडा
भीमाशंकरच्या विकासासाठी सरकारने एकूण २८८.१७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या आराखड्यांतर्गत दर्शन रांगेचे नियोजन, पिण्याचे पाणी आणि निवासाच्या सोयीचे नियोजन, रस्ते, पार्किंग आणि परिसरातील स्वच्छतेची व्यवस्था या बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. तसेच पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मंदिराच्या मूळ रचनेला धक्का न लावता दुरुस्तीची काम करण्यात येणार आहे.




२०२७च्या कुंभमेळ्याचे नियोजन
श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग असून वर्षभरात देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पर्यटक व निसर्गप्रेमी येथे भेट देतात. महत्त्वाचे म्हणजे २०२७ मध्ये नाशिक त्रंबकेश्वर येथे कुंभमेळा होत आहे. प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळ्यावेळी वाराणसी, अयोध्या आणि उज्जैन या तीर्थक्षेत्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. त्याचप्रमाणे नाशिक येथे २०२७ रोजी होणाऱ्या कुंभमेळा वेळी भीमाशंकर आणि इतर तीर्थक्षेंत्राच्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन भीमाशंकर येथील व्यवस्थापन व येथे येणाऱ्या भाविकांसाठी आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यासाठी नव्याने काही कामे करण्यात येणार आहे. ही संभाव्य गर्दी लक्षात घेऊन त्यापूर्वीच सर्व विकासकामे पूर्ण करण्याचा प्रशासनाचे उद्दीष्ट आहे.


दरम्यान मंदिर दर्शनासाठी बंद असताना पूजा-अर्चा किंवा पर्यायी दर्शन व्यवस्थेबाबत देवस्थान ट्रस्ट लवकरच स्पष्टीकरण देणार आहे. त्यामुळ भाविकांनी या बदलांची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Ketan Agrawal Murder Case : 'खून मी नाही, त्याने केला!'... केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट; पोलिसही चक्रावले

Ketan Agrawal Murder Case : आधी कॉफी, मग कट? केतन हत्येपूर्वी सिया-चेतनची तासभर चर्चा

कॅफेत बसून रचला गेला होता प्लॅन? पुणे :  पुण्यातील लोहगड (Lohgad) किल्ल्यावर व्यावसायिक केतन अग्रवाल याच्या मृत्यू (Death)

Nitesh Rane : मच्छिमारांच्या सुविधांसाठी दिघी जेट्टी प्रकल्प पावसाळा संपल्यानंतर तातडीने मार्गी लावा

मुंबई, : रायगड(raigad) जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील मौजे दिघी येथील मच्छिमार जेट्टी प्रकल्प तसेच परिसरातील गाळ

अवकाळी पावसाने बाधित शेतकऱ्यांना ३३४ कोटी ९८ लाख रुपयांच्या मदतीस मंजुरी

कोकणातील आंबा व काजू उत्पादकांना मोठा दिलासा मुंबई दि.  २५ : एप्रिल व मे २०२६ या कालावधीत राज्यातील विविध

Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यांवर कारवाईची मागणी

शिवसेना महिला सेनेकडून मुंबई पोलीस आयुक्तांना निवेदन, कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मुंबई, दि. २५ जून

Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील 'एसआयटी' वादाच्या भोवऱ्यात

- तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी दिलेल्या आदेशांवर विरोधकांनी घेतला आक्षेप मुंबई : पुण्यातील तरुण व्यावसायिक