Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली तरी त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. मुंबई महापालिकेवर केवळ भाजप आणि महायुतीचाच झेंडा फडकणार," असा ठाम विश्वास राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी व्यक्त केला आहे. जालना येथे भाजप नेते भास्कर दानवे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेटीसाठी आले असताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.



मुंबई महापालिका महायुतीच्याच ताब्यात येणार


मुंबई महापालिकेच्या आगामी रणसंग्रामावर बोलताना पंकज भोयर म्हणाले की, "ठाकरे बंधू एकत्र येत असल्याच्या चर्चा केवळ राजकीय वर्तुळात आहेत. मात्र, मुंबईच्या जनतेने विकासाची कास धरली आहे. मोदी सरकारने राबवलेल्या कल्याणकारी योजना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले लोकहिताचे निर्णय यामुळे जनतेचा महायुतीवर विश्वास वाढला आहे. त्यामुळे विरोधक कितीही एकत्र आले तरी मुंबई महापालिका महायुतीच्याच ताब्यात येईल."



स्थानिक निवडणुकांच्या युतीवर वरिष्ठांचा शब्द अंतिम


जालना आणि राज्यातील अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील युतीबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, "येथील स्थानिक परिस्थिती आणि राजकीय समीकरणे बघून पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व योग्य तो निर्णय घेतील. या प्रक्रियेत स्थानिक पदाधिकाऱ्यांची मतेही विचारात घेतली जातील. महायुती म्हणून लढायचे की नाही, याचा अंतिम निर्णय लवकरच जाहीर होईल."



नगरपरिषदेतील यशाची महापालिकेत पुनरावृत्ती


पंकज भोयर यांनी अलीकडेच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीतील यशाचा दाखला दिला. ते म्हणाले, "नगरपरिषद निवडणुकीत नागरिकांनी आम्हाला प्रचंड मतांनी विजयी केले आहे. ही विकासाची पोचपावती आहे. हीच लाट आगामी महापालिका निवडणुकीतही पाहायला मिळेल आणि भाजप-महायुतीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येतील."

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार