Navnath Ban : "हिंदुत्वाचा सौदा करणाऱ्यांनी लोकशाहीवर बोलू नये"; भाजपचे नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर घणाघाती प्रहार

मुंबई : राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन (Navnath Ban) यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. "ज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाचा सौदा केला आणि मराठी माणसाची पत्राचाळ लुटली, त्यांनी आम्हाला लोकशाही शिकवू नये," अशा शब्दांत बन यांनी राऊतांना सुनावले आहे.



भ्रष्टाचार आणि कोविड घोटाळ्यावरून टोला


नवनाथ बन यांनी राऊतांच्या टीकेचा समाचार घेताना जुन्या घोटाळ्यांची आठवण करून दिली. ते म्हणाले की, "राऊतांनी बोलायचे असेल तर पत्राचाळ लूट, खिचडी घोटाळा आणि वसुली रॅकेटवर बोलावे. कोविडच्या संकटात जेव्हा जनता होरपळत होती, तेव्हा मलिदा खाणारे आज लोकशाहीसाठी मगरीचे अश्रू ढाळत आहेत, हा दुटप्पीपणाचा कळस आहे."



घरात बसून निवडणूक, बाहेर येऊन आरोप


उद्धव ठाकरे गटावर टीका करताना बन म्हणाले की, "देशात लोकशाही पूर्णपणे सुरक्षित आहे, मात्र उभाठा गटात कार्यकर्ते बेवारस झाले आहेत. नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्या तरी यांचा एकही नेता मैदानात सभा घ्यायला तयार नाही. घरात बसून निवडणुका लढवायच्या आणि निकाल प्रतिकूल लागला की यंत्रणेवर शंका घ्यायची, ही राऊतांची जुनी सवय आहे."



हिंदुत्व सोडल्याचा पश्चात्ताप आणि 'खंजीर' राजकारण


"देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसून राऊतांनी जे राजकारण केले, त्याचा फटका त्यांना आता बसू लागला आहे," असा दावा बन यांनी केला. हिरव्या मतांसाठी हिंदुत्वाचा सौदा करणाऱ्यांना जनता कधीही माफ करणार नाही आणि विधानसभेप्रमाणेच महापालिकेतही त्यांना पश्चात्ताप करावा लागेल, असेही ते म्हणाले.



विकास विरुद्ध भ्रष्टाचार : महाराष्ट्राचा कौल स्पष्ट


भाजपच्या विकासकामांचा पाढा वाचताना बन म्हणाले, "भाजप जेव्हा मेट्रो, कोस्टल रोड आणि अटल सेतू यांसारख्या विकासकामांवर बोलते, तेव्हा विरोधक केवळ घोटाळ्यांची चर्चा करतात. सव्वा दोनशे जागांचा महायुतीला मिळालेला कौल ही विकासावर उमटलेली मोहर आहे. महाराष्ट्राने भ्रष्टाचाराला पूर्णपणे नाकारले आहे."



राज ठाकरेंना धोक्याचा इशारा


मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संभाव्य जवळिकीवर भाष्य करताना नवनाथ बन यांनी इशारा दिला. ते म्हणाले, "उद्धव आणि राऊत यांची परंपरा ही नेहमीच जवळच्यांना धोका देण्याची राहिली आहे. २००८ चा इतिहास पाहता राज ठाकरेंनी सावध राहावे. ही मिठी नसून पाठीत वार करण्याची तयारी असू शकते. मनसैनिकांनी राऊतांच्या नादाला लागू नये, हे 'मनोमिलन' नसून सत्तेच्या भीतीपोटी झालेले 'मिलन' आहे."

Comments
Add Comment

धर्मांतर हा श्रद्धेचा विषय, व्यवहाराचा नाही!"; विधान परिषदेत आमदार प्रवीण दरेकरांची ठाम भूमिका

मुंबई: "धर्म हा केवळ मानवी श्रद्धेचा भाग असून त्याचा व्यवहारासाठी किंवा स्वार्थासाठी वापर करणे चुकीचे आहे.

राज्यातील कालबाह्य ८० कायदे रद्द

विधेयक मंजूर; मुंबई फटक्यांची शिक्षा रद्द करण्याचा अधिनियम रद्द मुंबई : महाराष्ट्रातील कालबाह्य झालेले ८०

नायजेरियन नागरिकांविरोधात लवकरच धडक मोहीम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वैध कागदपत्रे नसलेल्यांना हद्दपार करणार मुंबई : राज्यात विशेषतः मुंबईनजीकच्या उपनगरांमध्ये बेकायदेशीरपणे

ड्रग्ज तस्करी रोखण्यासाठी कारवाईची वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षे करणार

मुंबई : अमली पदार्थांच्या तस्करीसाठी मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुलांचा उपयोग केला जात आहे. त्यामुळे याला पायबंद

राखीव खाटा न दिल्याने परळच्या ग्लोबल रुग्णालयावर कारवाई

राज्यमंत्री माधुरी मिसाळ; अतिरिक्त एफएसआय सवलत रद्द करणार मुंबई : परळ येथील ग्लोबल रुग्णालयाकडून गरीब

ड्रग्सविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबविणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; सहभागी गुन्हेगारांची संपत्तीही जप्त करणार मुंबई : नागपूर शहरातील मोतीबाग परिसरात