Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मौलाना सय्यद कादरी यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल केलेल्या एका वादग्रस्त विधानाचा समाचार घेताना, नवनीत राणा यांनी हिंदू समाजाला थेट आवाहन केले आहे. "जर समोरून उघडपणे लोकसंख्या वाढवण्याचे आव्हान दिले जात असेल, तर आपणही मागे राहता कामा नये," अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.



"हिंदुस्थानला पाकिस्तान बनवण्याचा विचार"; राणांचा हल्लाबोल




मौलाना सय्यद कादरी यांनी अलिकडेच, "मला चार बायका आणि १९ मुले आहेत," असे वक्तव्य केले होते. यावर प्रतिक्रिया देताना नवनीत राणा म्हणाल्या, "त्यांचा हा विचार आपल्या हिंदुस्थानला पाकिस्तान बनवण्याचा आहे. जर कुणी उघडपणे सांगत असेल की त्यांना इतकी मुले आहेत, तर आपण एका मुलावरच का समाधान मानायचे? मी सर्व हिंदू समाजाला आवाहन करते की, आपणही किमान तीन ते चार मुले जन्माला घातली पाहिजेत. यामध्ये कोणतेही दुमत असण्याचे कारण नाही." लोकसंख्येचा समतोल राखण्यासाठी हिंदूंनी आता विचार करण्याची वेळ आली आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला.



पवार कुटुंबाच्या 'मनोमिलना'वर भाष्य


राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींवर बोलताना नवनीत राणा यांनी मवाळ भूमिका घेतली. "शरद पवार हे महाराष्ट्राचे अत्यंत वरिष्ठ नेते आहेत. अजित पवार आणि शरद पवार हे शेवटी एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. अजित पवारांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते की, शरद पवारांच्या सल्ल्यानेच ते भाजपसोबत गेले होते. त्यामुळे जर दोन पवार पुन्हा एकत्र येत असतील, तर ही स्वागतार्ह बाब आहे. कुटुंब एकत्र येणे कधीही चांगलेच असते," असे मत त्यांनी व्यक्त केले.



राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण


नवनीत राणा यांच्या लोकसंख्या वाढीच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. विशेषतः निवडणुकीच्या वातावरणात त्यांनी थेट 'मुलांच्या संख्ये'वरून हिंदू समाजाला साद घातल्याने विरोधकांकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे पवार कुटुंबाबद्दलच्या त्यांच्या विधानाने महायुतीमधील भविष्यातील समीकरणांवरही चर्चा सुरू झाली आहे.

Comments
Add Comment

चिकन खाताय ? सावध व्हा ! महाराष्ट्रात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव, 'या' ठिकाणच्या तब्बल दीड लाख कोंबड्या मारणार

नंदूरबार : चिकन म्हणजे अनेकांचा जीव की प्राण. आणि तुम्ही देखील याच अनेकांमध्ये असाल तर वेळीच सावध व्हा कारण

Pandharpur Crime : पंढरपुरात खळबळ! बेपत्ता महिलेचा मृतदेह सापडला; मोबाईल स्टेटस आणि इन्स्टाग्रामच्या धाग्यावरून हत्येचा खळबळजनक उलगडा

पंढरपूर : सोशल मीडियाचा अतिवापर एका महिलेच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक आणि खळबळजनक घटना पंढरपूरमध्ये उघडकीस

Sunetra Pawar : बीडमध्ये ध्वजारोहण करताना सुनेत्रा पवार भावूक, अजितदादांच्या आठवणीने पाणावले डोळे!

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी शासकीय ध्वजारोहण सोहळे

Dharashiv : महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात एकच गोंधळ, महिलेनं अंगावर पेट्रोल ओतलं अन्…

Dharashiv : धाराशिव येथील शासकीय मध्यवर्ती इमारतीसमोर आयोजित करण्यात आलेल्या मुख्य झेंडावंदन कार्यक्रमादरम्यान एका 40

Suresh Kumar Jaithalia : माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे निधन

मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी आमदार

Devendra Fadnavis : "महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकलीच पाहिजे पण ..."; महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री फडणवीसांनी मांडले स्पष्ट मत

मुंबई : महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यात भाषेच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र