वाड्यात कमळ फुलले; नगराध्यक्षपदी भाजपच्या रिमा गंधे

उबाठा गटाचा उडवला धुव्वा


वाडा : वाडा नगरपंचायतीच्या रविवारी झालेल्या मतमोजणीत भाजपाने नगराध्यक्ष पदासह १२ जागांवर विजय मिळवत वाडा नगरपंचायतीवर एकहाती सत्ता स्थापन करून आपला झेंडा फडकवला आहे. रिमा गंधे यांनी ३ हजार ९६७ मते मिळवून सुमारे ९७२ मतांनी विजयी झाल्या आहेत. शिवसेना पक्षाने तीन, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक, काँग्रेस एक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक अशा जागांवर विजयी झाले आहेत. या निवडणुकीत शिवसेना उबाठा पक्षाचा धुव्वा उडवला असून राष्ट्रवादी पक्षाला आपले खातेही खोलता आले नाही. त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.


रिमा गंधे यांना ३ हजार ९६७ मते मिळाली असून त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवसेना पक्षाच्या उमेदवार हेमांगी पाटील यांना २ हजार ९९५, तर उबाठा गटाच्या निकिता गंधे यांना २ हजार ४८७ मते मिळवून रिमा गंधे या ९७२ मतांनी विजयी झाल्या. रिमा यांचा विजय होताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करीत विजयोत्सव साजरा केला. प्रभाग क्रमांक ३ मधून भाजपच्या स्मिता पातकर यांनी ४०७ मते मिळवून उबाठा गटाच्या प्रिती गंधे यांचा पराभव केला. प्रभाग क्रमांक ४ भाजपचे अशिकेश पवार हे विजयी झाले असून त्यांना २७९ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना पक्षाचे उमेदवार राजेश पालकर पराभूत झाले. प्रभाग क्रमांक ५ मधून भाजपचे तेजस पाटील ३६५ मते मिळवून विजयी झाले. त्यांनी शिवसेना पक्षाचे राजकिरण पाटील यांचा पराभव केला आहे.


प्रभाग क्रमांक ६ मधून भाजपच्या सिद्धी भोपतराव या विजयी झाल्या असून त्यांना २२४ मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार प्रिया गंधे यांचा एका मताने पराभव झाला. प्रभाग क्रमांक ७ मधून भाजपच्या मयुरी म्हात्रे या विजयी झाल्या असून त्यांना १५६ मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार रिद्धी भोईर यांचा पराभव झाला. प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक ही अंत्यत चुरशीची व रंगतदार झाली होती. या निवडणुकीत भाजपचे मनिष देहेरकर हे दुसऱ्यांदा विजयी झाले. त्यांनी माजी उपनगराध्यक्ष तथा शिवसेना पक्षाचे पदाधिकारी संदीप गणोरे यांचा ९ मतांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक १२ मधून कॉग्रेसच्या भारती सपाटे यांनी देखील सलग दुसऱ्यांदा बाजी मारली आहे. प्रभाग क्रमांक १४ मधून भाजपच्या रिता थोरात विजयी झाल्या असून त्यांनी शिवसेना गटाच्या रेश्मा गायकवाड यांचा पराभव केला. प्रभाग क्रमांक १५ मधून भाजपच्या प्रगती वलटे विजयी झाल्या असून त्यांना १६५ मते मिळाली. या प्रभागातून माजी सभापती विशाखा पाटील पराभूत झाल्या.


प्रभाग क्रमांक १६ मधून शिवसेना पक्षाचे अजिंक्य पाटील हे विजयी झाले असून त्यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार प्रथमेश गोरे यांचा ५ मतांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक १७ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुचिता पाटील या देखील दुसऱ्यांदा प्रचंड मतांनी विजयी झाल्या असून त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवार माजी उपनगराध्यक्ष वर्षा गोळे यांचा दारुण पराभव केला.

Comments
Add Comment

वनजमिनीच्या तांत्रिक पेचात अडकली आदिवासींची घरे

विवेक पंडित यांनी मंत्रालयाचे वेधले लक्ष वसई  : राज्यातील बेघर आदिवासी, विशेषतः आदिम कातकरी समाजाच्या गावठाण

तारापूर औद्योगिक वसाहतीत वायू गळती

बोईसर : पालघर जिल्ह्यातील बोईसरमधील तारापूर औद्योगिक वसाहतीतल्या भघेरिया केमिकल्समध्ये (जुने नाव : झेनित

पालघरमध्ये बंद दगड खाणीत दुर्घटना; दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पालघर : पाण्याचा अंदाज न ओळखता आल्याने दोन मुलांचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना पालघरमध्ये घडली आहे. मनोरजवळील

औद्योगिक क्षेत्रातील समस्यांवर आमदारांनी वेधले लक्ष

विजेच्या अडचणींसह जमिनीचा लीज प्रश्न सोडवा वसई  : वसई-विरार औद्योगिक क्षेत्रातील छोटे मोठे उद्योजक विविध

वसई-विरारचा अर्थसंकल्प ‘वेटिंग’वर!

स्थायी समिती सभापतींची निवड लांबल्याने मार्चचा मुहूर्त विरार : महापौर, उपमहापौर निवडणूक उशिरा होऊनही मुंबई

ई-गव्हर्नन्स मूल्यमापनात वसई–विरार पालिकेचा ‘नववा क्रमांक’ कायम

पालघर :  राज्यातील महानगरपालिकांच्या ई-गव्हर्नन्स कामकाजाच्या मूल्यमापनात वसई–विरार महानगरपालिकाने यंदाही