जनतेचा निकाल मान्य, आता विकासावर लक्ष! निकालानंतर पालकमंत्र्यांची प्रतिक्रिया

कणकवली: नगरपरिषद आणि नगरपालिकेचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. कोणते उमेदवार, किती मतांनी विजयी झाले किंवा पराजित झाले याचे अधिकृत आकडे स्पष्ट होत असताना गुलाला उधळायला सुरुवात झाली आहे. सिंधुदुर्गात भाजपचे कमळ फुलवल्याल्यानंतर भाजप नेते आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणेंनी पहिली प्रतिक्रिया आली आहे.


नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या वेंगुर्ला आणि सावंतवाडी तालुक्यातील नगराध्यक्षपदासाठी भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. वेंगुर्ल्यातून दिलीप उर्फ राजन गिरप तर सावंतवाडीत भाजपच्या युवराज्ञी श्रद्धा भोसले निवडून आल्या आहेत. तर दुसरीकडे मालवणमध्ये ममता वराडकर आणि कणकवलीमधून शहर विकास आघाडीचे संदेश पारकर निवडून आले आहेत.


जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या शहराच्या विकासाच्या दृष्टीकोनातून चारही उमेदवाऱ्यांच्या मागण्या आणि अपेक्षा नियोजन स्वरुपात माझ्याकडे आल्यास कोणताही पक्षपात न करता शंभर टक्के न्याय देण्याचा शब्द नितेश राणेंनी दिला आहे. तसेच निवडणुका कोणत्याही परिस्थितीत झाल्या असल्या तरी विकास हाच केंद्रबिंदू मानून सरकारच्या वतीने जी मदत लागेल ती उभी करणे ही माझी जबाबदारी असेल असे राणेंनी स्पष्ट केले आहे.


कार्यकर्त्यांचा मोलाचा वाटा
नितेश राणे यांनी विजयाचे श्रेय कार्यकर्त्यांना दिले आहे. वेंगुर्ला आणि सावंतवाडीमध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवक चांगल्या मतांच्या फरकाने निवडून आल्यामुळे राणेंनी सर्व श्रेय कार्यकर्त्यांना दिले आहे. सर्व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे आणि कोणतीही कसर न ठेवता निवडणूक काळात जे काम केले त्यासाठी नितेश राणेंनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.


जनतेचा निकाल मान्य
लोकशाहीमध्ये जनतेने दिलेल्या मताचा आदर ठेवावा लागतो. त्यामुळे जनतेने दिलेला निकाल आम्ही स्वीकारतो आणि या दृष्टीतून मालवण आणि कणकवलीमध्ये पक्ष बांधणीमध्ये काय काय करता येईल आणि कसे सक्षम होता येईल यासाठी संघटनात्मक पद्धतीने पावले उचलू असे राणेंनी सांगितले. तसेच २०१७ ला कणकवलीच्या जनतेने सेवेची संधी दिली होती. आमच्या कामाबाबत त्यांना काही गोष्टी पटल्या नसतील, त्यामुळे जनतेने मतदानाच्या स्वरुपात त्यांच्या मनातील भावना मांडल्या आहेत ते आम्हाला मान्य असल्याचे मोठ्या मनाने स्वीकारल्याचे राणेंच्या प्रतिक्रियेतून दिसून येते.





निलेश राणेंचे अभिनंदन
मालवण आणि कणकवलीचे प्रभारी म्हणून निलेश राणेंकडे जबाबदारी होती. त्यामुळे दोन्ही ठिकाणी जो विजय मिळाला त्यात निलेश राणेंच्या नेतृत्वाचा सिंहाचा वाटा आहे सांगत नितेश राणे यांनी मोठ्या भावाचे अभिनंदन केले. तसेच विरोधकांबाबत ज्या रणनीती आखल्या त्याबाबत कौतूक सुद्धा केले.


नेमकं माझं कोण? राणेंचा प्रश्न
नगरपरिषदा, लोकसभा आणि विधानसभा वेगवेगळ्या विचारांनी लढल्या जातात. कणकवलीच्या निवडणुकीत सर्व एकत्र होते. ज्या परिस्थितीमध्ये निवडणूक लढली गेली, त्यामध्ये कुटुंबापासून ते विरोधकांपर्यंत सर्वच विरोधात लढत असल्याने नेमकं माझं कोण हा प्रश्न पडल्याचे नितेश राणेंनी सांगितले. त्यामुळे पक्ष श्रेष्ठींसोबत बोलणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.




Comments
Add Comment

Uddhav Thackeray : उबाठा प्रमुखांची विधान परिषदेत महा'दांडी'!

- ४ वर्षांत केवळ ४२ दिवस हजेरी; सभागृहाच्या इतिहासात सर्वात कमी उपस्थितीचा लाजिरवाणा विक्रम नोंद मुंबई :

Mexico Puebla Shooting : मेक्सिकोच्या प्युएब्लामध्ये गोळीबार; एका अल्पवयीन मुलासह १० जणांचा मृत्यू

मेक्सिको : मेक्सिकोमधील पुएब्ला राज्यात झालेल्या भीषण सशस्त्र हल्ल्यात (Mexico Puebla Shooting) किमान १० जणांचा मृत्यू झाला

Badlapur Crime : बदलापूरमधील पीडित चिमुकलींच्या शिक्षणाची जबाबदारी अखेर सरकारने उचलली!

घोषणेनंतर तब्बल दोन वर्षांनी दहावीपर्यंतचे शुल्क मंजूर; 'आरटीई'अंतर्गत शाळांना थेट निधी देणार मुंबई : संपूर्ण

India - Sweden Bilateral Talks : पंतप्रधान मोदींची स्वीडनच्या पंतप्रधानांसोबत द्विपक्षीय चर्चा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी स्वीडनमधील गॉथेनबर्ग येथे पंतप्रधान महामहीम उल्फ क्रिस्टरसन

Nitesh Rane : इंधन बचतीसाठी मंत्री नितेश राणे यांचा मेट्रोने प्रवास

मुंबई : जागतिक इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला

Pratap Sarnaik : 'एसटी'चा प्रवास महागणार?

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे संकेत; ३१ मेपर्यंत वाट पाहण्याची भूमिका मुंबई : अमेरिका आणि इराणमधील