एकाच महिला नेत्याला मिळाला प्रथम नागरिकाचा मान!

वसई-विरारमध्ये पाच पुरुष महापौर


गणेश पाटील विरार : वसई-विरार महापालिकेच्या महापौरपदी विराजमान होण्याची संधी यापूर्वी पाच पुरुषांना मिळाली असून, महिला नेत्याला मात्र केवळ एकदाच महापौर पदाच्या खुर्चीवर बसता आले आहे. महापालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असताना महापौर पदाच्या आरक्षणाबाबत मात्र अनिश्चितता आहे. त्यामुळे आगामी महापौर पदाच्या आरक्षणाकडे सर्वच राजकीय पक्षाच्या नेते, पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे. राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका लागल्या आहेत.


२३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान आणि १६ जानेवारी रोजी मतमोजणी केली जाणार आहे. दरम्यान, नगरपंचायत, नगरपरिषदांच्या निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. नगराध्यक्षांची निवड थेट मतदारांनीच केली आहे. नगराध्यक्ष पदाचे आरक्षण निवडणुकांच्या पूर्वीच जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे संभाव्य नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीतील नावे मतदारांसमोर सुद्धा आली होती. तथापि, महापालिका निवडणुक प्रक्रिया सुरू करण्याअगोदर महापौर पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे १६ जानेवारी रोजी नगरसेवक निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्व राजकीय पक्षांना महापौर पदाच्या आरक्षणाबाबत उत्सुकता राहणार आहे.वसई-विरार महापालिका अस्तित्वात आल्यापासून ६ नगरसेवकांना महापौर पदाची संधी मिळाली आहे. प्रथम महापौर होण्याचा मान २८ मार्च २०१० रोजी बहुजन विकास आघाडीच्या राजीव यशवंत पाटील यांना मिळाला. त्यानंतरच्या अडीच वर्षाच्या कालावधीसाठी नारायण मानकर हे महापौर झाले. महापालिकेच्या दुसऱ्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या पत्नी प्रविणा ठाकूर या वसई-विरारच्या पहिल्या महिला महापौर झाल्या. त्यानंतर रुपेश जाधव, प्रकाश रॉड्रिग्ज आणि प्रवीण शेट्टी या तीन पुरुष नगरसेवकांना महापौर पदाची संधी मिळाली. ११५ सदस्य संख्या असलेल्या या महापालिकेत आता सातवा महापौर कोण आणि कोणत्या राजकीय पक्षाचा असेल ही बाब आता आरक्षण जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.


वसई-विरारमधील आतापर्यंतचे महापौर


१) राजीव यशवंत पाटील (२८ मार्च २०१० ते ४ जानेवारी २०१२), २) नारायण मानकर ( ५ जानेवारी २०१२ ते २८ जून २०१५), ३) प्रविणा हितेंद्र ठाकूर (२९ जून २०१५ ते २८ डिसेंबर २०१७), ४) रुपेश जाधव ( २९ डिसेंबर २०१७ ते २५ जुलै २०१९), ५) प्रकाश रॉड्रिग्ज ( २६ जुलै २०१९ ते २२ ऑगस्ट २०१९ ), ६) प्रवीण शेट्टी (२३ ऑगस्ट २०१९ ते २८ जून २०२०).

Comments
Add Comment

वनजमिनीच्या तांत्रिक पेचात अडकली आदिवासींची घरे

विवेक पंडित यांनी मंत्रालयाचे वेधले लक्ष वसई  : राज्यातील बेघर आदिवासी, विशेषतः आदिम कातकरी समाजाच्या गावठाण

तारापूर औद्योगिक वसाहतीत वायू गळती

बोईसर : पालघर जिल्ह्यातील बोईसरमधील तारापूर औद्योगिक वसाहतीतल्या भघेरिया केमिकल्समध्ये (जुने नाव : झेनित

पालघरमध्ये बंद दगड खाणीत दुर्घटना; दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पालघर : पाण्याचा अंदाज न ओळखता आल्याने दोन मुलांचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना पालघरमध्ये घडली आहे. मनोरजवळील

औद्योगिक क्षेत्रातील समस्यांवर आमदारांनी वेधले लक्ष

विजेच्या अडचणींसह जमिनीचा लीज प्रश्न सोडवा वसई  : वसई-विरार औद्योगिक क्षेत्रातील छोटे मोठे उद्योजक विविध

वसई-विरारचा अर्थसंकल्प ‘वेटिंग’वर!

स्थायी समिती सभापतींची निवड लांबल्याने मार्चचा मुहूर्त विरार : महापौर, उपमहापौर निवडणूक उशिरा होऊनही मुंबई

ई-गव्हर्नन्स मूल्यमापनात वसई–विरार पालिकेचा ‘नववा क्रमांक’ कायम

पालघर :  राज्यातील महानगरपालिकांच्या ई-गव्हर्नन्स कामकाजाच्या मूल्यमापनात वसई–विरार महानगरपालिकाने यंदाही